शहरं
Join us  
Trending Stories
1
Tejas Fighter Jet Crashed : भारताचे लढाऊ विमान तेजस कोसळले, दुबई एअर शो दरम्यान मोठी दुर्घटना; अपघात कॅमेऱ्यात कैद
2
मोठी बातमी! इस्रायलचे पंतप्रधान बेजामिन नेतान्याहून भारत दौऱ्यावर येणार, जुनी दोस्ती आणखी घट्ट होणार
3
ना थांबा, ना विश्रांती… गरुडाचा ६१०० किलोमीटर प्रवास थक्क करणारा; आशियातून आफ्रिकेत ६ दिवसांत पोहोचला
4
'माझ्याकडून हे SIR चे काम होणार नाही...' गुजरातमध्ये बीएलओ शिक्षकाने आयुष्य संपविले, देशातील आठवा...
5
BSNL ने किंमत न वाढवताही प्लॅन्स केले महाग; 'या' लोकप्रिय रिचार्ज प्लॅन्सची व्हॅलिडिटी घटवली!
6
टाटा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले; फक्त एकाच क्षेत्रात वाढ, गुंतवणूकदारांचे ₹४.३० लाख कोटी पाण्यात!
7
बर्फ, दलदल, वाळवंट अन् पाणी..; कुठेही चालण्यास सक्षम, भारतीय सैन्याला मिळणार BvS10 सिंधू आर्मर्ड व्हेईकल
8
Malegaon Dongrale: चिमुकलीवर अत्याचार, लोकांच्या संतापाचा कडेलोट; थेट न्यायालयात शिरण्याचा प्रयत्न, पोलिसांचा लाठीचार्ज
9
"तेव्हा कुणी आलं नाही, आता स्टंटबाजी करायला आले, पण मी मारहाण...", भाजपच्या माजी नगरसेवकांने सांगितलं काय घडलं?
10
सावधान! क्रोम युजर्सना मोठा धोका, गुगलने जारी केली सिक्योरिटी वार्निंग, वेळीच व्हा अलर्ट
11
VIDEO: क्रिकेटच्या पिचवर पडली विकेट! पलाशनं कायम 'स्मृती'त राहिल असं केलं हटके प्रपोज
12
कर्नाटक सरकारमध्ये बदल होणार! डीके शिवकुमार यांच्या समर्थकांच्या हालचाली वाढल्या, काही आमदार दिल्लीत तळ ठोकून
13
उपमुख्यमंत्रिपदाची मागणी का केली नाही? चिराग म्हणाले- मी लालची नाही; मिळाले त्यात समाधानी
14
करिश्मा कपूरनं मुंबईतील १ फ्लॅट भाड्याने दिला; दर महिन्याला किती होणार कमाई? वाचा
15
'नवीन भाडे करार २०२५' : अ‍ॅडव्हान्स म्हणून घेता येईल फक्त २ महिन्यांचे भाडे; घरमालक वाढवू शकणार नाही मनमानी पद्धतीनं भाडं
16
लुटेरी दुल्हन! वय २४ वर्षे अन् केली १५ लग्न; ५२ लाखांचा गंडा, नवऱ्याला सोडून जाते पळून अन्...
17
अरे बापरे सेम टू सेम! हुबेहुब आलिया भटसारखी दिसते ही मराठी अभिनेत्री, फोटो पाहून चक्रावून जाल
18
३ वर्षांचे प्रेमसंबंध आणि लग्न करायला नकार! रागाच्या भरात प्रियकर झाला मारेकरी; दोन वेळा गोळ्या झाडल्या पण... 
19
दिल्ली स्फोट प्रकरणी मोठा खुलासा! 'घरघंटी'च्या मदतीने बनवले होते बॉम्ब; साहित्य जप्त केले
20
IND vs SA 2nd Test: 'आमचं ठरलंय!' गिलच्या जागी कोण? कॅप्टन पंतनं उत्तर दिलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

रस्ते तरी दुरुस्त करा ना; गोमंतकीयांना मूलभूत सुविधा देणारी यंत्रणा नको

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 10:36 IST

जीएसटी दर थोडा कमी झाला म्हणून उत्सव साजरे करणारे सत्ताधारी रस्त्यांवरील खड्डेदेखील वेळेत बुजवू शकत नाहीत काय?

गोवा सरकार एरवी कोट्यवधी रुपयांचा खर्च साध्या सोहळ्यावर करत असते. शेकडो कोटी खर्चुन तथाकथित विकासही केला जातो. हजारो झाडे कापली जातात. कुठे आयआयटी प्रकल्प आणण्यासाठी दहा ते चौदा लाख चौरस मीटर क्षेत्रफळाची जागाही निश्चित केली जाते. उड्डाण पूल बांधले जातात, महामार्ग रुंद केले जातात. सरकारला पायाभूत सुविधांच्या निर्माणाबाबत पुरस्कारही मिळतात. दिल्लीपर्यंत जाऊन पाठ थोपटून घेतली जाते. मग या छोट्या राज्यातील रस्त्यांबाबत जनतेला रोज का रडावे लागते? मुख्यमंत्री प्रमोद सावंत व नवे बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी यावर तातडीने विचार करावा. केवळ पावसाकडे बोट दाखवून जबाबदारी टाळता येणार नाही. पाऊस थांबला तरी, रस्ते नीट केले जात नाहीत, हा गोमंतकीयांचा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. 

जीएसटी दर थोडा कमी झाला म्हणून उत्सव साजरे करणारे सत्ताधारी रस्त्यांवरील खड्डेदेखील वेळेत बुजवू शकत नाहीत काय? गेल्या दोन महिन्यांत खराब रस्त्यांमुळे राज्यात अनेक अपघात झाले. खड्ड्यात दुचाकी पडून एक-दोघांचे जीवदेखील गेले. बाकी कारणांमुळेही रस्त्यांवर रोज अपघात होतच असतात. गणेश चतुर्थीवेळी रस्ते ठीक करण्याची सरकारची जबाबदारी होती. खड्डेमय रस्त्यांवरून आणि खड्ड्यांत भरलेल्या पाण्यातून वाहन चालविताना चालकांना खूप त्रास होतो. पंचतारांकित जीवन जगणाऱ्या मंत्रिमंडळाला हे कळणार नाही, पण रोज दुचाकीने कामाला जाणाऱ्या-येणाऱ्या गरिबांना सगळे हाल सहन करावे लागतात. अनेकजण गप्प राहतात, कारण ओरड करून काही होत नाही. उलट काही सत्ताधारी राग मात्र काढतात. सध्या रामा कोणकोणकर हल्ला प्रकरण गाजतेय. तो विषय वेगळा असला तरी, लोकांमध्ये अगोदरच सत्तेविरुद्ध राग आहे हे लक्षात घ्यावे लागेल. मास्टरमाइंड म्हणून लोक कुठे बोट दाखवतात तेही सरकारला ठाऊक आहे. विविध ठिकाणी लोक ढासळत्या कायदा सुव्यवस्थेविरुद्ध मेणबत्ती मोर्चा काढत आहेत. रामासाठी ज्यांनी आंदोलन केले, त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी एफआयआर नोंद केला. 

गोंयकारांना वीज, पाणी, चांगले रस्ते अशा मूलभूत सुविधा देण्याबाबतही अपयशी ठरणारी सरकारी यंत्रणा नको त्या विषयात मात्र जास्त सक्रिय होते, असा अनुभव अनेकदा येतो. गोव्यातील कोणत्याही शहरात वा गावात चला, रस्त्यांची दुर्दशाच दिसून येते. आम आदमी पक्षाने निदान याविरुद्ध आंदोलन तरी केले. विरोधी पक्षांनी सक्रियता दाखवली तर लोक धन्यवादच देतील. विरोधी पक्ष आपापसांत भांडत राहिले तर सामान्य माणूसदेखील भेदरून जाईल. कारण जनतेला नेतृत्व देऊ शकेल असे सक्षम नेते आता विरोधकांमध्ये अत्यल्प आहेत. आम आदमी पक्षाने जनतेमधून एक लाख सह्यांचे निवेदन तयार करून काल पर्वरीत मंत्रालयावर धडक दिली. तेव्हा रस्त्यांकडे लक्ष द्यायला हवे याची जाणीव सरकारला झाली. 

येत्या पंधरा दिवसांत रस्ते ठीक होतील असे आश्वासन सरकारने दिले आहे. रस्त्यांवर तात्पुरती डागडुजी करण्यासाठी सिमेंट आणून खड्ड्यात भरले जाते. काहीवेळा केवळ मातीदेखील भरली जाते, असे अनेक ठिकाणी दिसून आले. ही तात्पुरती डागडुजी टिकत नाही. पुन्हा पाऊस पडला की हेच खड्डे डोके वर काढतात. कंत्राटदार निकृष्ट दर्जाची कामे करत आहेत, याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याला जबाबदार धरावे लागेल. बांधकाम खात्याचा कारभार गेली काही वर्षे कसा चाललाय हे गोंयकारांना ठाऊक आहे. 

गोव्यात नोव्हेंबरनंतर एकदेखील खड्डा रस्त्यावर राहणार नाही, अशी घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी तीन वर्षांपूर्वी केली होती. दिगंबर कामत तेव्हा काँग्रेस पक्षात होते. मुख्यमंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे रस्ते ठीक झालेच नाहीत. नीलेश काब्रालदेखील मध्यंतरी बांधकाम मंत्रिपदी होते. मग हे खाते मुख्यमंत्र्यांकडे आले. आता दिगंबर कामत बांधकाम खात्याचे मंत्री आहेत. सगळी जनता पाहत आहे, दिगंबरबाब आणि मुख्यमंत्री सावंत या दोन्ही नेत्यांची आता कसोटी आहे. येत्या पंधरा दिवसांत रस्ते ठीक व्हायलाच हवेत. अन्यथा जनता पुन्हा जाब विचारील. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Fix Roads, Not Useless Systems: Goa Residents Demand Basic Amenities

Web Summary : Goa residents lament poor road conditions despite government spending on development. Accidents are frequent, and temporary fixes fail. Citizens demand better infrastructure and accountability from officials, urging immediate action within fifteen days.
टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारणState Governmentराज्य सरकार