शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

म्हादई प्रश्नी आधी माफी मागा; खाणी कधी सुरु करणार? जे. पी. नड्डांना काँग्रेसचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 20:54 IST

जे. पी. नड्डा हे उद्या शुक्रवारी येथील आझाद मैदानावर जाहीर सभेत लोकांना संबोधणार आहेत.

पणजी : नागरिकत्त्व दुरूस्ती कायद्याचे महत्त्व पटवून देण्यासाठी उद्या गोवा भेटीवर येणार असलेले भाजपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांना प्रदेश काँग्रेसने काही सवाल केले आहेत. जे. पी. नड्डा यांनी आधी म्हादई प्रश्नी माफी मागावी. तसेच, कर्नाटकला दिलेले पत्र मागे घेणार असल्याचे आश्वासन द्यावे. गोव्यातील खाणी कधी सुरु करणार हे जाहीर करावे आणि गोव्यातील पोर्तुगीज पासपोर्टधारकांचे हित जपणार की नाही, हे सांगावे. गोवा आर्थिक संकटात असल्याने २२ हजार कोटींचे कर्ज केंद्राने माफ करावे, अशी मागणी पक्षाने केली आहे. 

जे. पी. नड्डा हे उद्या शुक्रवारी येथील आझाद मैदानावर जाहीर सभेत लोकांना संबोधणार आहेत. प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर पत्रकार परिषदेत म्हणाले की, ‘नागरिकत्व कायदा प्रकरणी गोमंतकीयांची समजूत काढण्याआधी येथील ज्वलंत विषयांवर जे. पी. नड्डा यांनी भाष्य करण्याची गरज आहे. मनोहर पर्रीकर मुख्यमंत्री असताना २0१२ साली त्यानी खाणी बंद केल्या. 

गेली ७ वर्षे राज्यातील खाण व्यवसाय बंद असून ३ लाखांहून अधिक लोकांच्या उदरनिर्वाहाचे साधन गेले आहे. खाणी नक्की कधी सुरु होणार हे नड्डा यांनी जाहीर करावे. गोव्यातील बेकारीचे प्रमाण ३५ टक्क्यांवर पोचले आहे ते कमी कधी करणार हे जनतेला सांगावे. पर्यटन क्षेत्रात पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे त्याबद्दल पावले उचलणार की नाही? केंद्र सरकारने आजवर किती काळा पैसा आणला, दहशतवादाचा किती बिमोड केला हेही जनतेला सांगावे. दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे ती कधी नियंत्रणात आणणार याविषयी सांगावे. 

नागरिकत्त्व दुरुस्ती कायद्याबाबत लोकांना समजावण्याची पाळी केंद्र सरकारवर का आली, असा प्रश्न करुन चोडणकर म्हणाले की, जनतेचा पंतप्रधान मोदी किंवा अमित शहा यांच्यावर मुळीच विश्वास नाही. नोटाबंदी फसली, जीएसटीमुळे अर्थव्यवस्था कोलमडली असा आरोप त्यांनी केला. 

पक्षाचे माध्यम विभागप्रमुख ट्रोजन डिमेलो म्हणाले की, ‘राष्ट्रपतींनी संसदेत केलेल्या भाषणात आपले सरकार नागरिकत्त्व सुधारणा कायद्याबरोबरच राष्ट्रीय नागरिकत्त्व नोंदणीही (एनआरसी) आणणार असल्याचे म्हटलेले आहे त्यामुळे एनआरसी येणार हे निश्चित, परंतु केंद्र सरकार याबाबत लोकांची दिशाभूल करीत आहे. गोव्यातील पोर्तुगीज पासपोर्टधारकांचा प्रश्न निर्माण झालेला आहे. लोक नोक-यांसाठी पोर्तुगीज पासपोर्ट घेतात. त्यांचे हित जपण्यासाठी केंद्र सरकारने कायदा दुरुस्ती करण्याची गरज आहे.  

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाcongressकाँग्रेस