शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

पावसाळी अधिवेशनात सरकारला सर्व विरोधक संयुक्तपणेच घेरणार

By किशोर कुबल | Updated: June 14, 2024 14:46 IST

येत्या १५ जुलैपासून विधानसभेचे अधिवेशन जाहीर झालेले आहे. या पार्श्वभूमीवर युरी यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, सावंत सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले आहे.

पणजी : विधानसभेच्या येत्या अधिवेशनात सरकारला सर्व विरोधक संयुक्तपणेच घेरणार असल्याचे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची सांगितले. रणनीती ठरवण्यासाठी लवकरच विरोधी आमदारांची लवकरच संयुक्त बैठक बोलावली जाईल.

येत्या १५ जुलैपासून विधानसभेचे अधिवेशन जाहीर झालेले आहे. या पार्श्वभूमीवर युरी यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, सावंत सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेले आहे. म्हादईचा प्रश्न अजून सुटलेल्या नाही. वाढती बेरोजगारी, महागाई नियंत्रणात येऊ  शकलेली नाही. भ्रष्टाचाराची बजबजपुरी माजली आहे. या सर्व प्रश्नांवर विरोधक एकत्रपणे सरकारला घेरणार आहे.युरी म्हणाले की, आता निवडणुका झालेल्या आहेत. जनतेने कौल दिलेला आहे.

दक्षिण गोव्यातील पराभवाने लोकांची सरकारप्रती नाराजी दिसून आलेली आहे. विरोधक म्हणून आम्ही जनतेचे प्रश्न मांडतो. परंतु सरकार ते गंभीरपणे घेत नाही. दिलेली आश्वासने पाळली जात नाहीत. जाती, धर्माच्या प्रश्नावर मतदारांमध्ये फूट पाडण्याचे दिवस आता गेले. लोकांनी भाजपला जागा दाखवून दिलेली आहे.'युरी पुढे म्हणाले की,' सर्वसामान्य जनतेपर्यंत सरकारच्या योजना पोहोचतच नाहीत. राज्याची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. हे सरकार खाण व्यवसाय सुरू करू शकलेले नाही. भाजपने हुकुमशाही, दादागिरीची भाषा आरंभल्यानेच दक्षिण गोव्यातील लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.

युरी म्हणाले की, ' गेल्या विधानसभा अधिवेशनाच्यावेळी चुकीचा पायंडा घालण्यात आला. पाच वर्षांपेक्षा अधिक जुनी माहिती दिली जाणार नाही,असे  जाहीर करण्यात आले. आरटीआय अर्ज केला तरी जुनी माहिती मिळते. त्यामुळे विधानसभेतच पाच वर्षांपूर्वीची माहिती का मिळू नये? विरोधी व सत्ताधाऱ्यांना प्रश्नोत्तराच्या तासाला समान संधी मिळाली पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही. या सर्व गोष्टी आम्ही सभापतींच्या निदर्शनास आणून देणार आहोत.'

युरी म्हणाले की, लोकांनाही आज सर्व विरोधक एकत्र आलेले हवे आहेत. विरोधी आमदारांमध्ये मतभिन्नता असू शकते. परंतु ती तात्पुरती बाजूला ठेवून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवण्यासाठी सर्व विरोधी आमदारांनी एकत्र येणे गरजेचे आहे व त्यासाठी संयुक्त रणनीतीही ठरवावी लागेल. लवकरच बैठकीत ती ठरवली जाईल.'

टॅग्स :goaगोवा