शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारत रशियाकडून तेल खरेदी करणार नाही, मोदींनी आश्वासन दिले', ट्रम्प यांचा मोठा दावा
2
अब्जाधीश असूनही पान मसाल्याची जाहिरात का? यूट्यूबर ध्रुव राठीचे शाहरुख खानला गंभीर प्रश्न; पैशांचा हिशोब सांगितला
3
मोठी गंमत! उद्धव ठाकरे करणार मनसेच्या दीपोत्सवाचे उद्घाटन; गेल्यावर्षीच निवडणूक आयोगाकडे तक्रार केलेली...  
4
त्वचारोग तज्ज्ञ डॉक्टर पत्नीला कायमचं संपवलं; इंजेक्शन देऊन पतीनेच केले खतरनाक कृत्य
5
NPS मध्ये ₹५००० ची गुंतवणूक केली की किती मिळेल Pension? अवाक् करेल तुम्हाला मिळणारा रिटर्न, आजच सुरू कराल गुंतवणूक
6
जहीर इकबालने कॅमेऱ्यासमोरच सोनाक्षीच्या बेबी बंपवर ठेवला हात अन्... Video व्हायरल
7
दिवाळी २०२५: लक्ष्मी देवीला घरी आणायचा विचार करताय? ‘या’ गोष्टी करा; स्थापना नियम, योग्य दिशा
8
भारताची रशियाकडून मोठी खरेदी; स्वस्त तेल खरेदीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, मग पहिलं कोण?
9
शेअर बाजाराची धमाकेदार सुरुवात, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; Nifty २५,४०० च्या वर, खासगी बँकांच्या शेअर्समध्ये खरेदी
10
तालिबानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तान संतापला, भारतावर केला गंभीर आरोप
11
१० राशींवर धनलक्ष्मीची अनंत कृपा, ५ राजयोगाने सोनेरी दिवस; भरपूर पैसा-भरभराट, शुभ-वरदान काळ!
12
BSNLची धमाकेदार दिवाळी ऑफर! केवळ १ रुपयांत महिनाभर चालेल इंटरनेट; सोबतच मिळणार अनलिमिटेड कॉलिंगही, पाहा
13
अखेरपर्यंत साथ! सुनेच्या पार्थिवावर डोकं ठेवून सासूने जगाचा घेतला निरोप; हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने परिसरात हळहळ
14
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
15
"माझी चूक काय? २० वर्ष मी पक्षासोबत एकनिष्ठ राहिली, तरीही..."; भाजपा महिला आमदाराला अश्रू अनावर
16
संपादकीय: ‘मविआ’ला जेव्हा जाग येते...
17
आजचे राशीभविष्य, १६ ऑक्टोबर २०२५: विविध क्षेत्रात लाभ, पदोन्नतीचीही शक्यता! 'या' राशींसाठी आजचा दिवस खास
18
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
19
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
20
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...

नवीकरणीय ऊर्जाक्षेत्रात प्रगती: श्रीपाद नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 07:27 IST

नाईक म्हणाले की, बायोएनर्जी ही आपल्या नवीकरणीय ऊर्जा धोरणाचा एक प्रमुख स्तंभ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. २०१४ मध्ये केवळ २.८ गिगावॅट सौरऊर्जा क्षमता असलेल्या भारताने गेल्या महिन्यात १०० गीगावॅट सौरऊर्जा क्षमता पार केली आहे. म्हणजेच ३५ पट इतकी लक्षणीय वाढ झालेली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज केले.

आयआयटी दिल्ली येथे राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात मंत्री श्रीपाद नाईक संबोधित करत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. श्रीकृष्णन (उपसंचालक, आयआयटी दिल्ली), डॉ. संगीता कस्तुरे (सल्लागार व शास्त्रज्ञ 'जी'), एमएनआरई प्रा. विवेक कुमार (प्रमुख, ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञान केंद्र आयआयटी दिल्ली), प्रा. विजय (समन्वयक बीडीटीसी, ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञान केंद्र, आयआयटी दिल्ली) उपस्थित होते. आयआयटी दिल्ली आणि बायोगॅस विकास व प्रशिक्षण केंद्र यांनी हा महत्त्वपूर्ण उपक्रम आयोजित केला.

सौर आणि पवनऊर्जेच्या वाढीसोबतच बायोएनर्जी क्षेत्रालाही वेग द्यायची गरज आहे, असे सांगून नाईक म्हणाले की, बायोएनर्जी ही आपल्या नवीकरणीय ऊर्जा धोरणाचा एक प्रमुख स्तंभ आहे. ही स्वच्छ ऊर्जा तर आहेच, पण त्यासोबतच कचरा व्यवस्थापन, ग्रामीण सशक्तीकरण आणि ऊर्जा आयात कमी करण्यास मदत करते.

कृषी अवशेष, नगरपालिका घनकचरा आणि पशुधन मलमूत्र यांचा उपयोग करून पर्यावरणपूरक वर्तुळाकार अर्थव्यवस्था निर्माण करता येईल सोबत स्वच्छ आणि हरित भारत घडवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन मंत्री नाईक यांनी केले. यावेळी मंत्री नाईक यांनी देशातील उत्पादित ऊर्जेविषयी सविस्तर माहिती देत, मागील प्रगतीचा आढावाही घेतला.

उत्पादनक्षमता ३०० टक्के वाढली

२०१४ मध्ये ७५.५२ गिगावॅट असलेली नवीकरणीय ऊर्जा क्षमता आता २२० गिगावॅट झाली आहे. म्हणजे सुमारे ३०० टक्के वाढ झालेली आहे. बायोगॅस उत्पादन, वीजनिर्मिती आणि संकुचित बायोगॅस तंत्रज्ञानासंबंधी हा कार्यक्रम आपल्या नवीकरणीय ऊर्जा संक्रमणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे केंद्रीय मंत्री नाईक यांनी पुढे नमूद केले.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा