शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

म्हादई प्रश्नी आधी माफी मागा; खाणी कधी सुरु करणार? जे. पी. नड्डांना काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 20:54 IST

जे. पी. नड्डा हे उद्या शुक्रवारी येथील आझाद मैदानावर जाहीर सभेत लोकांना संबोधणार आहेत.

पणजी : नागरिकत्त्व दुरूस्ती कायद्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी उद्या गोवा भेटीवर येणार असलेले भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांना प्रदेश काँग्रेसने काही सवाल केले आहेत. जे. पी. नड्डा यांनी आधी म्हादई प्रश्नी माफी मागावी. तसेच, कर्नाटकला दिलेले पत्र मागे घेणार असल्याचे आश्वासन द्यावे. गोव्यातील खाणी कधी सुरु करणार हे जाहीर करावे आणि गोव्यातील पोर्तुगीज पासपोर्टधारकांचे हित जपणार की नाही, हे सांगावे. गोवा आर्थिक संकटात असल्याने २२ हजार कोटींचे कर्ज केंद्राने माफ करावे, अशी मागणी पक्षाने केली आहे. 

जे. पी. नड्डा हे उद्या शुक्रवारी येथील आझाद मैदानावर जाहीर सभेत लोकांना संबोधणार आहेत. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘नागरिकत्व कायदा प्रकरणी गोमंतकीयांची समजूत काढण्याआधी येथील ज्वलंत विषयांवर जे. पी. नड्डा यांनी भाष्य करण्याची गरज आहे. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना २0१२ साली त्यानी खाणी बंद केल्या. 

गेली ७ वर्षे राज्यातील खाण व्यवसाय बंद असून ३ लाखांहून अधिक लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन गेले आहे. खाणी नक्की कधी सुरु होणार हे नड्डा यांनी जाहीर करावे. गोव्यातील बेकारीचे प्रमाण ३५ टक्क्यांवर पोचले आहे ते कमी कधी करणार हे जनतेला सांगावे. पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे त्याबद्दल पावले उचलणार की नाही? केंद्र सरकारने आजवर किती काळा पैसा आणला, दहशतवादाचा किती बिमोड केला हेही जनतेला सांगावे. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे ती कधी नियंत्रणात आणणार याविषयी सांगावे. 

नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याबाबत लोकांना समजावण्याची पाळी केंद्र सरकारवर का आली, असा प्रश्न करुन चोडणकर म्हणाले की, जनतेचा पंतप्रधान मोदी किंवा अमित शहा यांच्यावर मुळीच विश्वास नाही. नोटाबंदी फसली, जीएसटीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली असा आरोप त्यांनी केला. 

पक्षाचे माध्यम विभागप्रमुख ट्रोजन डिमेलो म्हणाले की, ‘राष्ट्रपतींनी संसदेत केलेल्या भाषणात आपले सरकार नागरिकत्त्व सुधारणा कायद्याबरोबरच राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणीही (एनआरसी) आणणार असल्याचे म्हटलेले आहे त्यामुळे एनआरसी येणार हे निश्चित, परंतु केंद्र सरकार याबाबत लोकांची दिशाभूल करीत आहे. गोव्यातील पोर्तुगीज पासपोर्टधारकांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. लोक नोक-यांसाठी पोर्तुगीज पासपोर्ट घेतात. त्यांचे हित जपण्यासाठी केंद्र सरकारने कायदा दुरुस्ती करण्याची गरज आहे.  

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस