शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
2
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
3
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
4
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
5
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
6
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
9
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
10
"तिला परत त्या असुरक्षित वातावरणात ढकललंच नाही पाहिजे...", हुंडाबळी प्रकरणावर नेहा शितोळे स्पष्टच बोलली
11
Astrology: जूनचा शेवट 'या' पाच राशींसाठी तापदायक; वाढणार समस्या, होणार आर्थिक नुकसान!
12
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
13
हा माणूस आहे की पैसे छपाईची मशिन...२ हजार कोटी पगार, ५2८ कोटी बोनस; रोनाल्डोला काय काय मिळणार?
14
'राजा रघुवंशी याचे आणखी एक प्रेमसंबंध होते'; महिलेने केला मोठा दावा, हत्या प्रकरणी नवा ट्विस्ट
15
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
16
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम
17
Video: पाकिस्तानच्या नदीला अचानक पूर आला; फिरायला गेलेले एकाच कुटुंबातील १८ जण वाहून गेले
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
बाजारात तेजीचा 'चौकार'! सेन्सेक्स-निफ्टी सलग चौथ्या दिवशी वाढीसह बंद, 'या' शेअर्सने केलं मालामाल
20
इस्रायलच्या 'ऑपरेशन राइजिंग लॉयन'चा दावा, इराणमध्ये ९००हून अधिक ठिकाणांवर हल्ले, अणुवैज्ञानिकही ठार!

गोव्यात भाजपा, काँग्रेसकडून राजकीय नाटकाचा बाजार - आप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 14:02 IST

राज्यात भाजपा, काँग्रेसकडून राजकीय नाटकाचा बाजार मांडलेला आहे.

पणजी : राज्यात भाजपा, काँग्रेसकडून राजकीय नाटकाचा बाजार मांडलेला आहे. प्रशासन पूर्णपणे ठप्प असून सरकार कोलमडले आहे. त्यामुळे सर्व क्षेत्रांतील मध्यस्थी लोकांची चलती आहे. एकप्रकारे हीच मंडळी सरकारी खाते सांभाळत असल्याचा आरोप आपचे गोवा निमंत्रक एल्विस गोम्स यांनी केले. बुधवारी पणजीत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदीप पाडगावकर उपस्थित होते.

भाजपा, काँग्रेस व इतर प्रादेशिक पक्षाकडून जो राजकीय खेळ चालला आहे. तो जनहीतच्या विरोधात आहे. राजकारण करा पण लोकांचे हित सांभाळा. गोव्यात गणेश चतुर्थी हा सर्वात मोठा उत्सव असून सध्या अनेक गावात, शहरांमध्ये पाण्याची टंचाई भासत आहे. तसेच विजेच्या लंपडावाने लोक हैराण झाले आहेत. लोक रस्त्यांवर येऊन निदर्शने करत आहेत. मात्र याकडे सरकार डोळेझाक करत असल्याचं एल्विस गोम्स म्हणाले.

सुरुवातीला भाजपाकडून काँग्रेसवर निशाणा साधला जायचा की काँग्रेस पक्ष हा हायकमांडचे कटपुतलीवर नाचतो. काँग्रेसला दिग्विजय सिंह, डॉ. ए. चेल्लाकुमार यासारख्या नेत्यांची त्यांना गरज भासते. पण सध्या भाजपाची सुद्धा तिच परिस्थिती झालेली आहे. राज्यात भाजपाला कोणी वालीच नसल्याने त्याचे नेते मंडळी सुद्धा भाजप प्रदेशाध्यक्ष अमित शहा यांच्या इशाऱ्यावरच मान डुलवत आहेत. मुख्यमंत्री नसताना सरकार चालू शकते हा पायंडा गोव्यात पडलेला आहे. हा चुकीचा संदेश आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचत असल्याचे त्यांनी सांगितले.

आरएसएससमोर गोवा फॉरवर्डचे लोटांगण

प्रदीप पाडगावकर म्हणाले, महाराष्ट्र गोमतंक पक्ष (मगोप) याने भूमिका घेतली आहे की ते भाजपमध्ये पक्ष विलीन करणार नाही. मात्र दुसरीकडे गोवा फॉरवर्ड पक्ष सत्तेसाठी आपले ‘गोंयकारपण’ हे बिद्रवाक्यच विसरला आहे. ज्या तत्त्वांवर गोवा फॉरवर्डने विधानसभा निवडणूक लढवली होती त्याचा त्यांना विसर पडलेला दिसतो. एका रात्रीत गोवा फॉरवर्डने भाजपला पाठिंबा देत सत्तेसाठी लोकांच्या कौलाला तिलांजली दिली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघासमोर (आरएसएस) गोवा फॉरवर्डने सपशेल लोटांगण घातले आहे. सत्तेत बढती मिळावी, यासाठी हा सगळा खटाटोप चालला आहे. नद्यांचे राष्ट्रीयीकरण, कोळसा यासारख्या विषयांना गोवा फॉरवर्डने बगल दिली. 

काँग्रेसची केवळ हुलकावणी

एल्विस गोम्स म्हणाले, काँग्रेस पक्ष केवळ सरकार स्थापनेची हुलकावणी देत आहे. त्यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्याचा आकडा नाही. मात्र लोकांचा दाखवण्यासाठी राजकीय खेळीचा अवलंब स्वीकाराला आहे. जर काँग्रेसला सरकार स्थापित करण्याचे होते तर त्यांनी ऑगस्टमध्ये झालेल्या अधिवेशनावेळी का पुढाकार घेतला नाही? फॉर्मेलिनयुक्त मासळीचा प्रश्न ऐरणीवर असताना काँग्रेसने अधिवेशनचा केवळ वेळ दवडला होता. याची आठवण गोम्स यांनी करून दिली. काँग्रेस आमदारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल मृदुला सिन्हा यांना भेटून एक दिवसाचे खास अधिवेशन बोलवून राज्यातील विद्यमान सरकारला बहुमत सिद्ध करायला लावा, अशी मागणी केली होती. तसेच काँग्रेस पक्ष बहुमत सिद्ध करायला तयार आहे, असा दावाही केला होता.   

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस