शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
4
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
5
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
6
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
7
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
8
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
9
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
10
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
11
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
12
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
13
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
14
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
15
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
16
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
17
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
18
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
19
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
20
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
Daily Top 2Weekly Top 5

१८० शिक्षकांची पदे भरणार, 'एससीईआरटी'ला स्वायत्त दर्जा देणार; मुख्यमंत्र्यांची माहिती 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2024 10:42 IST

दोन तास ही बैठक चालली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्यात येत्या दीड ते दोन महिन्यांत १८० शिक्षकांची भरती होईल. तसेच 'एससीईआरटी'ला स्वायत्त संस्थेचा दर्जा देऊन डी.एड. शिक्षण देणारी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था 'एससीईआरटी'च्या अधिपत्त्याखाली आणली जाईल, अशी माहिती काल, शुक्रवारी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी उच्चस्तरीय बैठकीनंतर पत्रकारांना दिली. दोन तास ही बैठक चालली.

यावर्षीपासूनच इयत्ता नववीसाठी नवीन राष्ट्रीय धोरण लागू करण्याचे बैठकीत निश्चित झाले आहे. याअनुषंगाने लवकरच सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेतली जाणार असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या या बैठकीला शिक्षण खात्याचे सचिव प्रसाद लोलयेंकर, शिक्षण खात्याचे संचालक शैलेश झिंगडे, गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे चेअरमन भगीरथ शेट्ये, 'एससीईआरटी' संचालक मेघन शेटगावकर, समग्र शिक्षा अभियानचे प्रकल्प संचालक शंभू घाडी, अभ्यासक्रम सुकाणू समितीचे कांता पाटणेकर, प्रा. अनिल सामंत, जी. आर. रिबेलो आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, नववीसाठी नवे धोरण लागू करताना काही गोष्टी कराव्या लागतील त्या प्राधान्यक्रमे हाती घेतल्या जातील. व्होकेशनल, इंटर डिसिप्लीनरी व आर्ट्स या तीन नव्या विषयांसाठी शिक्षक लागतील, ते नेमले जातील. ऑगस्टपासून या विषयांचे वर्ग सुरू होतील. इतिहास, भूगोल या विषयाच्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पूर्वप्राथमिक स्तरावर सुरू झालेली आहे. आतापासूनच माध्यमिक स्तरावर ते लागू केल्यास कालांतराने उच्च शिक्षणाच्या बाबतीत ते सुलभ होईल. दरम्यान, सरकारी खात्यांमध्ये तसेच अनुदानित शैक्षणिक संस्थांमध्ये पदे भरण्यासाठी भरती नियमांमध्ये बदल करण्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी केला.

मुख्यमंत्री म्हणाले...

व्होकेशनल, इंटर डिसिप्लीनरी व आर्टस या तीन नव्या विषयांसाठी शिक्षक लागतील, ते नेमले जातील. ऑगस्टपासून या विषयांचे वर्ग सुरू होतील. इतिहास, भूगोल या विषयांच्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी पूर्व प्राथमिक स्तरावर सुरू झालेली आहे. आतापासूनच माध्यमिक स्तरावर ते लागू केल्यास कालांतराने उच्च शिक्षणाच्या बाबतीत ते सुलभ होईल.

'ओसीआय' बाबतचा अंतिम निर्णय केंद्राचा

ओसीआय कार्डासाठी भारतीय पासपोर्ट परत केल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचा विषय केंद्रीय गृह मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. मंत्रालयाने या गोष्टीला नकार दिलेला नाही. राज्य सरकार याबाबतीत केंद्राच्या संपर्कात आहे. असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले. केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे आधी म्हटले होते; परंतु त्यावर ३० एप्रिल रोजी शुद्धिपत्रक जारी करून हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले. अचानक केंद्राने याबाबत घुमजाव केल्याने विरोधी पक्षांनी सरकारवर आगपाखड केली होती. 'ओसीआय'बाबत असलेल्या अडचणींची सरकारला पूर्ण कल्पना आहे. राज्य सरकार याबाबतीत सातत्याने केंद्राकडे संपर्कात असून अंतिम निर्णय मात्र केंद्रीय गृहमंत्रालयाचा राहील, असेही ते म्हणाले.

 

टॅग्स :goaगोवाEducationशिक्षणPramod Sawantप्रमोद सावंतTeacherशिक्षक