शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी! आता मूळ पगाराच्या ५० टक्के पेन्शन; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2024 09:19 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाने यासंबंधी आधीच निर्णय घेतलेला असून, याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना यामुळे फार मोठा दिलासा मिळणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाइड पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे आता त्यांना मूळ पगाराच्या ५० टक्के पेन्शन निवृत्तीनंतर मिळणार आहे. कमीत कमी १० हजार रुपये पेन्शन असेल. सरकारी तिजोरीवर यामुळे दरमहा अतिरिक्त १० कोटी रुपयांचा भार पडणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना दिली.

केंद्रीय मंत्रिमंडळाने यासंबंधी आधीच निर्णय घेतलेला असून, गोव्यातही याची अंमलबजावणी केली जाणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना यामुळे फार मोठा दिलासा मिळणार आहे. १ एप्रिल रोजी परिपत्रक येईल व त्यानंतर ही योजना लागू होईल. अधिकृत आकडेवारीनुसार राज्य सरकारचे सुमारे ७० हजार कर्मचारी आहेत. ते जसजसे ते निवृत्त होतील तसतसा या योजनेचा लाभ त्यांना होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

कोमुनिदाद संहितेत वटहुकूम आणून दुरुस्ती करण्याचा आणखी एक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आला. कोमुनिदाद ज्या कामासाठी जमीन दिलेली आहे त्या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही कामासाठी जमिनीचा वापर करता येणार नाही. उदा. घर बांधण्यासाठी, शैक्षणिक कामासाठी, उद्योग किंवा सरकारी प्रकल्पासाठी जमीन दिलेली असल्यास त्या-त्या कामांसाठीच वापरावी लागेल. प्रशासक कोमुनिदादने आदेश काढावा लागेल.

हा आदेश काढल्यानंतर टीसीपी, पालिका व इतर यंत्रणांना इतर बांधकामासाठी कोणताही परवाना देता येणार नाही. यासंबंधीचा वटहुकूम लवकरच काढला जाईल. पशुसंवर्धन खात्यात कंत्राटी पद्धतीवर ७ पदे भरण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. केंद्राच्या अनुषंगाने जीएसटी कायद्यात वटहुकूम काढून दुरुस्ती केली जाईल. आयटी धोरण मुदतवाढ देण्याचा निर्णयही घेण्यात आला.

काय आहे युनिफाइड पेन्शन योजना?

केंद्राने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात ही योजना सुरू केली. योजनेची काही ठळक वैशिष्ट्ये आहेत. खात्रीशीर पेन्शन हा महत्त्वाचा भाग आहे. २५ वर्षांच्या किमान पात्रता सेवेसाठी सेवानिवृत्त होण्यापूर्वी गेल्या १२ महिन्यांत काढलेल्या सरासरी मूळ वेतनाच्या ५० टक्के रक्कम पेन्शन म्हणून देय असेल. कमीत कमी १० वर्षांच्या सेवा असणे आवश्यक आहे. आश्वासित कौटुंबिक निवृत्तीवेतन ६० टक्के असेल. कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर कुटुंबाला ती मिळेल. किमान १० वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त झाल्यावर कमीत कमी दहा हजार रुपये पेन्शन मिळेल.

आयटी धोरणाला मुदतवाढ

राज्य मंत्रिमंडळाने २०१८च्या गोवा आयटी धोरणाच्या मुदतवाढीस मंजुरी दिली. ऑगस्ट २०१८ पासून पाच वर्षांच्या कालावधीसाठी कार्यान्वित असलेले हे धोरण गेल्या वर्षी ऑगस्ट २०२३ मध्ये संपुष्टात आले होते. नावीन्यपूर्ण आणि तंत्रज्ञानाचा वापर करून गोव्याच्या विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा आयटी धोरण आणले होते. राज्यात १० हजार रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट आहे.

घरमालकावर गुन्हा

राज्यातील वाढत्या गुन्ह्यांबाबत विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की, आमचे पोलिस सक्षम आहेत. रविवारी गृहखात्याची उच्चस्तरीय बैठक मी घेतली. डीजीपी तसेच वरिष्ठ पोलिस अधिकारी बैठकीला उपस्थित होते. गोव्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय येतात. चोऱ्या, खून यासारख्या गुन्ह्यांमध्ये परप्रांतीयांचाच हात दिसून येतो. त्यामुळेच भाडेकरू पडताळणीसाठी आजपासून १० तारीखपर्यंत मुदत दिली असून, पडताळणी न केल्याम घरमालकाला १०१ रुपये दंड ठोठावला जाईल. शिवाय त्याच्याविरुद्ध गुन्हाही नोंदवला जाईल. भाडेकरू पडताळणीबाबत विधेयक संमत होऊन खूप दिवस झाले. घरमालकांना पुरेसा वेळ दिलेला आहे. आता आणखी थांबणे शक्य नाही. खून, चोऱ्या कोण करतात, हे तपासा. घरमालकांनी चोरांना घरात आणून का ठेवावे, असा सज्जड इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारPramod Sawantप्रमोद सावंत