शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

SITने हडप केलेल्या जागा भाजपचे मंत्री, आमदार विकतात; 'आप'च्या अमित पालेकर यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 15:32 IST

आम आदमी पक्षाचे समन्वयक ॲड. अमित पालेकर यांची पत्रकार परिषद

नारायण गावस, पणजी: सरकार जे एसआयटी मार्फत जमिनी ताब्यात घेत आहेत ते भाजपचे काही मंत्री आमदार विकण्याचे काम करत आहेत. भाजपच्या एका आमदारांने आसगाव येथे अशी जमीन विकत घेतली आहे. त्याचा योग्य पुरावा आमच्याकडे आहे याेग्य वेळ आल्यावर तो जाहीर केला जाणार आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे समन्वयक ॲड. अमित पालेकर यांनी पत्रकार परिषेदत केला. यावेळी त्याच्यासोबत वाल्मिकी नाईक व जॉर्सन गोमस् उपस्थित होते.

ॲड पालेकर म्हणाले अगाेदर बिल्डर लोकांच्या जागा हडप करत होते. आता सरकारचे मंत्री आमदारच लाेकांच्या जागा हडप करत आहेत. एसआयटीने ताब्यात घेतलेल्या जमिनी परस्पर विकल्या जात आहेत. यासाठी सरकार नवनवीन कायदे आणत आहेत. नुकतेचआयपीबी विधेयक भाजपने मांडले. हे विधेयक आले तर सरकारच्या सर्व खात्याचे अधिकार काढून ते सर्व मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. नंतर मुख्यमंत्री आपल्या दलालासोबत राज्यातील सर्व जागा या रियल इस्टेट तसेच बिल्डरांना विकणार आहे. विधानसभेत विरोधकांनी या विधेयकाला विरोध केल्याने ते चिकित्सा समितीकडे पाठविले आहे. हे विधेयक आले तर गाेव्याच्या जमिनी नष्ट हाेणार आहे.

ॲड. पालेकर म्हणाले, नगर नियोजन, पंचायत, साधन सुविधा विकास मंडळ, सार्वजनिक बांधकाम खाते, पंचायत या सर्वांना बाजूला ठेऊन सर्व अधिकार गोवा इन्व्हेस्टमेंट प्रमोशन अँड फॅसिलिटेशन ऑफ सिंगल विंडो क्लिअरन्स विधेयकाकडे जाणार आहे. याचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असणार तसेच सदस्य हे मुख्यमंत्र्याच्या जवळचे असणार. या विधेयकामुळे प्रकल्पांना स्थानिक लोकांना तसेच पंचायतीला विराेध करता येणार नाही. त्यामुळे हे विधेयक खूप घातक आहे. सरकारचा डोळा फक़्त गाेव्याच्या जमिनी हडप करणे आहे हे या अधिवेशनात दिसून आले, असे ते म्हणाले.

वाल्मिकी नाईक म्हणाले, सरकार फक्त जनहित विरोधी विधेयक आणून राज्यातील जमिनी लुटण्याचा प्रयत्न करत आहे. पण या ३३ आमदारांना ७ विरोधी आमदारांनी धडा शिकवला. त्यांनी विरोध केल्याने सरकार अशी नको असलेली विधेयक मंजूर करु शकली नाही. सरकार फक़्त राज्यातील जमिनी नष्ट करु पाहत आहेत हे दिसून आले. पण या अधिवेशनात खरोखरच आपचे आमदार तसेच इतर विरोधी आमदारांनी चांगली कामगिरी केली. सरकारचे विविध भ्रष्टाचार तसेच अन्य कारनामे विधानसभेत मांडले हीच खारी लाेकशाही आहे, असे ते म्हणाले.वाल्मिकी म्हणाले मुख्यमंत्री डॉ. प्रमाेद सावंत यांनी अधिवेशनात प्रत्येक वेळी आपचे अध्यक्ष व दिल्लीचे आमदार अरविंद केजरीवाल यांच्यावर काही आरोप केले आहेत त्याचा आम्ही पक्षातर्फे निषेध करता.

टॅग्स :goaगोवाAAPआपBJPभाजपा