शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पाणीबाणीतही लोकांच्या अनास्थेचे दर्शन; राज्यकर्त्यांना खडसावून सवाल कधी करणार आहोत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 18:40 IST

गोव्यात सात दिवस पाणी नव्हते. पाइपलाइन फुटली आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणातून लोकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. या काळात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना कुठे होत्या?

राजू नायकपाणी टंचाईने ग्रासलेल्या पणजी राजधानी व तिसवाडी तालुक्यातील जनतेला सरकार ज्याप्रमाणे आश्वस्त करू शकले नाही, त्याचप्रमाणे त्यांच्या वेदनेला वाचा फोडण्यास विरोधी पक्षांना अपयश आले. केवळ प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न लढविला. याचे कारण कॉँग्रेससारखा पक्ष सरकारची खुशामत करीत होता व ‘आप’ला सातव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ निदर्शने करायला मुहूर्त सापडला. तेव्हाही १० कार्यकर्ते व ५० पेक्षा जास्त पोलीस अशी परिस्थिती होती. विरोधी पक्षनेत्याने सरकारविरोधात ‘ब्र’ काढला नाही.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले, सार्वजनिक तिजोरीवर गलेलठ्ठ होणाऱ्या राजकीय नेत्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना लोक म्हणून आपण खडसावून सवाल कधी करणार आहोत? लोक संतापले आहेत, त्यांच्यात असंतोष भडकत आहे वगैरे आम्ही पत्रकार लिहीत होतो. परंतु एक-दोन नगरसेवकांना फोन केल्यानंतर आपल्याला टॅँकर येतो ना, मग उगाच पावसात आंदोलन का करा, असा ‘सुज्ञ’ विचार लोकांनी केला असावा. परंतु ‘जनता’ म्हणून आपला आवाज उठविण्याचा अधिकार ते कधी बजावणारच नाहीत का?

सध्या गोव्यात विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. कॉँग्रेसचे इनमीन पाच सदस्य बाकी राहिले आहेत. त्यातील अनेकांवर केसेस आहेत. काहींना अधूनमधून पोलीस स्थानकावर हजेरी लावावी लागते. काहींवर ते भाजपमध्ये येण्यात एका पायावर तयार असण्याचीही टीका झाली आहे. हे लोक जनतेचे प्रश्न घेऊन काय लढणार आहेत? त्यातील काहीजण तर मुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमने उधळण्याची एकही संधी वाया घालवत नाहीत. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व ‘आप’चेही काही खरे नाही. मगोपने सरकारविरोधात बसण्याचे धोरण स्वीकारले होते. परंतु त्याच्या विपरीत विधानसभेत एका फुटकळ सत्काराचे निमित्त साधून मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडून त्यावर अडीच तास चर्चा केली, जी रात्री १२ पर्यंत चालली. हे ढवळीकर सरकारविरोधात बोलण्याचे धारिष्ट्य काय दाखवतील?

‘आप’ची लोकप्रियता ढळल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते रोडावले आहेत. त्याची परिणती म्हणजे पणजीतील निदर्शनांना मोजून दहा जण हजर होते. परंतु विरोधी पक्षांची आजची ही दयनीय अवस्था जनतेच्याच अनास्थेचे प्रतीक नाही का? जे लोक पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर केवळ घरात बसून आक्रंदत होते तेच रस्त्यावर येण्यास नाखुश होते. एकाही सामाजिक संस्थेने मोर्चा काढण्यास पुढाकार घेतला नाही. येथे महिला संघटना अनेक आहेत. परंतु त्याही सुखवस्तू असल्याने एकही मृणाल गोरे, प्रमिला दंडवते, अहिल्या रांगणेकर काही गोव्यात निर्माण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे जी पाइपलाइन ४८ तासांत दुरुस्त होऊ शकली असती ते काम सात दिवस उलटूनही पूर्ण होऊ शकले नाही आणि दोन तालुक्यांना पाण्याविना तडफडावे लागले. ज्या देशातील नागरिक निष्प्रभ आणि मुर्दाड असतात, त्या देशाला भवितव्य नसते, असे एका विचारवंतांने लिहून ठेवले आहे आणि त्यातल्या त्यात गोव्याचे अस्तित्व तर सध्या कड्याच्या टोकाला पोहोचले आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईgoaगोवा