शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
2
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
3
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
4
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
5
Sonam Kapoor : सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट; नवऱ्याची मजेशीर कमेंट
6
कूनोतून आली गुडन्यूज; भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म
7
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न
8
आरोग्य विमा होणार स्वस्त? प्रीमियमच्या मनमानी वाढीला लगाम लागणार; सरकार उचलणार 'ही' मोठी पाऊले!
9
महिन्यात दिवस कमी असो किंवा जास्त, पगार नेहमी ३० दिवसांचाच का येतो? काय आहे कॅलक्युलेट करण्याचा फॉर्म्युला
10
VIDEO: जिममध्ये वजन उचलताना अचानक तोल गेला, मुलीच्या मानेवर पडला वजनदार बार अन् मग...
11
'आजोबा वारले, तरी इंडक्शन कॉलला हजर रहा!' कॉर्पोरेट जगात 'विषारी' वर्ककल्चरचा कळस; नेटकऱ्यांचा संताप
12
टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
13
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
14
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
15
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
16
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
17
Numerology: तुमचा जन्म ‘या’ ३ पैकी तारखांना झालाय? गूढ-रहस्य असते जीवन, केतु देतो अमाप पैसा!
18
वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये
19
4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
20
सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या संकटात गडचिरोली जिल्ह्यातील महिलांचा मातामायवर भरवसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 14:38 IST

Gadchiroli news गावात कोरोना महामारीचे संकट येऊ नये म्हणून गावकरी ग्रामदैवत असलेल्या मातामायला साकडे घालत आहेत. गाव संकटमुक्त राहावे व गावात सुख-शांती नांदावी म्हणून मातामायला महिलांकडून साकडे घालण्याचा प्रयत्न कान्होली गावात सुरू आहे.

ठळक मुद्देमातापूजन करण्याची परंपरा कायमकान्होलीतील महिला घालताहेत साकडे

लोकमत न्यूज नेटवर्क 

गडचिरोली : गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारी संकट जनसामान्यांना जेरीस आणत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. अशा स्थितीत गावात कोरोना महामारीचे संकट येऊ नये म्हणून गावकरी ग्रामदैवत असलेल्या मातामायला साकडे घालत आहेत. गाव संकटमुक्त राहावे व गावात सुख-शांती नांदावी म्हणून मातामायला महिलांकडून साकडे घालण्याचा प्रयत्न कान्होली गावात सुरू आहे.

भेंडाळा परिसरात असलेल्या कान्होली येथील महिलांनी गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या वैनगंगा नदीवर पायी जाऊन घागर व चरवीमधून डोक्यावर पाणी आणून गावातील मातामाय, हनुमान मंदिर या ठिकाणी वाहिले जात आहे. ग्रामदैवत असलेल्या मातामायवर महिला भरवसा करीत पूजाअर्चा करीत आहेत; पण ही संकल्पना पुरोगामी विचाराच्या लोकांना न पटण्यासारखी आहे. नागरिकांनी या पद्धतीच्या परंपरेत गुरफटून न राहता कोरोनाबाबत सांगितल्या जात असलेले नियम पाळले तर कोरोनाला दूर ठेवण्यात यश येईल, असे अनेकांना वाटते.

गावात कोणताही धार्मिक कार्यक्रम असला की मातापूजन करण्याची परंपरा आहे तसेच लग्न सोहळ्यापूर्वी मातामायला हळद नेली जात असते. एवढेच नव्हे तर गावातील कोणतेही संकट दूर करण्यासाठी ग्रामस्थ टाळ-मृदंग हाती घेऊन वाजतगाजत दिंडी काढत असतात. यातून आत्मिक समाधान लाभत असते, असा समज आहे. बदलत्या काळानुसार आज सर्वच क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येत असला तरी पूर्वापार चालत आलेल्या प्रथा, परंपरा आजही ग्रामीण भागात घट्ट बसून आहेत.

सध्या कोरोना संकटाची दुसरी लाट सुरू असून शहरासह ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाचा शिरकाव झालेला असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक या रोगाने भयभीत झालेले आहेत. गावात कोरोना संकट येऊच नये, यासाठी महिलांनी पुढाकार घेत माता पूजनचा निर्णय घेत वैनगंगा नदीवरून पाणी आणून मातामायची पूजा केली आहे. असा चार पाच दिवस पूजन चालणार असल्याची माहिती गावांतील महिलांनी दिली. यावेळी शांता चुनारकर, कमल झाडे, नंदा चुनारकर, शोभा चौधरी, नीता चुनारकर, छकुली चुनारकर, सोनी चुनारकर, छाया घोटेकर, पल्लवी चुनारकर, संतोषी झाडे, पारू फाले, ललिता फाले, निर्मला फाले, मालता चुनारकर, शेवंता झरकर, पुष्पा गोहणे, वंदना वडुले, मंदा सोनटक्के, कमला शेंडे, कासू शेंडे उपस्थित होते.

ग्रामदैवतांच्या पूजनाची जुनी परंपरा

गावात कोणतेही संकट येऊ नये यासाठी गावातील ग्रामदैवतांची पूजा करण्याची परंपरा अनादि काळापासून गावखेड्यात आहे. ग्रामीण भागातील शेतशिवारात आजही मातामायची मंदिरे आहेत. काही गावांत पक्के बांधकाम केलेली तर काही गावांत निसर्गाच्या सानिध्यात मातामायचे मंदिरे आहेत. पूर्वी वैद्यकशास्त्र फारसे प्रगत नव्हते त्याकाळात कांजण्या, गोवर यासारखे आजार गावात यायचे. त्यातून रुग्णांची सुधारणा करण्यासाठी तालुकास्थळी जावे लागत असे. अशा परिस्थितीत गावातील ग्रामदैवतांची आराधना केली जायची, असे गावातील जाणकार सांगत असतात.

रोवणी हंगामात पाळतात पोलो

गावात खरीप हंगामातील धान पीक रोवणी हंगाम सुरू झाला की मंगळवार पोलो ही प्रथा आहे. रोवणी कामाला साप्ताहिक सुटी असते. पोलो असतो त्यादिवशी गावातील ग्रामदैवताची पूजाअर्चा केली जाते. किमान पाच मंगळवार पोलो पाळला जातो व शेवटच्या मंगळवारी मोठ्या भक्तिमय वातावरणात त्याचा शेवट केला जातो.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस