शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

भंडारींच्या चळवळीची व्याप्ती वाढली; काँग्रेस नेत्यांना भेटले शिष्टमंडळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:01 IST

ओबीसींच्या जातनिहाय गणनेसाठी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: ओबीसींच्या जातनिहाय गणनेसाठी भंडारी समाजाच्या चळवळीची व्याप्ती आता वाढली आहे. समाजाच्या नेत्यांनी काल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचीही भेट घेतली. विधानसभेत खासगी ठराव आणण्याचे आश्वासन युरी यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

दुसरीकडे या चळवळीची भाजपनेही गंभीर दखल घेतल्याचे दिसत असून प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी कृषिमंत्री रवी नाईक यांची भेट घेऊन भंडारी समाज पक्षापासून दूर जाऊ नये यासाठी चर्चा केली. रवी हे या समाजाचे खंदे नेते मानले जातात. दोघांमधील चर्चेत या प्रश्नावर ठोस धोरण ठरवण्याबाबत चर्चा विनिमय झाला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना भेटलेल्या शिष्टमंडळात माजी मंत्री महादेव नाईक, माजी आमदार किरण कांदोळकर, माजी आमदार श्याम सातार्डेकर, तारक आरोलकर, रोहन नाईक आदींचा समावेश होता.

या भेटीनंतर 'लोकमत'शी बोलताना कांदोळकर म्हणाले की, आम्ही दोघांनाही निवेदन देऊन आमची मागणी मांडलेली आहे. युरी यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात या विषयावर खासगी ठराव आणण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे. २०११ साली चुकीची जनगणना झाली होती. २०२१ साली कोविडमुळे ती होऊ शकली नाही. आता नव्याने होणारी जनगणना जातनिहाय केली जावी. ओबीसींच्या बाबतीत जातनिहाय गणना करावी, अशी आमची मागणी आहे. जनगणनेसाठी बाहेरील एजन्सी आम्हाला नकोय. त्याऐवजी बीएलओची मदत घ्यावी, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असते, असेही कांदोळकर म्हणाले.

माजी मंत्री, आमदार यांचीच जास्त धडपड!

भंडारी नेत्यांचे शिष्टमंडळ यापूर्वी आमदार विजय सरदेसाई तसेच मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनाही भेटलेले आहे. या चळवळीत भाजपच्या माजी मंत्री, आमदारांचीच जास्त धडपड दिसून येते. माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक तसेच माजी आमदार किरण कांदोळकर यात सक्रिय आहेत. या चळवळीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचेही बारकाईने लक्ष आहे. ही चळवळ २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अस्तित्वातराहील की नाही, हे पहावे लागेल.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस