शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

सरकारी कर्मचाऱ्यांना २२ दिवसांचा पास; १ जुलैपासून लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2024 13:14 IST

'कदंब'चे चेअरमन आमदार उल्हास तुयेकर यांची माहिती 

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : कदंब बसमधून प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून २२ दिवसांचा पास देण्यात येणार आहे, अशी माहिती कदंब महामंडळाचे चेअरमन व नावेलींचे आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली.

मडगाव येथे काल, शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुयेकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही योजना सुरू केली होती. जे कर्मचारी दररोज कदंब महामंडळाच्या बसने प्रवास करतात त्यांना मासिक पासमध्ये सबसिडी देण्यात आली होती. खरे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराबरोबर टीए-डीए दिला जातो. मग कदंबच्या पासमध्ये पुन्हा सबसिडी का? त्यासाठी ही सबसिडी बंद करून केवळ २२ दिवसांचे पूर्ण पैसे घेऊन पास देण्यात येईल. जर त्यांना शनिवार, रविवार प्रवास करायचा असेल तर या पासचा वापर ते करू शकतात, असे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला तात्पुरते पास दिले जातील व पुढील १५ दिवसांनंतर नियमित पास देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कदंब महामंडळाला सुमारे २ कोटी रुपये नुकसान दर वर्षाला सोसावे लागते.

दक्षिण गोव्यात 'माझी बस योजनेखाली ५५ बस घेण्यात आल्या आहेत. त्यांना दर आठवड्याला पैसे दिले जातात. शाळांसाठी १५० स्कूल बसची आवश्यकता आहे. उत्तर गोव्यात 'माझी बस' योजनेखाली कमी बस आहेत. सध्या गोव्यातून बाहेर राज्यात जाणाऱ्या आंतरराज्य बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. लवकरच आणखीन ५० बस घेतल्यानंतर ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे आमदार तुयेकर यांनी सांगितले.

... म्हणून त्या विद्यार्थ्यांना उतरवले

गेल्या आठवड्यात कदंब बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची तक्रार एका बिगर सरकारी संघटनेने केल्याने कदंब बसमधून १० विद्यार्थ्यांना खाली उतरवण्यात आले व नंतर खाली उतरवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या बसमध्ये चढवून त्यांना शाळेत पाठवण्याची व्यवस्था केली, असेही तुयेकर यांनी यावेळी स्पष्ट केली.

 

टॅग्स :goaगोवाstate transportएसटी