शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँडला शह देण्यासाठी रणनीती, मुंबईत एकत्र लढेल महायुती! 'प्लॅन बी'चीही तयारी...
2
बांगलादेशच्या मोहम्मद युनूस यांचे सूर बदलले, म्हणाले, 'भारताचे मनापासून आभार...', नेमकं कारण काय?
3
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
4
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा
5
देशातील सर्वात स्वस्त ईलेक्ट्रीक कार १५००० रुपयांनी महागली; वर्षात तिसऱ्यांदा वाढ...
6
भारतीय सैन्यापेक्षा ISI वर जास्त विश्वास; चिदंबरम यांच्या पहलगामबाबत केलेल्या वक्तव्यावर भाजपचा संताप
7
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
8
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!
9
गरोदरपणात सुचली कल्पना! फक्त ६० हजारांच्या गुंतवणुकीतून 'या' जोडप्याने कमावले ५ कोटी!
10
Uorfi Javed : बारीक दिसण्यासाठी जेवणं सोडलं, उपाशी राहिली अन्...; उर्फी जावेदने 'या' आजाराचा केला सामना
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा तामिळनाडू दौरा; महान चोल साम्राज्याचा उल्लेख करत म्हणाले...
12
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
13
Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!
14
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
15
"...तर मी त्यांना १०० रुपये देतो", सचिन पिळगावकर आजही आवर्जुन करतात 'ही' गोष्ट, म्हणाले- "ते पैसे लोक फ्रेम करून..."
16
१३ हजारांत १०८ MP कॅमेरा, ६५००mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; नोकियाच्या नव्या फोनची चर्चा!
17
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
18
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
19
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?

नोकरी प्रक्रियेतील गुप्तता टाळा; घोटाळे थांबतील: उत्पल पर्रीकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2024 08:04 IST

मेरिट लिस्ट जनतेसमोर ठेवा अन् उत्तरपत्रिकाही खुली करा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : नोकऱ्या देताना उमेदवारांची गुणवत्ताच लक्षात घ्यायला हवी. गुणवत्तेच्या आधारे सरकारी नोकरी द्यायला हवी. मेरिट लिस्ट तयार करून ती लिस्ट जनतेसमोर ठेवावी, तरच नोकरी घोटाळे भविष्यात टळतील, अन्यथा घोटाळ्यांची पुनरावृत्ती होण्याचा धोका कायम राहील, अशी प्रतिक्रिया उत्पल मनोहर पर्रीकर यांनी गुरुवारी व्यक्त केली.

सरकारी नोकऱ्यांची प्रक्रिया पारदर्शक करावी लागेल. त्यासाठी बारावीच्या परीक्षेप्रमाणे पद्धत स्वीकारावी लागेल. गुणवत्ता यादी ही पारदर्शक असावी लागेल. उत्तरपत्रिका व मेरिट लिस्ट हे खुले करावे लागेल, ते गुप्त ठेवू नये. एखाद्याला जर मुलाखत व परीक्षेनंतरही सरकारी नोकरी मिळाली नाही तर त्याला उत्तरपत्रिका, मेरिट लिस्ट वगैरे पाहता यायला हवे. नोकरी प्रक्रियेस आव्हान देता यायला हवे, उमेदवारासाठी तशी सोय हवी. जर नोकरी प्रक्रिया उघड व पारदर्शक झाली नाही तर सरकारी पातळीवरील घोटाळे टाळता येणार नाहीत, असे उत्पल पर्रीकर 'लोकमत'शी बोलताना म्हणाले.

प्रक्रिया खुली झाली तरच भरतीला अर्थ...

नोकरभरतीसाठी राज्य कर्मचारी निवड आयोग ही कल्पना योग्य आहे, पण त्या आयोगाची प्रक्रियाही खुली व पारदर्शक करावी लागेल. जर तिथे सगळे काही गुप्त पद्धतीने घडू लागले व उमेदवारांना मेरिट लिस्ट किंवा उत्तरपत्रिका पाहण्याची व्यवस्था नसेल तर मग घोटाळ्यांची शक्यता आहे. त्यामुळे नोकरीची पद्धत स्पष्ट, उघड व पारदर्शक करावी लागेल. मेरिट लिस्ट जर आयोगाने तयार केली व त्यात कुणाची लुडबूड झाली नाही तरच घोटाळे थांबू शकतील, असेही उत्पल म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाUtpal Parrikarउत्पल पर्रिकर