शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

दुरुस्त मोटर वाहन कायदा तत्काळ लागू करा, मद्यपी चालकांना रोखा - सुदिन ढवळीकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2019 19:18 IST

राज्यातील रस्त्यांवर खड्डे असल्याचे कारण देऊन सरकारने मोटर वाहन कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी लांबणीवर टाकणो हे चुकीचे आहे.

पणजी : राज्यातील रस्त्यांवर खड्डे असल्याचे कारण देऊन सरकारने मोटर वाहन कायद्यातील तरतुदींची अंमलबजावणी लांबणीवर टाकणो हे चुकीचे आहे. सरकारने त्वरित अंमलबजावणी सुरू करावी व मद्य पिऊन वाहन चालविणा-यांना रोखावे, अशी मागणी मगो पक्षाचे ज्येष्ठ आमदार सुदिन ढवळीकर यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत केली. मोठी दंड आकारणी गरजेचीच आहे, असे ढवळीकर म्हणाले.केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोटर वाहन कायद्यात दुरुस्त्या करून घेताना खूप कष्ट घेतले. विविध स्तरांवर खूप अभ्यास केला गेला. मी स्वत: वाहतूक मंत्री या नात्याने त्या प्रक्रियेत सहभागी झालो होतो. मी समितीचा सदस्य होतो. आम्ही अनेक बैठका घेतल्या. दंडाची रक्कम जरी मोठी असली तरी, ती कमी करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. मात्र दंड कमी करण्याचीही गरज नाही. कारण राज्यात मद्य पिऊन अनेक चालक वाहन चालवितात व अपघात होतात. ढवळी उड्डाण पुलावर जे पाच अपघात झाले, त्यापैकी चार अपघात हे दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे झाले, असे ढवळीकर म्हणाले.याचप्रमाणे अनेक पालक अल्पवयीन मुलांना दुचाक्या चालविण्यासाठी देतात. हे सगळे प्रकार बंद होण्यासाठी केंद्रीय कायद्यातील नव्या तरतुदींची मुख्यमंत्र्यांनी तत्काळ अंमलबजावणी सुरू करावी. रस्ते खराब आहेत, कारण पाऊस प्रचंड पडला. तथापि, येत्या नोव्हेंबर्पयत सरकारने रस्त्यावरील खड्डे बुजवून घ्यावेत. मात्र त्यासाठी कायद्याची अंमलबजावणी रोखून धरू नये. देशातील अनेक राज्यांमध्ये अंमलबजावणी सुरू झाली, असे ढवळीकर यांनी सांगितले.नव्या तरतुदींमध्ये समाजाच्या विविध घटकांची काळजी घेण्यात आली आहे. वाहन अपघातात बळी गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना किमान पाच लाख रुपये मिळतील अशी तरतुद आहे. पूर्वी काहीच मिळत नव्हते. डिलरने जर सदोष वाहन विकले तर ते वाहन परत डिलरला देण्याचीही तरतुद आहे. रस्त्यांवरील खड्डे हा वेगळा विषय असून त्याचा संबंध नव्या कायद्याशी कुणी लावू नये. केंद्राने एका रात्रीत तो कायदा आणलेला नाही, असे ढवळीकर म्हणाले.

टॅग्स :goaगोवाtraffic policeवाहतूक पोलीस