शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

गडचिरोलीतीली गरजूंच्या मदतीसाठी वीरपत्नीची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 18:21 IST

संचारबंदीचा गोरगरीबांना चांगलाच फटका बसत आहे. मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने अशा गरजू १०० कुटुंबांच्या मदतीसाठी शहीद पोलीस जवानाच्या पत्नीने शिवराय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला आहे.

ठळक मुद्देसामाजिक दायित्व १०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीचा गोरगरीबांना चांगलाच फटका बसत आहे. मोलमजुरी करून उपजीविका करणाऱ्या कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने अशा गरजू १०० कुटुंबांच्या मदतीसाठी शहीद पोलीस जवानाच्या पत्नीने शिवराय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मदतीचा हात पुढे केला.नक्षलविरोधी अभियानादरम्यान गडचिरोली पोलीस दलातील जवान विलास मांदाडे हे शहीद झाले होते. त्यांच्या वीरपत्नी संगीता मांदाडे यांना लॉकडाऊनच्या काळात होत असलेली गोरगरीब नागरिकांची ससेहोलपट पहावली नाही. त्यांच्यासाठी काही केले पाहीजे या आंतरिक इच्छेतून त्यांनी शिवराय सामाजिक संस्थेमार्फत मदत वाटपाची इच्छा व्यक्त केली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही त्यांचा प्रस्ताव लगेच मान्य करत गडचिरोलीजवळील नवेगाव (मुरखळा) आणि दिभना (माल) या गावातील १०० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यासाठी पुढाकार घेतला. कामे बंद असल्यामुळे पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न निर्माण झालेल्या गरीब, मजूर, निराधार, अपंग, निराधार विधवा महिला अशांची निवड केली. त्यांना तांदूळ, डाळ, तेल, तिखट, मीठ, चहाचे साहित्य आणि भाजीपाला अशा वस्तू देण्यात आल्या.या कामात त्यांना शिवराय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष परमानंद पुन्नमवार सचिव सुरज बोरकुटे, भास्कर पेटकर, आकाश पोहनकर, श्रेयस जुमनाके, शुभम देवलवार आणि संस्थेच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले. सदर साहित्य वाटप करताना दिभना (माल) गावचे सरपंच उमाकांत जुमनाके, ग्रामसेवक वासंती देशमुख तसेच नवेगाव (मुरखळा) गावचे ग्रामपंचायत सदस्य राजू खंगार व इतर नागरिक आदी उपस्थित होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस