शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पाणीबाणीतही लोकांच्या अनास्थेचे दर्शन; राज्यकर्त्यांना खडसावून सवाल कधी करणार आहोत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 18:40 IST

गोव्यात सात दिवस पाणी नव्हते. पाइपलाइन फुटली आणि प्रशासनाच्या निष्काळजीपणातून लोकांना तीव्र पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. या काळात राजकीय पक्ष, सामाजिक संघटना कुठे होत्या?

राजू नायकपाणी टंचाईने ग्रासलेल्या पणजी राजधानी व तिसवाडी तालुक्यातील जनतेला सरकार ज्याप्रमाणे आश्वस्त करू शकले नाही, त्याचप्रमाणे त्यांच्या वेदनेला वाचा फोडण्यास विरोधी पक्षांना अपयश आले. केवळ प्रसारमाध्यमांनी हा प्रश्न लढविला. याचे कारण कॉँग्रेससारखा पक्ष सरकारची खुशामत करीत होता व ‘आप’ला सातव्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या घराजवळ निदर्शने करायला मुहूर्त सापडला. तेव्हाही १० कार्यकर्ते व ५० पेक्षा जास्त पोलीस अशी परिस्थिती होती. विरोधी पक्षनेत्याने सरकारविरोधात ‘ब्र’ काढला नाही.

सामाजिक कार्यकर्ते डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना म्हटले, सार्वजनिक तिजोरीवर गलेलठ्ठ होणाऱ्या राजकीय नेत्यांना आणि सरकारी अधिकाऱ्यांना लोक म्हणून आपण खडसावून सवाल कधी करणार आहोत? लोक संतापले आहेत, त्यांच्यात असंतोष भडकत आहे वगैरे आम्ही पत्रकार लिहीत होतो. परंतु एक-दोन नगरसेवकांना फोन केल्यानंतर आपल्याला टॅँकर येतो ना, मग उगाच पावसात आंदोलन का करा, असा ‘सुज्ञ’ विचार लोकांनी केला असावा. परंतु ‘जनता’ म्हणून आपला आवाज उठविण्याचा अधिकार ते कधी बजावणारच नाहीत का?

सध्या गोव्यात विरोधी पक्षच अस्तित्वात नाही. कॉँग्रेसचे इनमीन पाच सदस्य बाकी राहिले आहेत. त्यातील अनेकांवर केसेस आहेत. काहींना अधूनमधून पोलीस स्थानकावर हजेरी लावावी लागते. काहींवर ते भाजपमध्ये येण्यात एका पायावर तयार असण्याचीही टीका झाली आहे. हे लोक जनतेचे प्रश्न घेऊन काय लढणार आहेत? त्यातील काहीजण तर मुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमने उधळण्याची एकही संधी वाया घालवत नाहीत. दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष व ‘आप’चेही काही खरे नाही. मगोपने सरकारविरोधात बसण्याचे धोरण स्वीकारले होते. परंतु त्याच्या विपरीत विधानसभेत एका फुटकळ सत्काराचे निमित्त साधून मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांनीच मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडून त्यावर अडीच तास चर्चा केली, जी रात्री १२ पर्यंत चालली. हे ढवळीकर सरकारविरोधात बोलण्याचे धारिष्ट्य काय दाखवतील?

‘आप’ची लोकप्रियता ढळल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते रोडावले आहेत. त्याची परिणती म्हणजे पणजीतील निदर्शनांना मोजून दहा जण हजर होते. परंतु विरोधी पक्षांची आजची ही दयनीय अवस्था जनतेच्याच अनास्थेचे प्रतीक नाही का? जे लोक पाणी टंचाई निर्माण झाल्यानंतर केवळ घरात बसून आक्रंदत होते तेच रस्त्यावर येण्यास नाखुश होते. एकाही सामाजिक संस्थेने मोर्चा काढण्यास पुढाकार घेतला नाही. येथे महिला संघटना अनेक आहेत. परंतु त्याही सुखवस्तू असल्याने एकही मृणाल गोरे, प्रमिला दंडवते, अहिल्या रांगणेकर काही गोव्यात निर्माण होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे जी पाइपलाइन ४८ तासांत दुरुस्त होऊ शकली असती ते काम सात दिवस उलटूनही पूर्ण होऊ शकले नाही आणि दोन तालुक्यांना पाण्याविना तडफडावे लागले. ज्या देशातील नागरिक निष्प्रभ आणि मुर्दाड असतात, त्या देशाला भवितव्य नसते, असे एका विचारवंतांने लिहून ठेवले आहे आणि त्यातल्या त्यात गोव्याचे अस्तित्व तर सध्या कड्याच्या टोकाला पोहोचले आहे.

टॅग्स :water scarcityपाणी टंचाईgoaगोवा