शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

पर्रिकरांअभावी भाजपाचा ख्रिस्ती धर्मियांमधील जनाधार ढासळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2019 21:39 IST

ख्रिस्ती मतदारांनी तर भाजपकडे पूर्णपणो पाठ फिरवली. फक्त दाबोळी मतदारसंघात व अन्य एक दोन मतदारसंघांमध्ये ख्रिस्ती मतदारांची बऱ्यापैकी मते भाजपला मिळाली.

पणजी : माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर हयात असताना गोव्यातील भाजपला उत्तर व दक्षिण गोव्यातील ख्रिस्ती धर्मियांमध्ये जो थोडा तरी जनाधार प्राप्त झाला होता, तो जनाधार पर्रिकरांच्या निधनानंतर ढासळला आहे हे ताज्या निवडणूक निकालाने स्पष्ट केले आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात 2014 साली ख्रिस्ती मतदारांनी भाजपला थोडी तरी मते दिली होती. त्यामुळेच तिथे त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा पराभव झाला होता. यावेळी सासष्टीत प्रचंड मते काँग्रेसला मिळाली. वेळ्ळीसह सासष्टीतील आठपैकी एकूण तीन मतदारसंघांमध्ये काँग्रेसला दहा हजारांपेक्षा जास्त मतांची आघाडी मिळाली. सासष्टी बाहेर हिंदू मतदारांनी भाजपच्या आघाडीचे प्रमाण कमी केले. मुरगाव, फोंडा, सांगे तालुक्यात भाजपच्या आघाडीचे प्रमाण घटले. पर्रिकर हयात असते व ते सक्रिय असते तर असे घडले नसते अशी चर्चा भाजपच्या आतिल गोटात सुरू झाली आहे.

ख्रिस्ती मतदारांनी तर भाजपकडे पूर्णपणो पाठ फिरवली. फक्त दाबोळी मतदारसंघात व अन्य एक दोन मतदारसंघांमध्ये ख्रिस्ती मतदारांची बऱ्यापैकी मते भाजपला मिळाली. कुठ्ठाळीत तर काँग्रेसला आघाडी मिळाली. सासष्टीतील सर्वच मतदारसंघांमध्ये भाजपचा पाया कमकुवत झाला आहे. सासष्टीबाहेरही भाजपची हक्काची मते भाजपला मिळाली नाहीत. र्पीकर यांच्या चेह:यामुळे व नेतृत्वामुळे भाजपला मते मिळत होती. ख्रिस्ती मतदारही थोडी तरी मते देत होते, तिही यावेळी नाहीशी झाली. याविषयी पक्षात चिंतन होण्याची गरज काही घटक व्यक्त करत आहेत. भाजप जिथे ख्रिस्ती उमेदवारांना तिकीट देतो, तिथे विधानसभा निवडणुकीत ख्रिस्ती उमेदवार निवडून येतात पण हे उमेदवार स्वत:चा मतदारसंघ वगळता अन्य मतदारसंघांमध्ये भाजपसाठी ख्रिस्ती मते आणू शकत नाहीत हे सिद्ध झाले आहे. माविन गुदिन्हो यांचाही भाजपला फार लाभ झाला नाही. दाबोळीत भाजपला आघाडी मिळाली तरी, मतांचे प्रमाण कमी झाले आहे.

पणजी मतदारसंघात सहा हजार ख्रिस्ती मतदार आहेत. त्यापैकी चार हजार मतदान करण्यासाठी येतात. विधानसभेच्या पोटनिवडणुकीवेळी पणजीतील ख्रिस्ती मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी भाजपने माविन व अँलिना साल्ढाणा यांचा वापर केला. माविन व अँलिना पणजीत थोडय़ा फिरल्या पण मते भाजपला मिळाली नाहीत. लोकसभा निवडणुकीवेळी पणजीत भाजपला अडीच हजारांची आघाडी मिळाली ती हिंदू मतांमुळे. मात्र पोटनिवडणुकीत पणजीत काँग्रेसला हिंदू मते मिळालीच, शिवाय हिंदू बहुजन समाजाचीही खूप मते प्राप्त झाली. यामागिल नेमके कारण काय याचा शोध सध्या पक्षाची कोअर टीम घेत आहे. भाजपने पणजीत आपल्या पक्षाच्या अन्य ख्रिस्तीधर्मीय मतदारांना जास्त कामच दिले नव्हते.

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरBJPभाजपा