शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

… तर भाजप सरकारविरुद्धही आंदोनल छेडा; विनोद तावडे यांचा अभाविप कार्यकर्त्यांना र्संदेश 

By वासुदेव.पागी | Updated: July 9, 2023 19:01 IST

आंदोलन करणे हे परिषदेचे कामच असल्याचे विनोद तावडेंनी सांगितले.

पणजी : भाजप सरकारच्या एखाद्या चुकीच्या निर्णयाच्या विरोधातआंदोलन करायला कधीही कचरू नका, मग सरकार कुणाचेही असू दे, असा संदेश भाजपचे राष्ट्रीय महासचीव विनोद तावडे यांनी पणजीतअखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे परिषदेच्या ७५ व्यास्थापनादिनानिमित्त आयोजित सोहळ्यात बोलताना केले. अन्यायालाविरुद्ध आवाज उठविणे, आंदोलन करणे हे परिषदेचे कामच असल्याचे त्यांनी सांगितले.

अमृत महोत्सवी वर्ष साजरे करणाऱ्या अभाविपच्या कार्यक्रमास प्रमुखपाहुणे या नात्याने निमंत्रीत असलेले तावडे हे अभाविपचे माजीप्रदेशमंत्रीही आहेत. अभाविपच्या कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले,  अभाविपचे काम हे कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि संघर्षातून उभे राहिलेआहे. गोव्यातही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी परिषदेने अनेक आंदोलनेइतिहासात केली आहेत. आजही एखाद्या मुद्यावर आंदोलन करण्याचीगरज असेल तर ते परिषदेने करावेच. सत्तेत कोणते सरकार आहे किंवाकोण मंत्री आहे याचा विचार न करता अन्यायाविरुद्ध आंदोलन छेडा.  कुणाला काय वाटेल याची चिंता करण्याची गरज नाही. कारण तुम्हीएखाद्या व्यक्तीविरुद्ध नव्हे तर विशिष्ट पदाधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्धआंदोलन करीत आहेत. विद्यार्थी परिषदेचे काम हे आंदोलनांमुळेच वाढलेआहे असे तावडे यांनी सांगितले.

तावडे यांनी गोव्यातील विद्यार्थीपरिषदेच्या कामाचे कौतुक करतानाच तेप्रदेश महामंत्री असतानाच्या गोव्यातील कामांच्या आणि विशेषतःआंदोलनांच्या स्मृतींना उजाळा देणाऱ्या आठवणी त्यांनी सांगितल्या. विद्यार्थी परिषदेच्या कामामुळेच तळागळातील लोकांचे जीवन जवळूनपाहण्याची संधी आपल्याला मिळाली आणि त्यामुळेच देशातआरक्षणाची किती गरज आहे हे आपल्याला त्यावेळी पटले असेही त्यांनीसांगितले.

या कार्यक्रमाला विद्यार्थी परिषदेचे अनेक माजी कार्यकर्तेही उपस्थितहोते. त्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, आमदार संकल्प आमोणकर, नरेंद्रसावईकर, दत्ता नाईक निलांगी शिंदे, अजितसिंग राणे, अँड प्रवीणफळदेसाई, माहिती आयुक्त विश्वास सतरकर, भूषण भावे व इतरकार्यकर्ते उपस्थित होते. विभाग संयोजक धनश्री मांद्रेकर, राष्ट्रीय महासचिव अंकिता पवार, विभाग प्रमुख विलास सतरकर, वैभव शहरमंत्री यांचीही यावेळी भाषणेझाली. 

भाजपचे डिपॉजिट जप्त होत होते तेव्हा…गोव्यात विद्यार्थी परिषदेचे काम हे कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे उभे  राहिलेअसून कोणतेही सरकार किंवा पक्ष याचा त्यात काही संबंध नाही आहे.  जेव्हा गोव्यातील निवडणुकीत भाजप उमेदवारांची अनामत रक्कम जप्तहोत होती त्यावेळी गोवा विद्यापीठावर विद्यार्थी परीषदेचा झेंडा फडकतहोता असे प्रा. दत्ता नाईक यांनी यावेळी सांगितले. नरेंद्र सावईकर, निलांगीशिंदे व इतर माजी कार्यकर्त्यांनीही यावेळी परिषदेच्या मागीलआंदोलनांना उजाळा देणारे अनुभव कथन केले. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाVinod Tawdeविनोद तावडे