शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भंडारींच्या चळवळीची व्याप्ती वाढली; काँग्रेस नेत्यांना भेटले शिष्टमंडळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 13:01 IST

ओबीसींच्या जातनिहाय गणनेसाठी विधानसभेत आवाज उठविण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: ओबीसींच्या जातनिहाय गणनेसाठी भंडारी समाजाच्या चळवळीची व्याप्ती आता वाढली आहे. समाजाच्या नेत्यांनी काल विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांचीही भेट घेतली. विधानसभेत खासगी ठराव आणण्याचे आश्वासन युरी यांनी शिष्टमंडळाला दिले आहे.

दुसरीकडे या चळवळीची भाजपनेही गंभीर दखल घेतल्याचे दिसत असून प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी कृषिमंत्री रवी नाईक यांची भेट घेऊन भंडारी समाज पक्षापासून दूर जाऊ नये यासाठी चर्चा केली. रवी हे या समाजाचे खंदे नेते मानले जातात. दोघांमधील चर्चेत या प्रश्नावर ठोस धोरण ठरवण्याबाबत चर्चा विनिमय झाला. विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांना भेटलेल्या शिष्टमंडळात माजी मंत्री महादेव नाईक, माजी आमदार किरण कांदोळकर, माजी आमदार श्याम सातार्डेकर, तारक आरोलकर, रोहन नाईक आदींचा समावेश होता.

या भेटीनंतर 'लोकमत'शी बोलताना कांदोळकर म्हणाले की, आम्ही दोघांनाही निवेदन देऊन आमची मागणी मांडलेली आहे. युरी यांनी आगामी विधानसभा अधिवेशनात या विषयावर खासगी ठराव आणण्याचे आश्वासन आम्हाला दिले आहे. २०११ साली चुकीची जनगणना झाली होती. २०२१ साली कोविडमुळे ती होऊ शकली नाही. आता नव्याने होणारी जनगणना जातनिहाय केली जावी. ओबीसींच्या बाबतीत जातनिहाय गणना करावी, अशी आमची मागणी आहे. जनगणनेसाठी बाहेरील एजन्सी आम्हाला नकोय. त्याऐवजी बीएलओची मदत घ्यावी, कारण त्यांना प्रत्येक गोष्टीची माहिती असते, असेही कांदोळकर म्हणाले.

माजी मंत्री, आमदार यांचीच जास्त धडपड!

भंडारी नेत्यांचे शिष्टमंडळ यापूर्वी आमदार विजय सरदेसाई तसेच मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनाही भेटलेले आहे. या चळवळीत भाजपच्या माजी मंत्री, आमदारांचीच जास्त धडपड दिसून येते. माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक तसेच माजी आमदार किरण कांदोळकर यात सक्रिय आहेत. या चळवळीवर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचेही बारकाईने लक्ष आहे. ही चळवळ २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अस्तित्वातराहील की नाही, हे पहावे लागेल.

 

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेस