शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांच्या जय-पराजयाचे श्रेय आणि जबाबदारी कुणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2019 06:00 IST

अहेरीतून पुन्हा अम्ब्रिशराव यांना उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये धुसफूस होती. त्यातूनच संघाच्या गोटातून दुसरेचे नाव चालविण्यात आले. पण वरिष्ठांनी अम्ब्रिशराव यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपने सर्व फळी त्यांच्या बाजुने उभी केली. असे असली तरी अम्ब्रिशराव यांची राजगादीच त्यांच्या प्रतिमेत अडसर ठरली. त्यांनी ‘महाराज’ म्हणून नाही तर ‘लोकप्रतिनिधी’ म्हणून आमच्याशी वागावे ही अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाही. त्याचा फटका त्यांना मतांच्या रूपात बसला.

ठळक मुद्देसंडे अँकर । उमेदवारांच्या प्रतिमेसह नेत्यांच्या मेहनतीने यश

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : २०१४ च्या निवडणुकीत गडचिरोली, आरमोरी आणि अहेरी या तीनही मतदार संघात भाजपने नव्या दमाच्या उमेदवारांना रिंगणात उतरविले होते. भाजपच्या लाटेत त्यावेळी प्रथमच तीनही मतदार संघात या उमेदवारांनी बाजी मारली. पण यावेळी त्या उमेदवारांचा कस लागणे स्वाभाविक होते. उमेदवारांची वैयक्तिक कामगिरी आणि मतदारांमध्ये असलेली प्रतिमा, भाजपच्या कार्यकर्त्यांचे बुथस्तरापर्यंतचे नेटवर्क, विविध उपक्रमातून केलेली पक्ष बांधणी आणि सत्ताधारी असल्यामुळे सरकारची प्रतिमा, अशा सर्वच बाजुने भक्कम असणे जिंकण्यासाठी आवश्यक होते. मात्र अहेरीत काही कमकुवत बाजूंमुळे निवडणूक जिंकण्याचे गणित बिघडले.अहेरीतून पुन्हा अम्ब्रिशराव यांना उमेदवारी देण्यावरून भाजपमध्ये धुसफूस होती. त्यातूनच संघाच्या गोटातून दुसरेचे नाव चालविण्यात आले. पण वरिष्ठांनी अम्ब्रिशराव यांचे नाव जाहीर झाल्यानंतर भाजपने सर्व फळी त्यांच्या बाजुने उभी केली. असे असली तरी अम्ब्रिशराव यांची राजगादीच त्यांच्या प्रतिमेत अडसर ठरली. त्यांनी ‘महाराज’ म्हणून नाही तर ‘लोकप्रतिनिधी’ म्हणून आमच्याशी वागावे ही अपेक्षा ते पूर्ण करू शकले नाही. त्याचा फटका त्यांना मतांच्या रूपात बसला.गडचिरोली आणि अहेरीत भाजपच्या विजयात प्रतिस्पर्धी काँग्रेस उमेदवारांचा कमकुवतपणाही काही अंशी कामी आला. गडचिरोलीत भाजपच्या शिस्तबद्ध यंत्रणेपुढे काँग्रेसच्या नवख्या उमेदवार टिकाव धरू शकल्या नाही. जिल्हाध्यक्ष म्हणून किशन नागदेवे यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर तीनही उमेदवारांसाठी त्यांनी भाजपची फळी कामी लावली. अहेरीत बाजू कमकुवत असल्याचे लक्षात आल्यानंतर कमीत कमी वेळेत अमित शहांच्या सभेचे नियोजन केले. त्याचा फायदाही झाला, पण तो विजयात रुपांतरित होऊ शकला नाही.आरमोरीत वरकरणी निवडणूक सोपी वाटत असली तरी पुन्हा कौल मिळणे एवढे सोपे नव्हते. या मतदार संघाच्या सभोवती असलेल्या आमगाव, अर्जुनी मोरगाव, साकोली आणि ब्रह्मपुरी या चारही मतदार संघात भाजपला यश मिळाले नाही. अशा वातावरणात आरमोरीची जागा टिकवणे कठीण होते. मात्र भाजपच्या फळीसह सहकार नेते अरविंद सा.पोरेड्डीवार यांचे मार्गदर्शन, प्रकाश पोरेड्डीवार यांनी किंगमेकरच्या भूमिकेत ठेवलेली पकड या जमेच्या बाजू ठरल्या. त्यामुळे गजबे यांचे मताधिक्य गेल्या निवडणुकीच्या तुलनेत ९ हजारांनी वाढले.पूर्व विदर्भातील सर्वच जिल्ह्यात भाजपला अनपेक्षित फटका बसला. शेवटच्या टोकावरचा गडचिरोली जिल्हाही त्यासाठी अपवाद नाही. मात्र लगतच्या भागात भाजपने जागा गमावल्या असताना गडचिरोली आणि आरमोरी मतदार संघाने पुन्हा एकदा भाजपच्या उमेदवारांना कौल दिला. त्या उमेदवारांच्या विजयाचे श्रेय कुणाचे आणि अहेरी मतदार संघातील पराजयाची जबाबदारी कुणाची, यावर आता काथ्याकूट सुरू आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली