शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

भाजप ओबीसीविरोधी पक्ष; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2023 08:53 IST

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) दबावाखाली भाजपने इतर मागासवर्गीय समाजातील नेत्यांना संपवण्याचे षडयंत्र रचले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क म्हापसाः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) दबावाखाली भाजपने इतर मागासवर्गीय समाजातील नेत्यांना संपवण्याचे षडयंत्र रचले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षातील ८ आमदारांना भाजपत प्रवेश देण्यात आला, असा आरोप काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला आहे.

काँग्रेसमधून भाजपत गेलेले मंत्री रवी नाईक, सुभाष शिरोडकर यासारख्या मोठ्या नेत्यांना पक्षात काही काम नसल्याने त्यांच्या प्रवेशापासून ते आतापर्यंत दिसून आले आहे. भाजपतील ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांना पक्षाकडून मिळत असलेली वागणूक जगजाहीर असल्याने या पक्षाने ओबीसी संपवण्याचा कट रचल्याचा आरोप त्यांनी केली.

गेल्या आठवड्यात भाजपतील काही नेत्यांनी म्हापशात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची स्तुती करताना या स्तुती आडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान केल्याचा आरोप केला होता. केलेल्या आरोपाला प्रत्युत्तर देताना चोडणकर यांनी भाजपच्या या कृतीचा निषेध केला आहे. राहुल गांधी यांनी ओबीसींचा अपमान कशा पद्धतीने केला हे त्यांच्या नेत्यांनी दाखवून द्यावे, असेही ते म्हणाले. भाजप हा आरएसएसच्या दबावाखाली वागत असून ओबीसी समाजाविरोधात वागणारी आरएसएस ही संघटना असल्याचाही आरोप चोडणकर यांनी यावेळी बोलताना केला.

काँग्रेस नेते अमरनाथ पणजीकर यांनी भाजपवर टीका करताना भाजपने वेळोवेळी ओबीसींवर खोटे प्रेम असल्याचे दाखवून दिले आहे.

- देशात काँग्रेसमुळे आरक्षण लागू झाले असून आरक्षणाद्वारे समानता लागू करण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. उलट भाजपला आरक्षणविरोधी असलेला पक्ष असून त्यांना आरक्षण लागू करण्याची इच्छा असती, तर गोवा विद्यापीठ, गोवा वैद्यकीय महाविद्यालय दंत महाविद्यालयासारख्या ठिकाणी आरक्षण लागू केले असते, असेही गिरीश चोडणकर यांनी निदर्शनाला आणून दिले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस