शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

भाजपला मिळाले चर्चिलचे बळ; लोकसभेसाठी जाहीर केला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2023 10:36 IST

दोन्ही जागा भाजप जिंकणार आलेमाव यांच्याकडून दावा

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : येत्या लोकसभा निवडणुकीत गोव्यातील दोन्ही जागा भाजपलाच मिळणार, असा दावा करून माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपला आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे दक्षिणेत भाजपचे चर्चिलच्या रूपाने बळ आणखी वाढले आहे.

शनिवारी आलेमाव यांनी वार्का येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे गुणगान गाताना त्यांना डायनॅमिक मुख्यमंत्री असे संबोधले. मुख्यमंत्र्यांना त्यांच्या ५० व्या वाढदिनानिमित्त त्यांनी शुभेच्छाही दिल्या. प्रमोद सावंत असेपर्यंत माझा पाठिंबा भाजपला, असेही त्यांनी सांगून टाकले. बाणावली मतदारसंघाचा आमदार असताना भाजप सरकारच्या मदतीनेच आपण या मतदारसंघात भरीव विकासकामे केली. त्याबाबत आपण भाजपचा उपकृत असल्याचेही आलेमाव यांनी सांगितले. 

बाणावली मतदारसंघात आपण २०० कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केली. सुरेश प्रभू हे केंद्रीय रेल्वेमंत्री असताना ते गोव्यात आले होते. त्यावेळी त्यांना आपण भेटून सुरावली अंडरपासच्या कामाबाबत मागणी केली असता त्यांनी ती तत्काळ संमत केली होती, याची आठवणही त्यांनी काढली. प्रमोद सावंत तसेच स्व. मनोहर पर्रीकर यांनी गोव्यात विकासकामे राबविली.

आपण आमदार असताना बाणावलीत जी विकासकामे केली तीच सध्या या मतदारसंघात दिसत आहेत. सध्याचे आमदार फेसबुक आमदार असल्याचा टोलाही हाणताना मुख्यंमत्र्यांना तो साखळी मतदारसंघाबाबत चॅलेज करत असल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला. भाजप सरकारला आपण पाठिंबा दिला म्हणून गत विधानसभा निवडणुकीत आपण हरलो, असे आलेमाव म्हणाले.

लोकसभेसाठी अनेकांची गळ

लोकसभा लढविण्यास आपण इच्छुक आहेत का? असे विचारले असता, त्याबाबत काही ठरले नसल्याचे आलेमाव म्हणाले. लोक त्यावर निर्णय घेतील. कमला लोकसभा निवडणूक लढविण्याची गळ घालत आहेत. मी दोनदा लोकसभा खासदार झालो आहे. त्यावेळी खासदारांना वर्षाला एक कोटी रुपये मिळत होते. आता खासदार निधीतून एका वर्षाला ५ कोटी मिळतात, विकासकामे मात्र दिसत नाहीत. हा निधी गेला कुठे, असा सवालही त्यांनी केला.

भाजप प्रवेशाचे नंतर बघू

भाजपचे तोंड भरून कौतुक करणारे चर्चिल आलेमाव यांना भाजपमध्ये प्रवेश करण्याचा विचार आहे का, असे विचारले तेव्हा त्यांनी त्याबाबतीत सध्या काहीच विचार नसल्याचे सांगून वेळ आल्यावर बघू, असे सांगून विषय संपवला.

काँग्रेस संपल्यात जमा

मुख्यंमत्री सावंत यांनी जी विकासकामे केली आहेत ती काँग्रेस ४० वर्षेही करू शकणार नाही. काँग्रेस आता संपली आहे, ती निद्रिस्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मिरातील ३७० कलम हटविले. चांगले काम त्यांनी केले. देशात आज शांतता आहे. या शांततेमुळे विदेशी लोक भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण