शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
3
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
4
नोकरी गेलीय, पण कर्जाचे हप्ते तसेच आहेत; मोरेटोरियम योग्य पर्याय आहे का? जाणून घ्या
5
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
6
SIR साठी पश्चिम बंगाल तयार नाही; ममता सरकारचे निवडणूक आयोगाला पत्र
7
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
8
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
9
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
10
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
11
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
12
Raksha Bandhan 2025 Gift Ideas: केवळ चॉकलेट मिठाई नको! रक्षाबंधनाच्या निमित्तानं बहिणीला द्या 'हे' आर्थिक गिफ्ट
13
354 डब्बे, 7 इंजिन अन् 4.5 किमी लांबी; या राज्यात धावली देशातील सर्वात लांब मालगाडी ‘रुद्रास्त्र’
14
'मंजिल आने वाली है...' कोडवर्ड देत पतीला कायमचं संपवलं; प्रियकरासोबत पत्नीनं रचलं क्रूर षडयंत्र
15
हृदयद्रावक! ढगफुटीमुळे भाऊ बेपत्ता, आता मी कोणाला राखी बांधू?; बहिणीने फोडला टाहो
16
पत्रिका पाहून लग्न करावं का? तेजश्री प्रधानचं लग्नसंस्थेवर भाष्य; म्हणाली, "पूर्वजांनी लिहून ठेवलंय..."
17
देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC च्या स्टॉकमध्ये हेवी बाईंग; मोतीलाल ओसवालपासून अनेक ब्रोकरेज बुलिश
18
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुजवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
19
Abu Azmi: "माझ्या मतदारसंघातही मतांची चोरी", राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर अबू आझमींची प्रतिक्रिया
20
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला

युवापिढीने हुकुमशाही सरकारला धडा शिकवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:41 IST

भाजपप्रणित सरकारच्या कार्यकाळात एकाही बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही. शेतमालाला दुप्पट भाव देण्याचे आश्वासनही खोटे निघाले, याउलट जातीजातीमध्ये वाद निर्माण करून युवापिढीला बरबाद करण्याचे कारस्थान आखले जात आहे.

ठळक मुद्देगडचिरोलीत पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा : युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भाजपप्रणित सरकारच्या कार्यकाळात एकाही बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही. शेतमालाला दुप्पट भाव देण्याचे आश्वासनही खोटे निघाले, याउलट जातीजातीमध्ये वाद निर्माण करून युवापिढीला बरबाद करण्याचे कारस्थान आखले जात आहे. त्यामुळे देशात अराजकता पसरविणाऱ्या हुकुमशाही भाजप सरकारला आता युवापिढीने धडा शिकवावा, असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केले.बुधवारी स्थानिक चामोर्शी मार्गावरील केमिस्ट भवनात युवक काँग्रेसची बैठक घेण्यात आली. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी मंचावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, माजी खा.मारोतराव कोवासे, युकाँचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, प्रकाश ईटनकर, माजी आ.पेंटारामा तलांडी, सगुणा तलांडी, युकाँचे निरीक्षक केतन रेवतकर, युकाँचे प्रदेश सचिव इशात शेख, महासचिव तन्वीर विद्राही, काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, सुदाम मोटवानी, मिलींद खोब्रागडे, अमोल भडांगे, जि.प.चे गटनेते मनोहर पोरेटी, जिल्हा महासचिव समशेर खॉ पठाण, युवा नेते विश्वजीत कोवासे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहेरी विधानसभा अध्यक्ष स्व.परसा महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.पुढे बोलताना प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले, निवडणुकीच्या वेळी भाजपच्या पुढाºयांनी जनतेला मोठमोठी आश्वासने दिली. मात्र केंद्र सरकारच्या साडेचार वर्षाच्या काळात एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. राज्य सरकारही सर्व क्षेत्रात अपयशी ठरले आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेची फसवणूक झाली. देशात शांतता, अखंडता कायम राहून सर्व जाती, धर्माच्या बांधवांचा विकास होण्यासाठी युवक काँग्रेसच्या संघर्षाला लोकांनी साथ दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. १८ डिसेंबर २०१८ रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसची जनसंपर्क यात्रा गडचिरोली जिल्ह्यात येणार आहे. या यात्रेत युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तांबे यांनी केले. याप्रसंगी माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, माजी खा.मारोतराव कोवासे यांनीही मार्गदर्शन केले.मेळाव्याला प्रभाकर वासेकर, मुस्ताक हकीम, शंकरराव सालोटकर, पांडुरंग घोटेकर, डी.डी.सोनटक्के, काशिनाथ भडके, गौरव अलाम, प्रतिक बारसिंगे, अभिजीत धाईत, अधीर इंगोले, तौफिक शेख, दीपक ठाकरे, मिलिंद किरंगे, उमेश पेडुकर, सुभाष धाईत, मोहन नामेवार, योगेश नैताम, वैभव कडस्कर, गौरव येनप्रेड्डीवार, विजय अमृतकर, विवेक ढोंगळे, राकेश परसा, कौसर खान, सामय्या कडवे, रजाक पठाण आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस