शहरं
Join us  
Trending Stories
1
काय आहे 'SHANTI' विधेयक? केंद्र सरकानं दिली मंजुरी; खासगी सेक्टरसाठी उघडले अणुऊर्जा क्षेत्र
2
SBIनं ग्राहकांना दिली खूशखबर! स्वस्त केले कर्जाचे व्याजदर; ५० लाखांवर २० वर्षात किती बचत होईल?
3
चार्टर्ड प्लेनमधील भाजपा नेत्यांच्या सेल्फीनं अमित शाह संतापले; देवेंद्र फडणवीसांनीही सुनावले
4
जागावाटपाचे अशांत टापू, एकत्र येण्यास अडचणींचा डोंगर; महायुतीमधील वादाचे मुद्दे
5
काय आहे मोट इनव्हेस्टिंग; बर्गर किंगमध्ये काम करणाऱ्यानं यातून कशी बनवली कोट्यवधींची संपत्ती
6
Vaibhav Suryavanshi: "मी बिहारचा आहे, मला काही फरक पडत नाही"; वादळी खेळीनंतर वैभव सूर्यवंशी असं का म्हणाला?
7
धक्कादायक वास्तव : राज्यात ७ जिल्ह्यांमध्ये ३ वर्षांत बालकांच्या मृत्यूचे वाढते प्रमाण
8
पाकिस्तानी अभिनेत्रीची 'धुरंधर'साठी झालेली निवड, ऐनवेळी नाकारला सिनेमा? रणवीरसोबतचे फोटो शेअर करून झाली ट्रोल
9
भारतीय लष्कारात इंटर्नशिप करण्याची संधी, ७५ हजार मिळणार मानधन; २१ डिसेंबरपर्यंत अर्ज करा
10
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
11
Mumbai: मुंबई लोकलमध्ये जोडप्याची दादागिरी, दिव्यांग प्रवाशांशी गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल
12
आजचे राशीभविष्य, १३ डिसेंबर २०२५: 'या' राशीसाठी आज आर्थिक फायद्याचा दिवस; यश, किर्ती वाढेल
13
मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
14
Tarot Card: येत्या आठवड्यात परिस्थिती कशीही असो, मनःस्थिती उत्तम ठेवा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
15
संन्यस्त राजकारणी ! लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांचा राजकीय प्रवास
16
आव्हाड-पडळकरांच्या कार्यकर्त्यांना दोन दिवस कारावासाची शिक्षा, पावसाळी अधिवेशनातील राडा; गंभीर दखल
17
चार वर्षांत शेतीभोवती दिसणार पक्क्या पाणंद रस्त्यांचे जाळे; मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ता योजना मंजूर
18
छत्रपती शिवरायांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत का? विधानपरिषदेत सदस्यांचा सवाल : कन्टेंट हटवा
19
इंडिगो घोळाचा फटका मुंबई, नागपूरलाही; इतर कंपन्यांची विमानेही उडताहेत उशिराने
20
मुनगंटीवारांकडून झिरवळांचा ‘क्लीनअप’! पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनाच्या मुद्यावरून चिमटे : सभागृहातला ‘नरहरी’ तरी वाचवेल, अशी आशा
Daily Top 2Weekly Top 5

...'त्या' नंतर वन निवासी हक्क अर्ज निकालास गती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 07:47 IST

जमिन हक्क मिळायला हवे तशी सरकारची भूमिका आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : वन निवासी हक्क कायद्याखाली सर्व अर्ज येत्या मुक्तिदिनापूर्वी म्हणजेच डिसेंबरपर्यंत १९ निकालात काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्याने या कामाने आता वेग घेतला आहे.

जागेची पडताळणी, ग्रामसभांमध्ये मंजुरी तसेच नंतर उपजिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी कार्यालयातून दावे मंजूर करून सनदा बहाल करण्याचे काम आता गतीने होणार आहे. दक्षिण जिल्हा समितीकडून ५३४ प्रकरणे मंजूर झाली असून ५०१ फाईल्स ग्रामसभांकडे असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.वननिवासींना जमिनींचे हक्क बहाल करण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी जूनमध्ये प्रारंभीच उच्चस्तरीय बैठक घेतली होती. गेली कित्येक वर्षे हे लोक वनक्षेत्रात वास्तव्य करत असून तेथे शेतीही करत आहेत. प्रामुख्याने काणकोण, धारबांदोडा, सांगे, केपें, फोंडा व सत्तरी या तालुक्यांमधून अर्ज आलेले आहेत. खासकरून गावडा, कुणबी, वेळीप आदी अनुसूचित जमातींचे लोक वनक्षेत्रात निवास करून जमिनी कसतात. त्यांना जमिन हक्क मिळायला हवे तशी सरकारची भूमिका आहे.

एकूण सुमारे साडेदहा हजार अर्ज सरकारकडे आले. सीमांकन, सर्वेक्षण व ग्रामसभांवर भर दिला जात आहे. प्राप्त माहितीनुसार अलीकडेच सांगे तालुक्यात ५२ अर्ज निकालात काढले व २०० प्रलंबित आहेत. धारबांदोडा तालुक्यात ८१ दावे मंजूर करण्यात आले व ५५ अर्जदार प्रतीक्षेत आहेत. केपे तालुक्यात १६० दावे मंजूर केले व २७० प्रलंबित आहेत. काणकोण तालुक्यात १८६ तर फोंडा तालुक्यात ५५ दावे मंजूर करण्यात आले.

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारPramod Sawantप्रमोद सावंत