शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगा, काँग्रेस आमदारांचे राज्यपालांना साकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 22:21 IST

काँग्रेस आमदारांच्या मागणीवर चार दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन राज्यपालांनी दिले आहे. 

पणजी : गोव्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून मंगळवारी काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल मृदुला सिन्हा यांची भेट घेऊन एक दिवसाचे खास विधानसभा अधिवेशन बोलवावे आणि सरकारला बहुमत सिध्द करण्यास सांगावे, अशी मागणी करत काँग्रेस बहुमत सिद्ध करायला तयार आहे, असे सांगितले. त्यावर, चार दिवसात आपण या मागणीवर निर्णय घेतो, असे आश्वासन राज्यपालांनी दिले आहे. आमदार रेजिनाल्द लॉरेन्स वगळता काँग्रेसचे पंधरा आमदार यावेळी उपस्थित होते. 

काँग्रेस आमदारांनी सुमारे दीड तास राज्यपालांसोबत चर्चा केली. सरकार अल्पमतात आलेले आहे. घटक पक्ष आघाडी सरकारबरोबर नाहीत, असा दावा करीत सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला निमंत्रण द्यावे, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली. विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांनी भेट घेऊन परतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्यपालांनी या मागणीवर चार दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिलेले आहे. राज्यातील आघाडी सरकारकडे बहुमत राहिलेले नाही. त्यामुळे सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे, अशी मागणी आम्ही केली आहे. काँग्रेसकडे सरकार स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा करताना कवळेकर म्हणाले की, ‘इतर पक्षांच्या आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा आहे.’ काँग्रेसमध्ये नेतृत्त्वावरुन मतभेद असल्याचा आरोप त्यांनी फेटाळून लावला. राज्यपालांनी सरकार स्थापनेची संधी दिल्यास नेता जाहीर करु, असेही ते म्हणाले.

विधानसभा विसर्जित करु नये किंवा राष्ट्रपती राजवटही लागू करु नये. त्याऐवजी काँग्रेसला सरकार स्थापनेची संधी द्यावी, अशी मागणी आम्ही केली आहे, असेही कवळेकर म्हणाले. भाजप सरकारचा पूर्वीचा इतिहास पाहता सरकार अस्थिरतेच्या गर्तेत आल्यावर एकतर विसर्जित करण्याची किंवा राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे कारस्थान केलेले आहे. 2002 साली असाच प्रकार राज्यात घडला होता. त्याची पुनरावृत्ती होऊ देऊ नका, तशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव आल्यास फेटाळून लावा. हे सरकार बडतर्फ करुन काँग्रेसला सत्ता स्थापनेची संधी द्या, अशी विनंती आम्ही राज्यपालांना केल्याचे कवळेकर यांनी सांगितले.  म्हादई, खाणबंदी, फॉर्मेलिनयुक्त मासळी आदी अनेक गंभीर विषय गाजत असताना सरकार सुस्त आहे. प्रशासन चालत नाही. प्रशासन कोलमडले आहे. विकासकामे ठप्प झालेली आहेत. केवळ महामार्गांचे तेवढे काम दिसते. राज्यात उर्वरित ठिकाणी कोणतीही विकासकामे झालेली नाहीत. मुख्यमंत्र्यांसह तीन आमदार आजारी असून सरकारचे कामच ठप्प झाले आहे आणि विकासाला खीळ बसला आहे, याकडेही काँग्रेसकडून राज्यपालांचे लक्ष वेधण्यात आले.  

टॅग्स :congressकाँग्रेसgoaगोवाBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकर