शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

नवीकरणीय ऊर्जाक्षेत्रात प्रगती: श्रीपाद नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 07:27 IST

नाईक म्हणाले की, बायोएनर्जी ही आपल्या नवीकरणीय ऊर्जा धोरणाचा एक प्रमुख स्तंभ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. २०१४ मध्ये केवळ २.८ गिगावॅट सौरऊर्जा क्षमता असलेल्या भारताने गेल्या महिन्यात १०० गीगावॅट सौरऊर्जा क्षमता पार केली आहे. म्हणजेच ३५ पट इतकी लक्षणीय वाढ झालेली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज केले.

आयआयटी दिल्ली येथे राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात मंत्री श्रीपाद नाईक संबोधित करत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. श्रीकृष्णन (उपसंचालक, आयआयटी दिल्ली), डॉ. संगीता कस्तुरे (सल्लागार व शास्त्रज्ञ 'जी'), एमएनआरई प्रा. विवेक कुमार (प्रमुख, ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञान केंद्र आयआयटी दिल्ली), प्रा. विजय (समन्वयक बीडीटीसी, ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञान केंद्र, आयआयटी दिल्ली) उपस्थित होते. आयआयटी दिल्ली आणि बायोगॅस विकास व प्रशिक्षण केंद्र यांनी हा महत्त्वपूर्ण उपक्रम आयोजित केला.

सौर आणि पवनऊर्जेच्या वाढीसोबतच बायोएनर्जी क्षेत्रालाही वेग द्यायची गरज आहे, असे सांगून नाईक म्हणाले की, बायोएनर्जी ही आपल्या नवीकरणीय ऊर्जा धोरणाचा एक प्रमुख स्तंभ आहे. ही स्वच्छ ऊर्जा तर आहेच, पण त्यासोबतच कचरा व्यवस्थापन, ग्रामीण सशक्तीकरण आणि ऊर्जा आयात कमी करण्यास मदत करते.

कृषी अवशेष, नगरपालिका घनकचरा आणि पशुधन मलमूत्र यांचा उपयोग करून पर्यावरणपूरक वर्तुळाकार अर्थव्यवस्था निर्माण करता येईल सोबत स्वच्छ आणि हरित भारत घडवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन मंत्री नाईक यांनी केले. यावेळी मंत्री नाईक यांनी देशातील उत्पादित ऊर्जेविषयी सविस्तर माहिती देत, मागील प्रगतीचा आढावाही घेतला.

उत्पादनक्षमता ३०० टक्के वाढली

२०१४ मध्ये ७५.५२ गिगावॅट असलेली नवीकरणीय ऊर्जा क्षमता आता २२० गिगावॅट झाली आहे. म्हणजे सुमारे ३०० टक्के वाढ झालेली आहे. बायोगॅस उत्पादन, वीजनिर्मिती आणि संकुचित बायोगॅस तंत्रज्ञानासंबंधी हा कार्यक्रम आपल्या नवीकरणीय ऊर्जा संक्रमणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे केंद्रीय मंत्री नाईक यांनी पुढे नमूद केले.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा