शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

‘कट प्रॅक्टीस’ हा वैद्यकीय व्यवसायाला लागलेला रोग! - तात्याराव लहाने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 4:40 AM

 बाली : ‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले’, ही तुकोबांची शिकवण आजच्या काळात कट प्रॅक्टीस करणाºया डॉक्टरांचे डोळे उघडण्यासाठीच आहे. रुग्ण पैशाच्या भ्र्रांतीत असतात. त्यामुळे त्यांच्या रोगाचे निदान कमीत कमी खर्चात करणे आवश्यक आहे. मात्र अशा वेळी त्यांना नाडणारी ‘कट प्रॅक्टीस’ ही वैद्यकीय पेशाला लागलेला रोग आहे, अशी ...

 बाली : ‘जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले’, ही तुकोबांची शिकवण आजच्या काळात कट प्रॅक्टीस करणाºया डॉक्टरांचे डोळे उघडण्यासाठीच आहे. रुग्ण पैशाच्या भ्र्रांतीत असतात. त्यामुळे त्यांच्या रोगाचे निदान कमीत कमी खर्चात करणे आवश्यक आहे. मात्र अशा वेळी त्यांना नाडणारी ‘कट प्रॅक्टीस’ ही वैद्यकीय पेशाला लागलेला रोग आहे, अशी टीका ज्येष्ठ नेत्रविकारतज्ज्ञ आणि मुंबईतील सर जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी येथे केली.इंडोनेशियातील बाली येथे सुरू असलेल्या सातव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. डॉ. लहाने यांनी अध्यक्षीय भाषणात अन्यही अनेक महत्त्वाच्या विषयांना हात घातला. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश.कट प्रॅक्टीस म्हणजे एखाद्या डॉक्टराने रुग्णाला उपचारांसाठी दुसºया डॉक्टराकडे पाठविण्यासाठी कमिशन स्वरुपात पैसे घेणे. गरज नसताना महागड्या चाचण्या सांगून लॅबकडून कमिशन घेणे. या कट प्रॅक्टीसमुळे देशातला सर्वसामान्य नागरिक भरडला जात आहे. यासंबंधी शासनाने कडक पावले उचलायला सुरुवात केली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला याबाबत कारवाईचे विशेष अधिकार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती डॉ. लहाने यांनी या वेळी दिली.रुग्ण मरावा, असे डॉक्टरला कधीच वाटत नसते. तो रुग्णाला वाचविण्यासाठीच धडपडत असतो. पण तो देव नव्हे. काही प्रकरणांत प्रयत्न करूनही यश मिळत नाही. अशा वेळी रुग्णांच्या नातेवाइकांनीही संयम ठेवायला हवा, असे आवाहनही डॉ. लहाने यांनी या वेळी केले.लोकसंख्येच्या तुलनेत डॉक्टरांची संख्या वाढली पाहिजे. म्हणून आणखी वैद्यकीय महाविद्यालयांची गरज आहे. तसेच अतिविशेषोपचार विभागांची संख्या वाढविणेही आवश्यक आहे. तसेच देशातील १०४ दशलक्षपेक्षा जास्त लोकसंख्या आदिवासी भागात राहात असून त्यांच्या आरोग्यविषयक गरजांकडे शासनाने लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.त्याचप्रमाणे, ‘भारतामध्ये अवयवदात्यांचे प्रमाण अत्यंत कमी आहे. याबाबतच्या अंधश्रद्धा, विविध गैरसमज दूर करण्याची नितांत आवश्यकता आहे. मृत्यूनंतर एक देह ७ जणांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरू शकतो. राज्यात २०१५-१६ साली ४१ जणांनी अवयवदान केले होते. यंदा शासनाच्या महाअवयवदान अभियानानंतर हा आकडा १४१ गेला आहे. ‘अनंत आमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा’ या कुसुमाग्रजांच्या काव्यपंक्तींनुसार, वैद्यकीय क्षेत्राचा आवाका अनंत आहे. तसेच वैद्यकीय क्षेत्रासमोरील आव्हानेही मोठी आहेत,’ असेही लहाने यांनी म्हटले.आरोग्य सांभाळण्याची जबाबदारीवैद्यकीय क्षेत्रासमोरील आव्हाने समर्थपणे पेलण्याचे आमचे ध्येय आहे आणि ते ध्येय आम्ही साध्य करू, अशी आम्हाला आशा आहे. सर्वांचे ‘आरोग्य’ अधिकाधिक उत्तम करण्यासाठी आम्ही डॉक्टर नेहमीच प्रयत्नशील असतो; परंतु वैयक्तिक पातळीवर आरोग्य सांभाळण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरिकाची आहे, असेही लहाने यावेळी म्हणाले.