शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सावधान ... वर्षसमाप्ती अपघातात होतेय वाढ: वाहन चालविता संयम बाळगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 16:54 IST

नाेव्हेंबर महिन्यात १५ जणांचे अपघातात मृत्यू झाले आहे. तर अनेक जण गंभीर जखमी होऊ उपचार घेत आहेत.

नारायण गावस,पणजी: राज्यात सध्या अपघातांची मालीका सुरु असून वर्ष समाप्तीला अपघातात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नाेव्हेंबर महिन्यात १५ जणांचे अपघातात मृत्यू झाले आहे. तर अनेक जण गंभीर जखमी होऊ उपचार घेत आहेत. आता डिसेंबर सुरु होताच ४ जणांचा अपघाताने मृत्यू झाला आहेत. आता नवीन वर्ष सुरुवात हाेणार असल्याने राज्यात पर्यटकांची संख्याही वाढली अनेक पार्ट्या महोत्सव सुरु असल्याने रस्त्यावर भरधाव वेगाने दारुच्या नशेत गाड्या हाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहन चालविताना अती घाई न करता संयम बाळगणे गरजेचे आहे.

पर्यटकांच्या संख्येत वाढ-

राज्यात नाेव्हेबर, डिसेबर व जानेवारी या तीन महिन्यात दुप्पट पर्यटक दाखल होत असतात. रेंट अ बाईक व रेंट अ कारच्या गाड्या घेऊन राज्याची भृमंती करतात. पण अनेक पर्यटक हे रस्त्यावरील नियमांचे पालन करत नाही. दारुच्या नशेत गाड्या भरवेगाने चालवितात. रस्त्यावर लावलेल्या वाहतूक फलकावरील नियमांचे पालन करत नाहीत. पर्यटकांच्या मौजमजेमुळे ते स्वत:चा जीव घालवतात पण इतर निरअपराधी लोकांचाही बळी घेतात. त्यामुळे सध्या रस्त्यावर वाहतूक चालविताना आपण स्वाताहून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

रस्त्यावरील वाहनांमध्ये वाढ -

राज्यात अनेक महोत्सव व पार्ट्या होत असल्याने अनेक देशी विदेशी पर्यटक गोव्यात येत आहेत. देशभरातून गाड्या राज्यात दाखल होत आहेत. राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ तसेच प्रमुख रस्त्यावर गाड्या चालविण्यासाठी जागाही नसते. माेठ्या प्रमाणात वाहतूक काेंडी होत असते. वाहतूक पाेलीसांची कमतरता असल्याने असे जे नियम ताेडतात त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही. हे दारु पिऊन गाडी चालविणाऱ्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात