शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

आता २० विद्यार्थ्यांनाही मिळणार दोन शिक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 11:45 IST

गोव्यात दोन शिक्षकी शाळांचे नियम बदलले

वासुदेव पागी

पणजी: एक शिक्षकी शाळांची संख्या कमी करण्याच्या दृष्टीने शिक्षण खात्याने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. दोन शिक्षकी शाळेसाठी किमान विद्यार्थ्यांची संख्या २० वर आणली असून या आधी ती २५ होती. 

शिक्षण खात्याच्या या निर्णयामुळे राज्यातील बरीच प्राथमिक विद्यालये आहेत जी अवघ्या काही विद्यार्थ्यांमुळे दोन शिक्षकांना मुकत होती त्यांना आता दोन शिक्षक मिळणार आहेत. शिवाय एक शिक्षकी विद्यालयात मुलांना पाठवायलाही पालक खुश नसतात. या निर्णयामुळे दोन शिक्षकी शाळा वाढून विद्यार्थीही वाढतील अशी अपेक्षा शिक्षण खात्याला आहे. 

शिक्षण संचालक गजानन भट यांनी या विषयी माहिती देताना २५ विद्यार्थ्यांच्या अटीमुळे अनेक ठिकाणी शाळेला दोन शिक्षक मिळविणे कठीण होते. विशेषत: ग्रामीण भागातील विद्यालयात जिथे स्थलांतर व इतर कारणांमुळे विद्यार्थ्यांची आवश्यक संख्या मिळविणे कठीण असते त्या विद्यालयांसाठी हा नवीन निर्णय काही प्रमाणात दिलासा दायक ठरणार असल्याचं सांगितले. यंदा सरकारी विद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे ९० एक शिक्षकी शाळांपैकी ४० शाळा या वर्षी दोन शिक्षकी झाल्या आहेत. केवळ ५० एक शिक्षकी शाळा राहिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या वाढलेल्या संख्येबरोबरच बदललेल्या नियमांचाही हा परिणाम असल्याची माहिती शिक्षण खात्याकडून देण्यात आली. 

मराठी शाळेत विद्यार्थी वाढले

काणकोण, केपे, वाळपई आणि पेडणे तालुक्यात सरकारी प्राथमिक मराठी व कोंकणी माध्यमाच्या विद्यालयात विद्यार्थ्यांची संख्या वाढली असल्याची माहिती शिक्षण खात्याकडून देण्यात आली. याविशयी माहिती देताना शिक्षण संचालक गजानन भट म्हणाले, ‘राज्यातील सर्व सरकारी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा ताजा संख्यापट अलिकडेच आम्हाला मिळाला आहे. चार तालुक्यात मराठी व कोंकणी माध्यमाच्या सरकारी प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याचे आढळून आले आहे. विशेषत: मराठी माध्यमाकडे ओघ वाढतो आहे असे संकेत देणारी ही माहिती आहे. विठ्ठलापूर - साखली येथील सरकारी प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या ५० वरून ७९ वर गेली आहे. त्यामुळे नवीन इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यालयात उर्दू माध्यमाचा विभाग असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवाSchoolशाळाStudentविद्यार्थी