शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

पणजीत मांडवी नदीत भरकटलेल्या फेरीबोटीतून सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2017 13:00 IST

बेती-पणजी जलमार्गावरील भरकटलेल्या फेरीबोटीतून अखेर सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. भरकटलेली फेरीबोट अजूनही आहे त्याच ठिकाणी रुतून पडलेली आहे.

ठळक मुद्देबेती-पणजी जलमार्गावरील भरकटलेल्या फेरीबोटीतून अखेर सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. भरकटलेली फेरीबोट अजूनही आहे त्याच ठिकाणी रुतून पडलेली आहे. जलमार्गावर शुक्रवारी नवी फेरीबोट सुरु करुन प्रवाशांची गैरसोय दूर करण्यात आली. 

पणजी- बेती-पणजी जलमार्गावरील भरकटलेल्या फेरीबोटीतून अखेर सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली. भरकटलेली फेरीबोट अजूनही आहे त्याच ठिकाणी रुतून पडलेली आहे. या जलमार्गावर शुक्रवारी नवी फेरीबोट सुरु करुन प्रवाशांची गैरसोय दूर करण्यात आली. 

पणजीहून बेतीला जाण्यासाठी प्रवाशांना घेऊन निघालेली फेरीबोट जोरदार वाऱ्यामुळे भरकटून फेरीधक्क्यापासून ६0 मीटर अंतरावर कांपालच्या दिशेने नदीत रुतली. गुरुवारी दुपारी ४.४५ च्या सुमारास ही घटना घडली. पण सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व ३७ प्रवाशांना सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं. यात ३७ प्रवाशी होते व १२ दुचाकीधारकांचा समावेश होता. 

जलद कृती दलाचा अभाव गुरुवारी रात्री घडलेल्या दुर्घटनेने एक गोष्ट उघड झाली आहे. नदी परिवहन खात्याकडे अशी आणीबाणीची स्थिती हाताळण्यासाठी कोणतीही यंत्रणा नाही. जलद कृती दलाचाही अभाव आहे. जलद कृती करणारे असे दल असते तर गुरुवारची दुर्घटना टळली असती, असं मत व्यक्त केलं जात आहे. फेरीबोटीतून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वाहतूक केली जाते परंतु त्यांच्यासाठी लाइफ जॅकेटची मात्र सोय नसते. पर्यटकांना जलसफरी घडवून आणणाऱ्या पणजीतील बोटींचीही हीच स्थिती आहे. 

फेरीबोट रुतल्यानंतर पहिल्या प्रथम दुर्घटनास्थळी कोण पोचले असेल तर ते अग्निशामक दलाचे जवान होत. नदी परिवहन खात्याकडे कोणतीही यंत्रणा नसल्याने अधिकारी सुस्त होते. दुपारी ४.४५ च्या सुमारास कॉल आला आणि काही मिनिटातच अग्निशामक बंब दाखल झाला. 

पाच वर्षात ६ घटना गेल्या पाच वर्षात मांडवी नदीत फेरीबोट तसेच अन्य बोटी भरकटण्याच्या अशा सहा घटना घडल्या. खराब हवामान हे एक कारण आहेच, पण त्याचबरोबर योग्य प्रशिक्षण, नियम, अंमलबजावणीचा अभाव हीसुद्धा इतर कारणं आहेत. १२ मे २0१२ रोजी मांडवीत एका बोटीवरील खलाशी बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह सापडला. बोटीवरुन नदीत फेकला गेल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. 

२३ ऑगस्ट २0१३ रोजी एम.व्ही विशाल रीया या बोटीने भरकटत जाऊन मांडवी पुलाच्या ७ नंबरच्या आणि १३ नंबरच्या खांबाला धडक दिली. जोरदार वाऱ्यामुळे बोट भरकट जाऊन ही दुर्घटना घडल्याचे त्यावेळी चौकशीत आढळून आले. खात्याने बोटीचा मास्टर व इंजिन ड्रायव्हरला दोषी ठरवून त्याचा परवाना ४५ दिवसांकरिता त्यावेळी निलंबित केला होता. 

१३ जानेवारी २0१७ रोजी एम व्ही विशाल इशान ही बोट भरकटून तिसऱ्या मांडवी पुलाच्या चालू असलेल्या कामाच्या ठिकाणी धडकली. या प्रकरणातही मास्टर व इंजिन ड्रायव्हरचे परवाने अनुक्रमे १५ व ७ दिवसांकरिता निलंबित केले होते.  गेल्या फेब्रुवारीत पर्यटकांना जलसफर घडवून आणणारी सांतामोनिका बोट भरकटली व कांपाल येथे रुतली. २१४ पर्यटक त्यावेळी बोटीत होते त्यांची सुखरुप सुटका करण्यात आली. ओहोटीमुळे तसेच जोरदार वाऱ्यामुळे ती भरकटून रुतली होती. गेल्या ३0 मे रोजी एमव्ही विशाल धनंजय ही बोटही मिरामार किनाऱ्यावर रुतली. समुद्रातील वाळूच्या पट्ट्यात ही बोट रुतली. 

अगदी अलीकडच्या घटनेत १६ जुलै रोजी मुरगांव बंदरातून मांडवी नदीत आणले जात असताना एम व्ही लकी सेव्हन हे कसिनो जहाज मिरामार किनाऱ्यावर रुतले. तब्बल ७0 दिवस हे जहाज त्या ठिकाणी रुतून बसले होते.