शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

लोह खनिज कामगारांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:36 IST

सुरजागडच्या लोह खाणीतील मौल्यवान दगडांची पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस प्रकल्पात वाहतूक करण्याचे नियोजन कंपनीकडून केले जात आहे. एका ...

सुरजागडच्या लोह खाणीतील मौल्यवान दगडांची पुन्हा एकदा चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस प्रकल्पात वाहतूक करण्याचे नियोजन कंपनीकडून केले जात आहे. एका अपघाताच्या निमित्ताने उफाळून आलेला स्थानिक नागरिकांचा विरोध आणि पोलिसांच्या सुरक्षेपोटी थकीत असलेले भाडे यामुळे दोन वर्षांपासून हे काम बंद आहे. मात्र स्थानिक नागरिक आणि नक्षल्यांचा विरोध मोडून काढत पुन्हा एकदा लोह खाण सुरू करण्यासाठी कामगारांची जुळवाजुळव केली जात आहे. वास्तविक दोन महिन्यांपूर्वी नक्षलवाद्यांनी एका युवकाची हत्या केल्यानंतर अनेकजण लोह खाणीत कामगार म्हणून जाण्यासाठी सहजासहजी तयार होताना दिसत नाही. मात्र मोठी बेरोजगारी असल्यामुळे काही युवक जिवावर उदार होऊन अल्का कन्सल्टन्सीकडे आपले संमतीपत्र लिहून देत आहेत. कामगारांकडून त्यांची आपली माहिती भरून घेताना दिलेल्या अटी व शर्तीमध्ये आपल्याला नक्षलग्रस्त भाग आणि येथील परिस्थितीची जाणीव असून, आपल्या जबाबदाऱ्यांसाठी कंपनीला जबाबदार धरले जाणार नाही, असे नमूद आहे. यासंदर्भात कुटुंबातील वरिष्ठ सदस्याच्या सहीने एक वेगळे हमीपत्रही लिहून घेतले जाणार आहे.

या अटीमुळे कामगारांच्या जीवितास काही झाले तर त्यांचे कुटुंबीय कोणताही मोबदला कंपनीकडे मागू शकणार नाही. विशेष म्हणजे हा सर्व व्यवहार अल्का कन्सल्टन्सीसोबत होत असून, लॉयड्स मेटल्सकडून कोणत्याही कामगाराला स्थायी नोकरी मिळणार नसल्यामुळे अनेक सुशिक्षित युवक तीव्र नाराजी व्यक्त करत कंपनीची ऑफर धुडकावत आहेत.

(बॉक्स)

बाहेरील लोकांनाच प्राधान्य

सुरजागडच्या लोह खाणीची लीज लॉयड्स मेटल्स या कंपनीला मिळाली असली तरी ही कंपनी आता केवळ नावापुरतीच राहिल्याचे दिसून येते. प्रत्यक्षात लॉयड्सने हे काम दक्षिण भारतातील त्रिवेणी मायनिंग या कंपनीकडे सोपवले आहे. त्रिवेणी कंपनीने लोह खाणीच्या कामासाठी कामगार जुळवण्याचे काम अल्का कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीकडे सोपविले. वास्तविक लोह खनिज प्रकल्प उभारण्यापासून तर लोहदगड वाहतुकीपर्यंतची कामे स्थानिक लोकांनाच दिली जाईल, असा देखावा कंपनीकडून आधी करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात बाहेरील लोकांनाच प्राधान्य दिले जात असल्यामुळे स्थानिक लोकांना केवळ मोठी स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात त्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहेत.