शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

नक्षल्यांकडून हत्यासत्र, अहेरी तालुक्यात तरुणास गोळ्या झाडून संपविले

By संजय तिपाले | Updated: November 25, 2023 13:42 IST

महिनाभरात तीन हत्या: पोलिसांचा खबऱ्या असल्याचा पत्रकात दावा

गडचिरोली : पोलिसांचा खबरी असल्याचा संशयावरुन नक्षल्यांनी एका तरुणाची गोळ्या झाडून हत्या केली. ही खळबळजनक घटना २४ नोव्हेंबरला सायंकाळी घडली. दरम्यान, २३ नोव्हेंबरला एटापल्ली तालुक्यात पोलिस पाटलाची हत्या केली होती. या घटनेनंतर २४ तासांतच तरुणास संपविले. महिनाभरात तिघांना नक्षल्यांनी बंदुकीचा निशाणा बनविल्याने जिल्हा हादरुन गेला आहे.

रामजी आत्राम (२७, रा. कापेवंचा ता. अहेरी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. घटनास्थळी आढळलेल्या नक्षल पत्रकात तो खबऱ्या असल्याचा दावा केला आहे. २४ नोव्हेंबर रोजी अहेरी तालुक्यातील राजाराम खांदला पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कापेवंचा येथे रामजी आत्राम हा शेतात काम करीत होता. दरम्यान, सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास काही सशस्त्र नक्षलवाद्यांनी त्याठिकाणी जाऊन गोळ्या झाडून त्याची हत्या केली. पोलिस खबऱ्या असल्याच्या संशयावरून नक्षल्यांनी रामजीची हत्या केल्याचा दावा नक्षल्यांनी घटनास्थळी टाकलेल्या पत्रकात केला आहे. तर तो खबरी नव्हता असे पोलिसांचे म्हणणे आहे. याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. 

महिनाभरात दक्षिण गडचिरोलीत नक्षल्यांनी तिघांची हत्या केली आहे. १५ नोव्हेंबरला भामरागड तालुक्यातील पेनगुंडा येथे दिनेश गावडे, २३ तारखेला एटापल्ली तालुक्यातील टिटोळा येथील पोलीस पाटील लालसू वेडदा आणि काल शुक्रवारी अहेरी तालुक्यातील कापेवंचा येथील रामजी आत्राम या तरुणाची हत्या केली. हत्येनंतर माओवादी एरिया कमिटी अहेरी या नावाने घटनास्थळी पत्रक सोडण्यात आले आहे.

तोडगट्टा आंदोलन उधळल्यानंतर नक्षली आक्रमक

तोडगट्टा (ता.एटापल्ली) येथील २५० दिवसांपासून सुरु असलेले खाणविरोधी आंदोलन पोलिसांशी झालेल्या वादानंतर उधळून लावण्यात आले.  त्यामुळे नक्षलवादी अधिकच आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.  मागील दोन वर्षांपासून शांत असलेले नक्षलवादी पुन्हा आक्रमक होत असल्याचे चित्र आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूGadchiroliगडचिरोली