शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

पणजीत मांडवी नदीत भरकटलेल्या फेरीबोटीतून सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 13:00 IST

बेती-पणजी जलमार्गावरील भरकटलेल्या फेरीबोटीतून अखेर सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. भरकटलेली फेरीबोट अजूनही आहे त्याच ठिकाणी रुतून पडलेली आहे.

ठळक मुद्देबेती-पणजी जलमार्गावरील भरकटलेल्या फेरीबोटीतून अखेर सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. भरकटलेली फेरीबोट अजूनही आहे त्याच ठिकाणी रुतून पडलेली आहे. जलमार्गावर शुक्रवारी नवी फेरीबोट सुरु करुन प्रवाशांची गैरसोय दूर करण्यात आली. 

पणजी- बेती-पणजी जलमार्गावरील भरकटलेल्या फेरीबोटीतून अखेर सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. भरकटलेली फेरीबोट अजूनही आहे त्याच ठिकाणी रुतून पडलेली आहे. या जलमार्गावर शुक्रवारी नवी फेरीबोट सुरु करुन प्रवाशांची गैरसोय दूर करण्यात आली. 

पणजीहून बेतीला जाण्यासाठी प्रवाशांना घेऊन निघालेली फेरीबोट जोरदार वाऱ्यामुळे भरकटून फेरीधक्क्यापासून ६0 मीटर अंतरावर कांपालच्या दिशेने नदीत रुतली. गुरुवारी दुपारी ४.४५ च्या सुमारास ही घटना घडली. पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व ३७ प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं. यात ३७ प्रवाशी होते व १२ दुचाकीधारकांचा समावेश होता. 

जलद कृती दलाचा अभाव गुरुवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेने एक गोष्ट उघड झाली आहे. नदी परिवहन खात्याकडे अशी आणीबाणीची स्थिती हाताळण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. जलद कृती दलाचाही अभाव आहे. जलद कृती करणारे असे दल असते तर गुरुवारची दुर्घटना टळली असती, असं मत व्यक्त केलं जात आहे. फेरीबोटीतून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते परंतु त्यांच्यासाठी लाइफ जॅकेटची मात्र सोय नसते. पर्यटकांना जलसफरी घडवून आणणाऱ्या पणजीतील बोटींचीही हीच स्थिती आहे. 

फेरीबोट रुतल्यानंतर पहिल्या प्रथम दुर्घटनास्थळी कोण पोचले असेल तर ते अग्निशामक दलाचे जवान होत. नदी परिवहन खात्याकडे कोणतीही यंत्रणा नसल्याने अधिकारी सुस्त होते. दुपारी ४.४५ च्या सुमारास कॉल आला आणि काही मिनिटातच अग्निशामक बंब दाखल झाला. 

पाच वर्षात ६ घटना गेल्या पाच वर्षात मांडवी नदीत फेरीबोट तसेच अन्य बोटी भरकटण्याच्या अशा सहा घटना घडल्या. खराब हवामान हे एक कारण आहेच, पण त्याचबरोबर योग्य प्रशिक्षण, नियम, अंमलबजावणीचा अभाव हीसुद्धा इतर कारणं आहेत. १२ मे २0१२ रोजी मांडवीत एका बोटीवरील खलाशी बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला. बोटीवरुन नदीत फेकला गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. 

२३ ऑगस्ट २0१३ रोजी एम.व्ही विशाल रीया या बोटीने भरकटत जाऊन मांडवी पुलाच्या ७ नंबरच्या आणि १३ नंबरच्या खांबाला धडक दिली. जोरदार वाऱ्यामुळे बोट भरकट जाऊन ही दुर्घटना घडल्याचे त्यावेळी चौकशीत आढळून आले. खात्याने बोटीचा मास्टर व इंजिन ड्रायव्हरला दोषी ठरवून त्याचा परवाना ४५ दिवसांकरिता त्यावेळी निलंबित केला होता. 

१३ जानेवारी २0१७ रोजी एम व्ही विशाल इशान ही बोट भरकटून तिसऱ्या मांडवी पुलाच्या चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी धडकली. या प्रकरणातही मास्टर व इंजिन ड्रायव्हरचे परवाने अनुक्रमे १५ व ७ दिवसांकरिता निलंबित केले होते.  गेल्या फेब्रुवारीत पर्यटकांना जलसफर घडवून आणणारी सांतामोनिका बोट भरकटली व कांपाल येथे रुतली. २१४ पर्यटक त्यावेळी बोटीत होते त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. ओहोटीमुळे तसेच जोरदार वाऱ्यामुळे ती भरकटून रुतली होती. गेल्या ३0 मे रोजी एमव्ही विशाल धनंजय ही बोटही मिरामार किनाऱ्यावर रुतली. समुद्रातील वाळूच्या पट्ट्यात ही बोट रुतली. 

अगदी अलीकडच्या घटनेत १६ जुलै रोजी मुरगांव बंदरातून मांडवी नदीत आणले जात असताना एम व्ही लकी सेव्हन हे कसिनो जहाज मिरामार किनाऱ्यावर रुतले. तब्बल ७0 दिवस हे जहाज त्या ठिकाणी रुतून बसले होते.