शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

प्रियोळ मतदारसंघात भाजप अधिक सक्रीय; मगोसोबतची युती उपयुक्त ठरणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2023 08:16 IST

या मतदारसंघावर तसा मगोचा बोलबाला होता.

अजय बुवा, लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा: उत्तर गोवालोकसभा मतदारसंघाचा विचार करता फोंडा तालुक्यातील चारपैकी हा एकमेव मतदारसंघ उत्तर गोव्यात येतो. गोविंद गावडे हे सलग दोनवेळा येथे आमदार निवडून येत आहेत. पहिल्यांदा त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. गोविंद गावडे यांना त्यावेळी भाजपने पाठिंबा दिला होता. तर गेल्या विधानसभा निवडणुकीत ते स्वतः भाजपमध्ये आले व भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून विजयी झाले. त्या अगोदर या मतदारसंघावर तसा मगोचा बोलबाला होता.

सध्या या मतदारसंघात भाजप पूर्णपणे सक्रीय दिसून येते. गेल्या काही निवडणुकांचा निकाल पाहता या मतदारसंघातील मतदारांनी भाजपला भरभरून मते दिली. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मगो पक्षाने भाजपविरोधी काम करूनसुद्धा येथे श्रीपाद नाईक यांनी लक्षणीय मते मिळवली होती, यावेळी मगो व भाजप हे दोन्ही पक्ष सरकारमध्ये आहेत.

उमेदवाराचे वाढणार बळ 

मंत्री गोविंद गावडे यांना टक्कर देणारे एकमेव उमेदवार म्हणजे दीपक ढवळीकर. सध्या मगो पक्ष सरकारमध्ये असून सुदिन ढवळीकर मंत्रिपदी आहेत. साहजिकच त्यांना भाजपच्या उमेदवारासाठी काम करावे लागेल. मागच्या विधानसभा निवडणुकीचा विचार करता दोन्ही पक्षांनी मिळून सुमारे २१ हजार ८०० मते मिळाली होती. २०१७ च्या निवडणुकीत दोन्ही पक्षांना मिळून सुमारे २५ हजार ५०० मते मिळाली होती. ही सर्वच्या सर्व मते साहजिकच भाजपचा जो कोणी उमेदवार असेल त्याच्या पारड्यात नक्कीच जातील.

मतदारांचा कौल कुणाकडे?

या मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्य दिवसेंदिवस क्षीण होत चालले आहे. २०१७ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला येथे ४०० मते, तर २०२२ च्या निवडणुकीत फक्त ३०० मते मिळाली आहेत. राज्यस्तरावर चमकणारे वरद म्हार्दोळकर हे काँग्रेसचे नेते या मतदारसंघात राहतात. परंतु, त्यांची या मतदारसंघात काहीच पकड नाही. मागच्या विधानसभा निवडणुकीत आरजी पक्षाने अडीच हजार मते घेऊन येथे आपले अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळीसुद्धा ते भाजपच्या विरुद्ध काम करतील. परंतु विधानसभा निवडणुकीवेळी जेवढी मते पडली, तेवढी मते लोकसभा निवडणुकीला त्यांच्या उमेदवाराला मिळतील याची काही शाश्वती नाही. कारण विधानसभेचे मुद्दे वेगळे होते, लोकसभेचे मुद्दे वेगळे असतात. आजच्या घडीचा विचार करता आज जर निवडणूक झाली, तर भाजपला येथे ९० टक्के मते सहज मिळू शकतील, असे वातावरण आहे.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण