शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

नवीकरणीय ऊर्जाक्षेत्रात प्रगती: श्रीपाद नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 07:27 IST

नाईक म्हणाले की, बायोएनर्जी ही आपल्या नवीकरणीय ऊर्जा धोरणाचा एक प्रमुख स्तंभ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. २०१४ मध्ये केवळ २.८ गिगावॅट सौरऊर्जा क्षमता असलेल्या भारताने गेल्या महिन्यात १०० गीगावॅट सौरऊर्जा क्षमता पार केली आहे. म्हणजेच ३५ पट इतकी लक्षणीय वाढ झालेली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज केले.

आयआयटी दिल्ली येथे राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात मंत्री श्रीपाद नाईक संबोधित करत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. श्रीकृष्णन (उपसंचालक, आयआयटी दिल्ली), डॉ. संगीता कस्तुरे (सल्लागार व शास्त्रज्ञ 'जी'), एमएनआरई प्रा. विवेक कुमार (प्रमुख, ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञान केंद्र आयआयटी दिल्ली), प्रा. विजय (समन्वयक बीडीटीसी, ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञान केंद्र, आयआयटी दिल्ली) उपस्थित होते. आयआयटी दिल्ली आणि बायोगॅस विकास व प्रशिक्षण केंद्र यांनी हा महत्त्वपूर्ण उपक्रम आयोजित केला.

सौर आणि पवनऊर्जेच्या वाढीसोबतच बायोएनर्जी क्षेत्रालाही वेग द्यायची गरज आहे, असे सांगून नाईक म्हणाले की, बायोएनर्जी ही आपल्या नवीकरणीय ऊर्जा धोरणाचा एक प्रमुख स्तंभ आहे. ही स्वच्छ ऊर्जा तर आहेच, पण त्यासोबतच कचरा व्यवस्थापन, ग्रामीण सशक्तीकरण आणि ऊर्जा आयात कमी करण्यास मदत करते.

कृषी अवशेष, नगरपालिका घनकचरा आणि पशुधन मलमूत्र यांचा उपयोग करून पर्यावरणपूरक वर्तुळाकार अर्थव्यवस्था निर्माण करता येईल सोबत स्वच्छ आणि हरित भारत घडवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन मंत्री नाईक यांनी केले. यावेळी मंत्री नाईक यांनी देशातील उत्पादित ऊर्जेविषयी सविस्तर माहिती देत, मागील प्रगतीचा आढावाही घेतला.

उत्पादनक्षमता ३०० टक्के वाढली

२०१४ मध्ये ७५.५२ गिगावॅट असलेली नवीकरणीय ऊर्जा क्षमता आता २२० गिगावॅट झाली आहे. म्हणजे सुमारे ३०० टक्के वाढ झालेली आहे. बायोगॅस उत्पादन, वीजनिर्मिती आणि संकुचित बायोगॅस तंत्रज्ञानासंबंधी हा कार्यक्रम आपल्या नवीकरणीय ऊर्जा संक्रमणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे केंद्रीय मंत्री नाईक यांनी पुढे नमूद केले.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा