शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

सरकारचे पुन्हा 'तिळारीप्रेम'; कालव्यांसाठी ३३० कोटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 11:17 IST

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसोबत गोव्याची बैठक यशस्वी

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: तिळारी धरणाची उंची वाढवण्याचा विचार सुरू आहे. मात्र, अभ्यासानंतरच हा निर्णय घेतला जाईल. सध्या कालव्यांच्या दुरुस्तीची गरज असून, त्यासाठी ३३० कोटींचा निधी देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली तसेच म्हादईप्रश्नी आम्ही गोव्याबरोबर असून, एकत्रितपणे कर्नाटकशी लढा देऊ, असे आश्वासनही दिले.

'तिळारी' नियंत्रण मंडळाची काल, शनिवारी तब्बल दहा वर्षांनी मुंबईत बैठक झाली. या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीचे आयोजन करण्यासाठी गोव्याचे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी पुढाकार घेतला. निकृष्ट बांधकामामुळे वरचेवर फुटणारे कालवे, धरणग्रस्तांचे पुनर्वसन तसेच तिळारीविषयी अन्य महत्त्वाचे विषय बैठकीत चर्चेला आले. 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा आणि निर्णयही झालेले आहेत. तिळारी धरणात भरपूर पाणी आहे. परंतु ते वाया जात आहे. कालव्यांची दुरुस्ती प्राधान्यक्रम हाती घेतली जाईल. त्यासाठी उभय राज्यांच्या जलसंपदा अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक लवकरच होईल. युद्धपातळीवर कालवे दुरुस्ती होतील. तिळारी धरणग्रस्तांच्या नुकसानभरपाईचाही प्रश्न होता तोही निकालात काढण्यात आलेला आहे.

आजची बैठक अतिशय सकारात्मक झाली. तिळारी धरणाची उंची वाढवण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, याबाबतीत सखोल अभ्यास करण्याचा आदेश मी दिलेला आहे. अभ्यासांतीच योग्य तो निर्णय घेतला जाईल.

गोवा व महाराष्ट्राचा हा संयुक्त धरण प्रकल्प असून त्यावर ७३.३ टक्के खर्च गोवा सरकारने तर २६.७ टक्के महाराष्ट्र सरकारने केला आहे. हे धरण बांधताना गोव्यात १६,९७८ हेक्टर तर महाराष्ट्रात ६,६७६ हेक्टर जमीन ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. परंतु ते सर्वच काही साध्य झालेले नाही. तिळारी धरणाची क्षमता २१.९३ टीएमसी आहे. यातील १६.१० टीएमसी पाणी गोवा सरकार वापरते तर ५.८३ टीएमसी पाणी महाराष्ट्र सरकार वापरते.

वेळेत पाणी मिळणे गरजेचे

योगायोगाने दोन दिवसांपूर्वीच गोवा सरकारने 'तिळारी साठी ओलित क्षेत्र विकास मंडळ स्थापन केलेले आहे. तिळारीचे पाणी अस्नोडा जलशुद्धीकरण प्रकल्पात घेऊन संपूर्ण बार्देश तालुका व डिचोली तालुक्यातील लोकांना पिण्याचे पाणी पुरवले जाते. तिळारी कालव्याच्या पाण्यावर पेडणे, डिचोली तालुक्यातील शेती अवलंबून आहे. जर पाणी वेळेत मिळाले नाही तर शेती सुकून जाण्याच्या घटनादेखील याआधी घडलेल्या आहेत.

२२ कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख : सावंत

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, तिळारी धरणग्रस्त २२ कुटुंबांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित होता. या कुटुंबांना प्रत्येकी ५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचा निर्णय बैठकीत झालेला आहे. तिळारीच्या कालव्यांची दुरुस्ती हा प्रमुख विषय होता. ३० दिवसांच्या कालावधीत कालवे दुरुस्त करण्याची तयारी महाराष्ट्र सरकारने दाखवली आहे. तिळारी धरण पेडणे, बार्देश व डिचोली तालुक्यांना तसेच खास करून मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला पिण्याचे पाणी पुरवते. त्यामुळे हे धरण गोव्यासाठी फार महत्त्वाचे आहे. तिळारीची उंची वाढविण्याचा प्रश्नही चर्चेला आला. महाराष्ट्र सरकारने सखोल अभ्यास करूनच यावर निर्णय घेण्याची ग्वाही दिलेली आहे. 

'म्हादई' प्रश्नी कर्नाटकशी लढू

शिंदे म्हणाले की, गोवा आणि महाराष्ट्र भाऊ-भाऊ आहेत. सध्या गोव्याची जीवनदायिनी असलेल्या म्हादईचा लढा सुरु आहे. या लढ्यात आम्ही गोव्यासोबत आहोत. म्हादईचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत महाराष्ट्र गोव्यासोबत कर्नाटकशी लढा देईल, अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.

कालव्यांना भगदाड

तिळारी प्रकल्पाला ३० ते ३५ वर्षे पूर्ण झालेली आहेत. कालव्यांचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याने वरचेवर ते फुटतात. त्यामुळे गोव्यासाठी 'तिळारीचे पाणी तसे बेभरवशाचे बनले आहे. नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये देखभाल दुरुस्तीसाठी कालवे बंद असतातच. शिवाय अधून मधून कालवे फुटतात. ऑक्टोबर २०२१ मध्ये मणेरी- धनगरवाडी येथे डाव्या मुख्य कालव्याला भगदाड पडण्याची घटना त्यामुळे डाव्या कालव्यातून सुमारे दीड महिना पाणी बंद राहिले. गेल्या वर्षीही कालवे फुटल्या काही दिवस पाणी पुरवठा झाला नाही.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस