शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

सरकारी कर्मचाऱ्यांना २२ दिवसांचा पास; १ जुलैपासून लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2024 13:14 IST

'कदंब'चे चेअरमन आमदार उल्हास तुयेकर यांची माहिती 

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : कदंब बसमधून प्रवास करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना १ जुलैपासून २२ दिवसांचा पास देण्यात येणार आहे, अशी माहिती कदंब महामंडळाचे चेअरमन व नावेलींचे आमदार उल्हास तुयेकर यांनी दिली.

मडगाव येथे काल, शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तुयेकर म्हणाले, माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही योजना सुरू केली होती. जे कर्मचारी दररोज कदंब महामंडळाच्या बसने प्रवास करतात त्यांना मासिक पासमध्ये सबसिडी देण्यात आली होती. खरे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराबरोबर टीए-डीए दिला जातो. मग कदंबच्या पासमध्ये पुन्हा सबसिडी का? त्यासाठी ही सबसिडी बंद करून केवळ २२ दिवसांचे पूर्ण पैसे घेऊन पास देण्यात येईल. जर त्यांना शनिवार, रविवार प्रवास करायचा असेल तर या पासचा वापर ते करू शकतात, असे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला तात्पुरते पास दिले जातील व पुढील १५ दिवसांनंतर नियमित पास देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. कदंब महामंडळाला सुमारे २ कोटी रुपये नुकसान दर वर्षाला सोसावे लागते.

दक्षिण गोव्यात 'माझी बस योजनेखाली ५५ बस घेण्यात आल्या आहेत. त्यांना दर आठवड्याला पैसे दिले जातात. शाळांसाठी १५० स्कूल बसची आवश्यकता आहे. उत्तर गोव्यात 'माझी बस' योजनेखाली कमी बस आहेत. सध्या गोव्यातून बाहेर राज्यात जाणाऱ्या आंतरराज्य बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. लवकरच आणखीन ५० बस घेतल्यानंतर ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याचे आमदार तुयेकर यांनी सांगितले.

... म्हणून त्या विद्यार्थ्यांना उतरवले

गेल्या आठवड्यात कदंब बसमधून क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी असल्याची तक्रार एका बिगर सरकारी संघटनेने केल्याने कदंब बसमधून १० विद्यार्थ्यांना खाली उतरवण्यात आले व नंतर खाली उतरवण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या बसमध्ये चढवून त्यांना शाळेत पाठवण्याची व्यवस्था केली, असेही तुयेकर यांनी यावेळी स्पष्ट केली.

 

टॅग्स :goaगोवाstate transportएसटी