शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रबी पिकाच्या उताऱ्यात यंदा प्रचंड घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 01:03 IST

जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यात रबी हंगामात उन्हाळी धानपीक घेतले जाते. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली. शिवाय रबी हंगामात तूर, मूग, उडीद, चणा, गहू व इतर पिकांची पेरणी करण्यात आली. मात्र अत्यल्प पावसामुळे जलसाठे आधीच कोरडे झाले.

ठळक मुद्देधानासह तूर, गहू, मुगाचे उत्पादन कमी : रबी पिकाची कापणी व मळणी अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्कलखमापूर बोरी : जिल्ह्याच्या बहुतांश तालुक्यात रबी हंगामात उन्हाळी धानपीक घेतले जाते. यंदाही अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी धानपिकाची लागवड केली. शिवाय रबी हंगामात तूर, मूग, उडीद, चणा, गहू व इतर पिकांची पेरणी करण्यात आली. मात्र अत्यल्प पावसामुळे जलसाठे आधीच कोरडे झाले. हवामानातही वारंवार बदल झाला. दरम्यान किडीचा प्रादुर्भावही पिकांवर झाला. या सर्व बाबीमुळे यंदा रबी पिकाच्या उताऱ्यात घट आल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले आहे.चामोर्शी तालुक्यात शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. शासनाच्या विविध योजनेतून शेततळे, सिंचन विहीर, तलाव खोलीकरण आदी सोयीसुविधा काही प्रमाणात झाल्या आहेत. या तोकड्या सिंचन सुविधेच्या भरवशावर बऱ्याच शेतकऱ्यांनी यंदाच्या रबी हंगामात उन्हाळी धानपिकाची लागवड केली. तसेच आरमोरी, वैरागड, कुरखेडा, देसाईगंज या तालुक्यात कडधान्य पिकांवर भर देण्यात आला. शेतकऱ्यांनी धान व कडधान्य पिकांवर लागवडीसाठी मोठा खर्च केला. मात्र ऐन वेळी निसर्गाने साथ न दिल्याने याचा परिणाम रबी हंगामातील पिकांवर झाला.रबी हंगामातील पिकांवर मध्यंतरीच्या काळात विविध प्रकारच्या रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. या रोगातून पिकांना वाचविण्यासाठी शेतकऱ्यांनी नाना तºहेच्या कीटकनाशकाची फवारणी केली. काही शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवरील रोग काही दिवसांपुरती आटोक्यात आला. मात्र पुन्हा वातावरणात बदल झाल्याने अळीचा प्रादुर्भाव झाला.चणा, तूर, मूग, गहू, उडीद पीक भरण्याच्या स्थितीत असताना किडीचा प्रादुर्भाव झाला. शेतातील या पिकाची कापणी केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांनी मळणी केली. मळणीनंतर शेतकऱ्यांचा आशावाद फोल ठरला. शेतकऱ्यांनी काढलेल्या अंदाजाच्या तुलनेत अत्यंत कमी उत्पादन झाल्याने अनेक शेतकरी निराश झाले. एकूणच खरीप हंगामातही पीक चांगल्या पद्धतीने आले नाही. आता रबी हंगामातही निसर्गाने दगा दिल्याने शेतकऱ्यावर संकट कोसळले आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी