शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

२७ मध्ये २७ उमेदवार विजयी करणार; मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 07:57 IST

देश प्रथम ही भाजपची नीती

लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली : 'काँग्रेसच्या पन्नास वर्षांच्या राजवटीत कोणत्याही प्रकारचा विकास झाला नाही. भाजप सरकारने १४ वर्षांत तो विकास करताना प्रत्येक घरात समृद्धी आणण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. देश प्रथम ही भाजपची नीती आहे. कार्यकर्त्यांनी पक्षाच्या ध्येयधोरणानुसार आपले गाव, राज्य, देश मजबूतीसाठी भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे. आगामी २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत २७ उमेदवार निवडून आणू असा विश्वास व्यक्त केला आहे. डिचोली मतदारसंघातही भाजपचाच उमेदवार विजयी करू असा निर्धार कार्यकर्त्यांनी करावा,' असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

डिचोली येथील दीनदयाळ भावनात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्यास प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये, प्रदेश सचिव सिद्धार्थ कुंकळ्येकर, दयानंद कारबोटकर, अध्यक्ष डॉ. कौस्तुभपाटणेकर, नगराध्यक्ष विजयकुमार नाटेकर, वल्लभ साळकर, माजी सभापती राजेश पाटणेकर, प्रदीप रेवोडकर, विश्वास गावकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमात प्रदेशाध्यक्षपदी निवडीबद्दल डिचोली भाजप मंडळ समितीतर्फे दामू नाईक यांचा मोठा गुलाबपुष्पांचा हार घालून मुख्यमंत्री सावंत व इतर मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दामू नाईक यांच्या कार्याचा गौरव करताना संघटना व पक्ष मजबूत करण्यात त्यांचे मोठे योगदान लाभत असल्याचे सांगितले. आमदार डॉ चंद्रकांत शेट्ये यांनी संघटन मजबूत करण्यासाठी संघटित काम करू. पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री सावंत यांच्या कार्याने प्रभावित होऊन भाजपला पहिल्या दिवसापासून पूर्ण पाठिंबा दिला आहे असे सांगितले.

गेल्या तीन वर्षांत चौफेर विकास साधला आहे. डिचोलीत भव्य शासकीय संकुल, कला भवनसाठी ऐंशी कोटी मंजूर झाले आहेत. लवकरच पायाभरणी होईल. तसेच क्रीडा संकुल व इतर योजना राबवणार असल्याचे शेट्ये यांनी सांगितले. डॉ. कौस्तुभ पाटणेकर यांनी स्वागत केले. संजय म्हापसेकर यांनी सूत्रसंचालन केले.

प्रशासकीय इमारतीसाठी ८० कोटी

मुख्यमंत्री सावंत यांनी संघटन कसे मजबूत करावे याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, 'समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकास करणे हा आमचा संकल्प आहे आणि त्या हेतूनेच डिचोली मतदारसंघात अनेक योजना राबवण्यात आल्या आहेत. लवकरच ८० कोटी रुपये खर्च करून प्रशासकीय इमारतीची पायाभरणी करण्यात येणार आहे. सर्व क्षेत्रात विकासाची द्वारे खुली करून जनतेला अपेक्षित विकास साधण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.

शेटयेंना थोडे स्लो राहाण्याचा सल्ला

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचा भाजपला पूर्ण पाठिंबा आहे. डिचोलीत विकासकामाला मोठ्या प्रमाणात गती देण्यात आलेली आहे. शेट्ये हे विकासाबाबत फास्ट ट्रॅकवर आहेत. त्यांना आपण थोडे स्लो राहा असा सल्ला दिला आहे.' याशिवाय, मागील निवडणुकीत या मतदारसंघातून भाजप उमेदवार विजयी झाला नाही याची खंत आहेच असे सांगून सावंत म्हणाले की, 'पण यापुढे सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्यासाठी सर्वांनी एकत्र राहावे. कार्यकर्ता दुर्लक्षित होणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.'

जुन्या-नव्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊनच काम

प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी जुन्या व नव्यांना बरोबर घेऊन भाजप संघटना मजबूत करून आगामी निवडणुकीत मोठे यश मिळविण्यासाठी अविश्रांत कार्य करावे असे सांगितले. ते म्हणाले, कार्यकर्ते ही आमची शक्त्ती आहे. देश प्रथम ही भाजपची संकल्पना आहे. देशहितासाठी सर्वांनी संघटित राहण्याची गरज आहे.

भाजप मजबूत राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करणे गरजेचे आहे. सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली २०२७ मध्ये सत्तावीस उमेदवार विजयी करण्याचा संकल्प पूर्ण करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मोठे योगदान दिले आहे.

'भाजप पक्ष मजबूत करण्यात मनोहर पर्रीकर, श्रीपाद नाईक, राजेंद्र आर्लेकर, लक्ष्मीकांत पार्सेकर आदींनी सुरुवातीला मोठे योगदान दिले. एकेकाळी भाजीपाव पार्टी अशी अवहेलना झेलली. मात्र आज पक्ष मोठा झाल्याने अनेक पक्षांतील नेते मी येऊ, मी येऊ असे म्हणत मागे लागत आहेत.

 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPramod Sawantप्रमोद सावंतPoliticsराजकारण