शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

भाजप ओबीसीविरोधी पक्ष; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 08:53 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) दबावाखाली भाजपने इतर मागासवर्गीय समाजातील नेत्यांना संपवण्याचे षडयंत्र रचले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसाः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) दबावाखाली भाजपने इतर मागासवर्गीय समाजातील नेत्यांना संपवण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील ८ आमदारांना भाजपत प्रवेश देण्यात आला, असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

काँग्रेसमधून भाजपत गेलेले मंत्री रवी नाईक, सुभाष शिरोडकर यासारख्या मोठ्या नेत्यांना पक्षात काही काम नसल्याने त्यांच्या प्रवेशापासून ते आतापर्यंत दिसून आले आहे. भाजपतील ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना पक्षाकडून मिळत असलेली वागणूक जगजाहीर असल्याने या पक्षाने ओबीसी संपवण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केली.

गेल्या आठवड्यात भाजपतील काही नेत्यांनी म्हापशात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची स्तुती करताना या स्तुती आडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान केल्याचा आरोप केला होता. केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना चोडणकर यांनी भाजपच्या या कृतीचा निषेध केला आहे. राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान कशा पद्धतीने केला हे त्यांच्या नेत्यांनी दाखवून द्यावे, असेही ते म्हणाले. भाजप हा आरएसएसच्या दबावाखाली वागत असून ओबीसी समाजाविरोधात वागणारी आरएसएस ही संघटना असल्याचाही आरोप चोडणकर यांनी यावेळी बोलताना केला.

काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी भाजपवर टीका करताना भाजपने वेळोवेळी ओबीसींवर खोटे प्रेम असल्याचे दाखवून दिले आहे.

- देशात काँग्रेसमुळे आरक्षण लागू झाले असून आरक्षणाद्वारे समानता लागू करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. उलट भाजपला आरक्षणविरोधी असलेला पक्ष असून त्यांना आरक्षण लागू करण्याची इच्छा असती, तर गोवा विद्यापीठ, गोवा वैद्यकीय महाविद्यालय दंत महाविद्यालयासारख्या ठिकाणी आरक्षण लागू केले असते, असेही गिरीश चोडणकर यांनी निदर्शनाला आणून दिले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस