शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

पाणीबाणीतही लोकांच्या अनास्थेचे दर्शन; राज्यकर्त्यांना खडसावून सवाल कधी करणार आहोत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 18:40 IST

गोव्यात सात दिवस पाणी नव्हते. पाइपलाइन फुटली आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणातून लोकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. या काळात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना कुठे होत्या?

राजू नायकपाणी टंचाईने ग्रासलेल्या पणजी राजधानी व तिसवाडी तालुक्यातील जनतेला सरकार ज्याप्रमाणे आश्वस्त करू शकले नाही, त्याचप्रमाणे त्यांच्या वेदनेला वाचा फोडण्यास विरोधी पक्षांना अपयश आले. केवळ प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न लढविला. याचे कारण कॉँग्रेससारखा पक्ष सरकारची खुशामत करीत होता व ‘आप’ला सातव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ निदर्शने करायला मुहूर्त सापडला. तेव्हाही १० कार्यकर्ते व ५० पेक्षा जास्त पोलीस अशी परिस्थिती होती. विरोधी पक्षनेत्याने सरकारविरोधात ‘ब्र’ काढला नाही.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले, सार्वजनिक तिजोरीवर गलेलठ्ठ होणाऱ्या राजकीय नेत्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना लोक म्हणून आपण खडसावून सवाल कधी करणार आहोत? लोक संतापले आहेत, त्यांच्यात असंतोष भडकत आहे वगैरे आम्ही पत्रकार लिहीत होतो. परंतु एक-दोन नगरसेवकांना फोन केल्यानंतर आपल्याला टॅँकर येतो ना, मग उगाच पावसात आंदोलन का करा, असा ‘सुज्ञ’ विचार लोकांनी केला असावा. परंतु ‘जनता’ म्हणून आपला आवाज उठविण्याचा अधिकार ते कधी बजावणारच नाहीत का?

सध्या गोव्यात विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. कॉँग्रेसचे इनमीन पाच सदस्य बाकी राहिले आहेत. त्यातील अनेकांवर केसेस आहेत. काहींना अधूनमधून पोलीस स्थानकावर हजेरी लावावी लागते. काहींवर ते भाजपमध्ये येण्यात एका पायावर तयार असण्याचीही टीका झाली आहे. हे लोक जनतेचे प्रश्न घेऊन काय लढणार आहेत? त्यातील काहीजण तर मुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमने उधळण्याची एकही संधी वाया घालवत नाहीत. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व ‘आप’चेही काही खरे नाही. मगोपने सरकारविरोधात बसण्याचे धोरण स्वीकारले होते. परंतु त्याच्या विपरीत विधानसभेत एका फुटकळ सत्काराचे निमित्त साधून मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडून त्यावर अडीच तास चर्चा केली, जी रात्री १२ पर्यंत चालली. हे ढवळीकर सरकारविरोधात बोलण्याचे धारिष्ट्य काय दाखवतील?

‘आप’ची लोकप्रियता ढळल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते रोडावले आहेत. त्याची परिणती म्हणजे पणजीतील निदर्शनांना मोजून दहा जण हजर होते. परंतु विरोधी पक्षांची आजची ही दयनीय अवस्था जनतेच्याच अनास्थेचे प्रतीक नाही का? जे लोक पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर केवळ घरात बसून आक्रंदत होते तेच रस्त्यावर येण्यास नाखुश होते. एकाही सामाजिक संस्थेने मोर्चा काढण्यास पुढाकार घेतला नाही. येथे महिला संघटना अनेक आहेत. परंतु त्याही सुखवस्तू असल्याने एकही मृणाल गोरे, प्रमिला दंडवते, अहिल्या रांगणेकर काही गोव्यात निर्माण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे जी पाइपलाइन ४८ तासांत दुरुस्त होऊ शकली असती ते काम सात दिवस उलटूनही पूर्ण होऊ शकले नाही आणि दोन तालुक्यांना पाण्याविना तडफडावे लागले. ज्या देशातील नागरिक निष्प्रभ आणि मुर्दाड असतात, त्या देशाला भवितव्य नसते, असे एका विचारवंतांने लिहून ठेवले आहे आणि त्यातल्या त्यात गोव्याचे अस्तित्व तर सध्या कड्याच्या टोकाला पोहोचले आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईgoaगोवा