शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
प्रकाश महाजन शिंदेसेनेत प्रवेश करणार, एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार पक्षप्रवेश
3
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
4
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू तरुणाची हत्या, भरबाजारात मारहाण करून घेतला जीव
5
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
8
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
9
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
10
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
11
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
12
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
13
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
14
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतच होते बिरिंग, सैगल?

By admin | Updated: January 18, 2015 01:41 IST

रुबी दुर्घटना : क्राईम ब्रँचकडूनही तपास

मडगाव : काणकोणातील दुर्घटनाग्रस्त रुबी इमारतीचे बिल्डर परदीपसिंग बिरिंग व जगदीप सैगल हे दोघे दुर्घटना घडल्यानंतर इंग्लंडला पळून गेले होते, की त्यांचे वास्तव्य मुंबईत होते, हा प्रश्न या दोन्ही बिल्डरच्या अटकेनंतर पुन्हा चर्चेत आला आहे. हे दोन्ही बिल्डर इंग्लंडला असल्याचा बहाणा करून भारतातच राहिले होते आणि गेले वर्षभर ते गोवा पोलिसांना हुलकावणी देत होते. सैगल व बिरिंग या दोघांना शुक्रवारी वाशी-मुंबई येथे अटक केली होती. शनिवारी त्यांना गोव्यात आणल्यानंतर पणजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. या दोघांची चौकशी करण्यासाठी त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा रिमांड देण्यात आल्याची माहिती या प्रकरणातील तपास अधिकारी असलेले पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर यांनी दिली. हे दोन्ही बिल्डर खरेच विदेशात गेले होते का, याबाबत गोवा पोलीसही तपास करीत आहेत. गेले वर्षभर त्यांचे वास्तव्य कुठे होते आणि ते मुंबईला कसे आले, याची चौकशी करण्यासाठीच आम्ही त्यांचा रिमांड घेतला आहे, असे देऊलकर म्हणाले. पोलिसांच्या दाव्याप्रमाणे, मुंबईत या बिल्डरांचे एक मोठे डील व्हायचे आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक सिद्धांत शिरोडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने छापा घालून या दोघांना अटक केली होती. ४ जानेवारी २0१४ रोजी काणकोणात रुबी इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत ३२ कामगार ठार झाले होते, तर २४ जण जखमी झाले होते. ज्या दिवशी ही इमारत कोसळली, त्याच सायंकाळी बिरिंग व सैगल यांनी काणकोणातून पलायन केले होते. या एका वर्षानंतर अगदी आरोपपत्र दाखल करण्याची तयारी चालू असतानाच या दोन्ही बिल्डरांना झालेली अटक काहीशी संशयास्पद आहे. यापूर्वी क्राईम ब्रँचकडून न्यायालयाला हे दोन्ही एनआरआय बिल्डर इंग्लंडमध्ये लपून बसल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर बिरिंग याचा पत्ता इंग्लंडमध्ये सापडल्याचेही जाहीर करण्यात आले होते. त्याच्या प्रत्यार्पणासाठी तयारी सुरू करणार, असेही सांगण्यात आले होते. जर हे दोन्ही बिल्डर इंग्लंडमध्ये होते आणि त्यांच्याविरुद्ध जगातील सर्व एअरपोर्टवर रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती, तर हे दोन्ही बिल्डर इंग्लंडहून मुंबईला कसे आले, हा प्रश्न निर्माण झाला आहे. समाजकार्यकर्ते अ‍ॅड. आयरिश रॉड्रिगीस यांनी आपल्या ट्विटमध्ये, ‘ही अटक बनावट असून दोन्ही आरोपी मुद्दामहून पोलिसांना शरण आले आहेत,’ असे म्हटले आहे. ते जर शरण आले नसते, तर त्यांच्या मालमत्तांवर टाच आणली गेली असती. आपली मालमत्ता हातची जाऊ नये, यासाठीच ते शरण आले आहेत, असे ते म्हणाले. या प्रकरणात लवकरच आरोपपत्र दाखल केले जाणार आहे. या प्रकरणातील इतर सर्व आरोपी यापूर्वीच जामीनमुक्त झाले आहेत. त्यामुळे त्याच धर्तीवर या दोघांनाही जामीन मिळण्याची शक्यता असल्यानेच आता ते शरण आले आहेत, असे रॉड्रिगीस म्हणाले. (प्रतिनिधी)