शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

नवीकरणीय ऊर्जाक्षेत्रात प्रगती: श्रीपाद नाईक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 07:27 IST

नाईक म्हणाले की, बायोएनर्जी ही आपल्या नवीकरणीय ऊर्जा धोरणाचा एक प्रमुख स्तंभ आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात मोठी प्रगती केली आहे. २०१४ मध्ये केवळ २.८ गिगावॅट सौरऊर्जा क्षमता असलेल्या भारताने गेल्या महिन्यात १०० गीगावॅट सौरऊर्जा क्षमता पार केली आहे. म्हणजेच ३५ पट इतकी लक्षणीय वाढ झालेली आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी आज केले.

आयआयटी दिल्ली येथे राष्ट्रीय प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात मंत्री श्रीपाद नाईक संबोधित करत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा. श्रीकृष्णन (उपसंचालक, आयआयटी दिल्ली), डॉ. संगीता कस्तुरे (सल्लागार व शास्त्रज्ञ 'जी'), एमएनआरई प्रा. विवेक कुमार (प्रमुख, ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञान केंद्र आयआयटी दिल्ली), प्रा. विजय (समन्वयक बीडीटीसी, ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञान केंद्र, आयआयटी दिल्ली) उपस्थित होते. आयआयटी दिल्ली आणि बायोगॅस विकास व प्रशिक्षण केंद्र यांनी हा महत्त्वपूर्ण उपक्रम आयोजित केला.

सौर आणि पवनऊर्जेच्या वाढीसोबतच बायोएनर्जी क्षेत्रालाही वेग द्यायची गरज आहे, असे सांगून नाईक म्हणाले की, बायोएनर्जी ही आपल्या नवीकरणीय ऊर्जा धोरणाचा एक प्रमुख स्तंभ आहे. ही स्वच्छ ऊर्जा तर आहेच, पण त्यासोबतच कचरा व्यवस्थापन, ग्रामीण सशक्तीकरण आणि ऊर्जा आयात कमी करण्यास मदत करते.

कृषी अवशेष, नगरपालिका घनकचरा आणि पशुधन मलमूत्र यांचा उपयोग करून पर्यावरणपूरक वर्तुळाकार अर्थव्यवस्था निर्माण करता येईल सोबत स्वच्छ आणि हरित भारत घडवण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन मंत्री नाईक यांनी केले. यावेळी मंत्री नाईक यांनी देशातील उत्पादित ऊर्जेविषयी सविस्तर माहिती देत, मागील प्रगतीचा आढावाही घेतला.

उत्पादनक्षमता ३०० टक्के वाढली

२०१४ मध्ये ७५.५२ गिगावॅट असलेली नवीकरणीय ऊर्जा क्षमता आता २२० गिगावॅट झाली आहे. म्हणजे सुमारे ३०० टक्के वाढ झालेली आहे. बायोगॅस उत्पादन, वीजनिर्मिती आणि संकुचित बायोगॅस तंत्रज्ञानासंबंधी हा कार्यक्रम आपल्या नवीकरणीय ऊर्जा संक्रमणामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे, असे केंद्रीय मंत्री नाईक यांनी पुढे नमूद केले.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपा