शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

भाजपला मिळाले चर्चिलचे बळ; लोकसभेसाठी जाहीर केला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 10:36 IST

दोन्ही जागा भाजप जिंकणार आलेमाव यांच्याकडून दावा

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : येत्या लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजपलाच मिळणार, असा दावा करून माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दक्षिणेत भाजपचे चर्चिलच्या रूपाने बळ आणखी वाढले आहे.

शनिवारी आलेमाव यांनी वार्का येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गुणगान गाताना त्यांना डायनॅमिक मुख्यमंत्री असे संबोधले. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या ५० व्या वाढदिनानिमित्त त्यांनी शुभेच्छाही दिल्या. प्रमोद सावंत असेपर्यंत माझा पाठिंबा भाजपला, असेही त्यांनी सांगून टाकले. बाणावली मतदारसंघाचा आमदार असताना भाजप सरकारच्या मदतीनेच आपण या मतदारसंघात भरीव विकासकामे केली. त्याबाबत आपण भाजपचा उपकृत असल्याचेही आलेमाव यांनी सांगितले. 

बाणावली मतदारसंघात आपण २०० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केली. सुरेश प्रभू हे केंद्रीय रेल्वेमंत्री असताना ते गोव्यात आले होते. त्यावेळी त्यांना आपण भेटून सुरावली अंडरपासच्या कामाबाबत मागणी केली असता त्यांनी ती तत्काळ संमत केली होती, याची आठवणही त्यांनी काढली. प्रमोद सावंत तसेच स्व. मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात विकासकामे राबविली.

आपण आमदार असताना बाणावलीत जी विकासकामे केली तीच सध्या या मतदारसंघात दिसत आहेत. सध्याचे आमदार फेसबुक आमदार असल्याचा टोलाही हाणताना मुख्यंमत्र्यांना तो साखळी मतदारसंघाबाबत चॅलेज करत असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. भाजप सरकारला आपण पाठिंबा दिला म्हणून गत विधानसभा निवडणुकीत आपण हरलो, असे आलेमाव म्हणाले.

लोकसभेसाठी अनेकांची गळ

लोकसभा लढविण्यास आपण इच्छुक आहेत का? असे विचारले असता, त्याबाबत काही ठरले नसल्याचे आलेमाव म्हणाले. लोक त्यावर निर्णय घेतील. कमला लोकसभा निवडणूक लढविण्याची गळ घालत आहेत. मी दोनदा लोकसभा खासदार झालो आहे. त्यावेळी खासदारांना वर्षाला एक कोटी रुपये मिळत होते. आता खासदार निधीतून एका वर्षाला ५ कोटी मिळतात, विकासकामे मात्र दिसत नाहीत. हा निधी गेला कुठे, असा सवालही त्यांनी केला.

भाजप प्रवेशाचे नंतर बघू

भाजपचे तोंड भरून कौतुक करणारे चर्चिल आलेमाव यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार आहे का, असे विचारले तेव्हा त्यांनी त्याबाबतीत सध्या काहीच विचार नसल्याचे सांगून वेळ आल्यावर बघू, असे सांगून विषय संपवला.

काँग्रेस संपल्यात जमा

मुख्यंमत्री सावंत यांनी जी विकासकामे केली आहेत ती काँग्रेस ४० वर्षेही करू शकणार नाही. काँग्रेस आता संपली आहे, ती निद्रिस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरातील ३७० कलम हटविले. चांगले काम त्यांनी केले. देशात आज शांतता आहे. या शांततेमुळे विदेशी लोक भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण