शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

… तर भाजप सरकारविरुद्धही आंदोनल छेडा; विनोद तावडे यांचा अभाविप कार्यकर्त्यांना र्संदेश 

By वासुदेव.पागी | Updated: July 9, 2023 19:01 IST

आंदोलन करणे हे परिषदेचे कामच असल्याचे विनोद तावडेंनी सांगितले.

पणजी : भाजप सरकारच्या एखाद्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधातआंदोलन करायला कधीही कचरू नका, मग सरकार कुणाचेही असू दे, असा संदेश भाजपचे राष्ट्रीय महासचीव विनोद तावडे यांनी पणजीतअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परिषदेच्या ७५ व्यास्थापनादिनानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलताना केले. अन्यायालाविरुद्ध आवाज उठविणे, आंदोलन करणे हे परिषदेचे कामच असल्याचे त्यांनी सांगितले.

अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या अभाविपच्या कार्यक्रमास प्रमुखपाहुणे या नात्याने निमंत्रीत असलेले तावडे हे अभाविपचे माजीप्रदेशमंत्रीही आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले,  अभाविपचे काम हे कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि संघर्षातून उभे राहिलेआहे. गोव्यातही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी परिषदेने अनेक आंदोलनेइतिहासात केली आहेत. आजही एखाद्या मुद्यावर आंदोलन करण्याचीगरज असेल तर ते परिषदेने करावेच. सत्तेत कोणते सरकार आहे किंवाकोण मंत्री आहे याचा विचार न करता अन्यायाविरुद्ध आंदोलन छेडा.  कुणाला काय वाटेल याची चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्हीएखाद्या व्यक्तीविरुद्ध नव्हे तर विशिष्ट पदाधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्धआंदोलन करीत आहेत. विद्यार्थी परिषदेचे काम हे आंदोलनांमुळेच वाढलेआहे असे तावडे यांनी सांगितले.

तावडे यांनी गोव्यातील विद्यार्थीपरिषदेच्या कामाचे कौतुक करतानाच तेप्रदेश महामंत्री असतानाच्या गोव्यातील कामांच्या आणि विशेषतःआंदोलनांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या आठवणी त्यांनी सांगितल्या. विद्यार्थी परिषदेच्या कामामुळेच तळागळातील लोकांचे जीवन जवळूनपाहण्याची संधी आपल्याला मिळाली आणि त्यामुळेच देशातआरक्षणाची किती गरज आहे हे आपल्याला त्यावेळी पटले असेही त्यांनीसांगितले.

या कार्यक्रमाला विद्यार्थी परिषदेचे अनेक माजी कार्यकर्तेही उपस्थितहोते. त्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार संकल्प आमोणकर, नरेंद्रसावईकर, दत्ता नाईक निलांगी शिंदे, अजितसिंग राणे, अँड प्रवीणफळदेसाई, माहिती आयुक्त विश्वास सतरकर, भूषण भावे व इतरकार्यकर्ते उपस्थित होते. विभाग संयोजक धनश्री मांद्रेकर, राष्ट्रीय महासचिव अंकिता पवार, विभाग प्रमुख विलास सतरकर, वैभव शहरमंत्री यांचीही यावेळी भाषणेझाली. 

भाजपचे डिपॉजिट जप्त होत होते तेव्हा…गोव्यात विद्यार्थी परिषदेचे काम हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे उभे  राहिलेअसून कोणतेही सरकार किंवा पक्ष याचा त्यात काही संबंध नाही आहे.  जेव्हा गोव्यातील निवडणुकीत भाजप उमेदवारांची अनामत रक्कम जप्तहोत होती त्यावेळी गोवा विद्यापीठावर विद्यार्थी परीषदेचा झेंडा फडकतहोता असे प्रा. दत्ता नाईक यांनी यावेळी सांगितले. नरेंद्र सावईकर, निलांगीशिंदे व इतर माजी कार्यकर्त्यांनीही यावेळी परिषदेच्या मागीलआंदोलनांना उजाळा देणारे अनुभव कथन केले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाVinod Tawdeविनोद तावडे