शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
वैजयंतीमाला, चिरंजीवी यांच्यासह १३२ विजेत्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कार प्रदान
3
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
4
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
5
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
6
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
7
जंगल सफारीला निघाला क्रिकेटचा देव! Sachin Tendulkar ने शेअर केले जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य Photos
8
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
9
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
10
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
11
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
12
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
13
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
14
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
15
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
16
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
17
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
18
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
19
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
20
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 

भाजपने खाण व्यवसाय, कोळसा व पक्षांतराबद्दल भूमिका स्पष्ट करावी; इंडिया आघाडीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2024 1:01 PM

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ३५ हजार कोटींचा खाण घोटाळ्याचा आरोप केला होता.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : भाजप सरकार प्रत्येक निवडणुकीत खाण व्यवसाय सुरू करण्याचे आश्वासन देऊन खाण अवलंबितांना फसवत असल्याचा आरोप इंडिया आघाडीच्या प्रवक्त्त्यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी ३५ हजार कोटींचा खाण घोटाळ्याचा आरोप केला होता. पण, या आरोपांचे नंतर काहीच झाले नाही. भाजप कोळसा, पक्षांतरावरही काहीच बोलत नाही. त्यांनी अगोदर यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावेळीचे इंडिया आघाडीचे प्रवक्ते तुलिओ डिसोझा, गोवा फॉरवर्डच्या उपाध्यक्षा आश्मा बी आणि आपचे उपाध्यक्ष संदेश तळेकर देसाई उपस्थित होते.

डिसोझा म्हणाले की, खाण घोटाळा ३५ हजार कोटी रुपयांचा असू शकतो, असे शाह आयोगाने म्हटले होते. २०१३ मध्ये भाजप सरकारने त्याच्या तपासासाठी एसआयटी स्थापन केली होती. या तपासाचे पुढे काय झाले आणि त्यात कोणाचा सहभाग होता, हे सरकारने सांगावे. भाजपने काँग्रेसवर आरोप करून सत्ता बळकावण्यासाठी खाण घोटाळ्याचा वापर केला का, यावरही स्पष्टता द्यावी. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आमदार कोळशाच्या प्रश्नावर एक शब्दही उच्चारत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.

संदेश तळेकर देसाई म्हणाले की, कोळसा हाताळणी बंद करण्याचे आश्वासन भाजप नेत्यांनी दिले असले तरी कोळसा हाताळणी सुरूच आहे. लोक कोळसा हाताळणीच्या विरोधात आहेत. पण, हे डबल इंजिन असूनही सरकारने कोळसा हाताळणीसाठी पर्यावरण मंजुरी दिल्याचा आरोप त्यांनी केला.

 

टॅग्स :goaगोवाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४