शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: कलांमध्ये भाजपाची 'एक नंबर' कामगिरी; NDA ची सत्ता राखण्याच्या दिशेनं घोडदौड
2
Bihar Election 2025 Result: प्रशांत किशोर यांचे ३ उमेदवार आघाडीवर; एक्झिट पोल खरे ठरणार?
3
IND vs SA 1st Test : गिल पुन्हा अनलकी; अखेर बावुमानं संपवली दक्षिण आफ्रिकेची 'साडेसाती'
4
Bihar Election 2025 Result: सुरुवातीचे कल हाती; BJP-RJD मध्ये काँटे की टक्कर, NDA आघाडीवर
5
Stock Market Today: सुरुवातीच्या व्यवहारात १०० अंकांपेक्षा अधिक घसरला बाजार, २५,८०० च्या खाली निफ्टी
6
Bihar Election: सरकार स्थापन करण्यासाठी किती जागा आवश्यक? समजून घ्या बहुमताचं गणित!
7
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावं आल्यानं खळबळ
8
ICUमध्ये धर्मेंद्र आणि देओल कुटुंबाचा गुपचूप व्हिडीओ बनवणं पडलं महागात, हॉस्पिटलचा कर्मचारी अटकेत
9
"माझे काही फोटो अश्लील पद्धतीने...", अचानक व्हायरल झाल्यावर गिरीजा ओकने व्यक्त केली चिंता
10
बंडखोरीवर उपाय: अर्ज भरल्यावर भाजप जाहीर करणार उमेदवारांची यादी; ८०% नावे निश्चित
11
जबरदस्त रिटर्न देईल 'ही' स्कीम, केवळ ₹५,००० ची गुंतवणूक देईल ₹२६ लाखांपेक्षा जास्त फंड; पाहा कॅलक्युलेशन
12
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
13
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
14
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
15
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
16
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
17
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
18
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
19
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
20
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

युवापिढीने हुकुमशाही सरकारला धडा शिकवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:41 IST

भाजपप्रणित सरकारच्या कार्यकाळात एकाही बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही. शेतमालाला दुप्पट भाव देण्याचे आश्वासनही खोटे निघाले, याउलट जातीजातीमध्ये वाद निर्माण करून युवापिढीला बरबाद करण्याचे कारस्थान आखले जात आहे.

ठळक मुद्देगडचिरोलीत पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा : युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : भाजपप्रणित सरकारच्या कार्यकाळात एकाही बेरोजगारांना रोजगार मिळाला नाही. शेतमालाला दुप्पट भाव देण्याचे आश्वासनही खोटे निघाले, याउलट जातीजातीमध्ये वाद निर्माण करून युवापिढीला बरबाद करण्याचे कारस्थान आखले जात आहे. त्यामुळे देशात अराजकता पसरविणाऱ्या हुकुमशाही भाजप सरकारला आता युवापिढीने धडा शिकवावा, असे आवाहन युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केले.बुधवारी स्थानिक चामोर्शी मार्गावरील केमिस्ट भवनात युवक काँग्रेसची बैठक घेण्यात आली. यावेळी ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. याप्रसंगी मंचावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, माजी खा.मारोतराव कोवासे, युकाँचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी जिल्हाध्यक्ष हसनअली गिलानी, प्रकाश ईटनकर, माजी आ.पेंटारामा तलांडी, सगुणा तलांडी, युकाँचे निरीक्षक केतन रेवतकर, युकाँचे प्रदेश सचिव इशात शेख, महासचिव तन्वीर विद्राही, काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश विधाते, सुदाम मोटवानी, मिलींद खोब्रागडे, अमोल भडांगे, जि.प.चे गटनेते मनोहर पोरेटी, जिल्हा महासचिव समशेर खॉ पठाण, युवा नेते विश्वजीत कोवासे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहेरी विधानसभा अध्यक्ष स्व.परसा महाराज यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.पुढे बोलताना प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले, निवडणुकीच्या वेळी भाजपच्या पुढाºयांनी जनतेला मोठमोठी आश्वासने दिली. मात्र केंद्र सरकारच्या साडेचार वर्षाच्या काळात एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. राज्य सरकारही सर्व क्षेत्रात अपयशी ठरले आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेची फसवणूक झाली. देशात शांतता, अखंडता कायम राहून सर्व जाती, धर्माच्या बांधवांचा विकास होण्यासाठी युवक काँग्रेसच्या संघर्षाला लोकांनी साथ दिली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. १८ डिसेंबर २०१८ रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात काँग्रेसची जनसंपर्क यात्रा गडचिरोली जिल्ह्यात येणार आहे. या यात्रेत युवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन तांबे यांनी केले. याप्रसंगी माजी आ.डॉ.नामदेव उसेंडी, माजी खा.मारोतराव कोवासे यांनीही मार्गदर्शन केले.मेळाव्याला प्रभाकर वासेकर, मुस्ताक हकीम, शंकरराव सालोटकर, पांडुरंग घोटेकर, डी.डी.सोनटक्के, काशिनाथ भडके, गौरव अलाम, प्रतिक बारसिंगे, अभिजीत धाईत, अधीर इंगोले, तौफिक शेख, दीपक ठाकरे, मिलिंद किरंगे, उमेश पेडुकर, सुभाष धाईत, मोहन नामेवार, योगेश नैताम, वैभव कडस्कर, गौरव येनप्रेड्डीवार, विजय अमृतकर, विवेक ढोंगळे, राकेश परसा, कौसर खान, सामय्या कडवे, रजाक पठाण आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेस