शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
4
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
5
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
6
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
7
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
8
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
9
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
10
"शिंदे सरकारच त्यांचा माज उतरवेल", मराठी सिनेमांना प्राइम शो न देणाऱ्या मल्टिप्लेक्सबाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य
11
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
12
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
14
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
15
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
16
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
17
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
18
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
19
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
20
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं

वादळी पावसाने घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:51 PM

चामोर्शी तालुक्यातील आष्टी, चपराळा परिसरात शुक्रवारी दुपारी ३ वाजतापासून झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू, टिनपत्रे उडाले. तर काही ठिकाणी विद्युत खांब उन्मळून पडले.

ठळक मुद्देआष्टी परिसर । अनेक ठिकाणी कवेलू, टिनपत्रे उडाली; वीज खांब तुटल्याने पुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी, चपराळा परिसरात शुक्रवारी दुपारी ३ वाजतापासून झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे घरांचे प्रचंड नुकसान झाले. अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू, टिनपत्रे उडाले. तर काही ठिकाणी विद्युत खांब उन्मळून पडले. परिणामी या भागातील वीज पुरवठा रात्रभर खंडित होता. त्यामुळे परिसरातील नागरिकांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागला.आष्टी परिसरात शुक्रवारी ३ वाजतापासून अचानक वादळ आले. वादळवाऱ्यासह पावसालाही सुरूवात झाली. या परिसरात कुनघाडा, ठाकरी, चपराळा, चौडमपल्ली, मार्र्कं डा (कं.) आदी गावातील अनेक नागरिकांच्या घराच्या कवेलू उडाल्या. तसेच टिनपत्रे उडाले. कवेलू घर परिसरात पडल्याने ते फुटले. याशिवाय घराच्या छतावरील फाटेही अस्ताव्यस्त झाले. काही ठिकाणी विद्युत खांब रस्त्यावर कोसळल्याने रात्रभर वीज पुरवठा खंडित होता. दुसºया दिवशी विद्युत कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी उशिरापर्यंत वीज दुरूस्तीचे काम सुरूकेले. परंतु एका दिवसाचे हे काम नसल्याने नागरिकांना दुसºया दिवशीही रात्र अंधारातच काढावी लागली.चपराळा येथील काही नागरिकांच्या घरावरील कवेलू वादळवाºयाने उडाले. तसेच टिनपत्रे खाली कोसळले. सिमेंट पत्रे उडून खाली पडून फुटले. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. वादळीवाºयासह पाऊस आल्याने अनेक नागरिकांच्या मातीच्या घराच्या भिंती कोसळल्या. त्यामुळे नागरिकांना रात्रभर प्रचंड त्रास सहन करावा लागला. या भागात अनेक शेतकºयांच्या आंबा पिकाचे नुकसान झाले. सध्या आंब्यात कठीण कोई निर्माण होण्याचा कालावधी आहे. याच कालावधीत अनेक नागरिक आंब्याचे लोणचे टाकतात. परंतु वादळवाºयाने बहुतांश झाडावरील निम्म्यापेक्षा अधिक आंबे खाली गळून प्रचंड नुकसान झाले. चपराळा येथील मनोहर आदे, पत्रू निकोडे, कल्पना मेश्राम, ईश्वर आदे यांच्या घरावरील कवेलू तसेच टिन वादळाने उडाल्याने त्यांचे प्रचंड नुकसान झाले. अवकाळी पावसाचा जोरदार फटका या परिसराला बसला.पंचनामे करण्याची मागणीआष्टी परिसरातील आठ ते दहा गावाला शुक्रवारच्या वादळी पावसाचा जोरदार फटका बसला. अनेक नागरिकांच्या घरावरील कवेलू व टिनपत्रे उडाली. मातीच्या भिंतीही कोसळल्या. त्यामुळे महसूल विभागाने या परिसरातील नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे झोपडीवजा घरे असलेल्या नागरिकांचे प्रचंड नुकसान झाले. गवताच्या झोपड्यांवरील गवत वादळाने उडाले. नुकसानग्रस्तांना शासनाकडून भरपाई के व्हा मिळेल, याची प्रतीक्षा आहे.

टॅग्स :Rainपाऊस