शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
3
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
4
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
5
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
6
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
7
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
8
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
9
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
10
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
11
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
12
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
13
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
14
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
15
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
16
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
17
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव
18
घोसाळकरांना धक्का, पेडणेकरांचा मार्ग मोकळा; मुंबई मनपा आरक्षण सोडत जाहीर! जाणून घ्या संपूर्ण यादी...
19
Delhi Red Fort Blast : स्फोट प्रकरणात पुलवामा कनेक्शन समोर; डॉ. उमरचा जवळचा मित्र डॉ. सज्जाद अहमद याला अटक
20
Video - रीलचा नाद लय बेक्कार! व्यूजसाठी घरी केला खतरनाक स्टंट; गरम तव्यावर बसला अन्...

संयमाचा बांध तुटला; ४५ गावांतील नागरिकांचा मुरुमगावच्या महावितरण कार्यालयावर ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2022 14:43 IST

मंजूर असलेल्या उपकेंद्राचे काम थांबविले, गावकरी म्हणतात आम्ही काय गुन्हा केला?

कोरची/मुरुमगाव (गडचिरोली) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवातही कोरची तालुक्यातील कोटगूल क्षेत्रातील ४५ गावांमधील समस्या सोडविण्यात राज्यकर्त्यांना यश आले नाही. सध्या वीज पुरवठ्याची समस्या या भागात ऐरणीवर आहे. अनेक वेळा या समस्येकडे लक्ष वेधूनही चालढकलपणा केला जात असल्याने अखेर या भागातील ४५ गावांमधील नागरिकांच्या संयमाचा बांध तुटला. ३०० वर लोकांनी गुरुवारी मुरुमगाव येथील ३३ केव्ही उपकेंद्रावर ठिय्या देऊन कोटगूल क्षेत्रासाठी मंजूर असलेल्या उपकेंद्राचे काम सुरू का करत नाही?, असा सवाल केला. अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने रात्री उशिरापर्यंत नागरिक त्याच ठिकाणी ठाण मांडून होते.

गेल्या २५ ऑगस्टला नागरिक व स्थानिक लोकप्रतिनिधींनी कोरची तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे निवेदन देऊन विजेची समस्या सोडवण्याची विनंती केली होती. त्या निवेदनात दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे गुरुवारी दुपारी मुरुमगाव येथील उपकेंद्रावर गडचिरोलीवरून आलेले महावितरण कार्यकारी अभियंता डोंगरवार, अतिरिक्त कार्यकारी अभियंता शैलेश वाशिमकर यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना घेराव घातला. ढोलडोंगरी येथील मंजूर असलेले ३३ केव्ही उपकेंद्र केव्हा उभारणार?, अशी विचारणा केली. यावेळी धानोराचे उपकार्यकारी अभियंता देशोपाल शेंडे, मुरुमगावचे कनिष्ठ अभियंता चेतन लांडगे, कोरची तहसीलचे महसूल निरीक्षक प्रमोद धाईत, धानोराचे नायब तहसीलदार, मुरुमगावचे पोलीस उपनिरीक्षक गणेश आठवे उपस्थित होते.

कोणी अडवले उपकेंद्राचे काम?

ढोलडोंगरी येथे मंजूर असलेल्या ३३ केव्ही वीज वितरण उपकेंद्राचे काम अद्यापही सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना वारंवार वीज पुरवठ्याची समस्या उद्भवत आहे. यात आमचा काय दोष?, असा सवाल अधिकाऱ्यांना केला. त्यावर अधिकाऱ्यांनी सांगितले की, तत्कालीन सरकारने ढोलडोंगरी येथील ३३ केव्ही उपकेंद्राचे काम मंजूर केले. या कामासाठी ७ कोटीचा निधीही आलेला आहे. कामाचे टेंडर होऊन दोन कंत्राटदारांना हे कामही दिले होते, परंतु नवीन सरकारने या सध्या कोणतेही नवीन काम सुरू न करण्याबाबत आदेश काढले आहे. त्यामुळे हे काम अजूनपर्यंत सुरू झालेले नसल्याचे त्यांनी सांगितले.

लिखित स्वरुपात हमी द्या

संतप्त नागरिकांनी उपकेंद्र उभारणीचे काम केव्हा सुरू करणार याची लिखित स्वरूपात हमी द्या, अशी मागणी कार्यकारी अभियंता डोंगरवार यांना केली. त्यावर आपण लिखित स्वरूपात देऊ शकत नाही, परंतु, १५ ते ३० दिवसांचा वेळ द्या, कामाला लवकरच सुरुवात करू, असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु आतापर्यंत आम्ही अनेक आंदोलने करूनही काही उपयोग झाला नाही. त्यामुळे आता आमची समस्या सुटणार नाही तोपर्यंत येथून जाणार नाही, अशी भूमिका नागरिकांनी घेतली.

मुक्कामासाठी नागरिकांनी ठोकले तंबू

वीज उपकेंद्राच्या कामाचा एकदा सोक्षमोक्ष लावायचाच या निर्धाराने आलेल्या नागरिकांनी उपकेंद्र परिसरातच तंबू ठोकून मुक्कामाची व्यवस्था केली होती. शुक्रवारला छत्तीसगड ते महाराष्ट्र मार्गावर चक्काजाम आंदोलन करणार असल्याचे त्यांनी वरिष्ठांना सांगितले. यामुळे परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :agitationआंदोलनmahavitaranमहावितरणGadchiroliगडचिरोली