शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्यांना अटक करा: मुख्यमंत्री; आमोणा येथे विकासकामांचा शुभारंभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2025 06:43 IST

सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना थेट अटक केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : 'स्वयंपूर्ण गोवा' यशस्वी करण्यासाठी खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील पंचायतींचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. पंचायतींनी गावातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन द्यावे. त्यांना सरकारच्या योजनांचा शंभर टक्के लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. यावेळी त्यांनी कचरा समस्या सोडविण्यासाठी पंचायतींनी पुढाकार घ्यावा. यापुढे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांना थेट अटक केली जाईल, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला.

आमोणा पंचायत क्षेत्रात पंचायत इमारत कार्यालयाचे उद्घाटन, वेदांता कंपनीतर्फे मैदानाची पायाभरणी तसेच शाळेसाठी प्रयोगशाळा, स्वच्छ भारत अभियानतर्फे उभारण्यात आलेल्या सुसज्ज कचरा शेड व विद्यार्थी गौरव सोहळ्यात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर यावेळी सरपंच सागर फडते, गौरवी गावस, कृष्णा गावस, रोहिदास कानसेकर, रामा नाईक, मंडळ अध्यक्ष गोपाळ सुर्लीकर, वेदांता कंपनीचे सप्तेश सरदेसाई आदी उपस्थित होते.

स्वयंपूर्ण गोवा उपक्रमाबरोबर स्वच्छ गोवा हा उपक्रम देखील महत्त्वाचा आहे. अनेक पंचायतींच्या परिसरात, रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे पाहायला मिळतात. त्यामुळे यापुढे पंचायतींने उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांविरोधात कठोर पावले उचलावीत. असे कृत्य करणारा सापडल्यास त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करावे, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

सप्तेश सरदेसाई यांनी आमोणा गावात क्रीडा, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा अशा वेगवेगळ्या क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत काम करण्यास आनंद होत असल्याचे सांगितले. सरपंच सागर फडते यांनी आमोणा गावातील विविध योजनांची माहिती देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या पूर्ण सहकार्यातून तसेच वेदांत कंपनीच्या सहकार्यातून अनेक योजनां मार्गी लागल्याबद्दल आभार मानले. अनेक पंचायतींच्या परिसरात कचऱ्याचे ढिगारे दिसून येतात. त्यामुळे पंचायतींने कचरा टाकणाऱ्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करावे, असा आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

शेती पडीक ठेवू नका

वेदांताने आमोणा गावाबरोबरच गोव्याच्या विविध भागात शिक्षण, आरोग्य पायाभूत सुविधा, क्रीडा मैदानांसाठी भरीव योगदान दिल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. तसेच आमोणा गावात मोठ्या प्रमाणात शेती आहे. मात्र, अनेक लोकांनी आज शेतीकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. ज्यांना शेती करायची नाही, त्यांनी आपली जमीन कसण्यासाठी दुसऱ्याला द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. सरकारी योजनांच्या माध्यमातून सरकार शेतीला बळ देत असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा. 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत