शहरं
Join us  
Trending Stories
1
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
2
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
3
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
4
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
5
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
6
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
7
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
8
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
9
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
10
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
11
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
12
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
13
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
14
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
15
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
16
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
17
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
18
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
19
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
20
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?

जो पाजील नवऱ्याला दारू, त्याला पाडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 13:29 IST

आदिवासीबहुल आणि नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक गाळली आणि घेतली जाते ती मोहाची गावठी दारू. ही हातभट्टीची दारू गाळली जात नाही असे गाव या जिल्ह्यात शोधूनही सापडणार नाही.

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली हा दारूबंदी असलेला महाराष्ट्रातील दुसरा जिल्हा. या जिल्ह्यात १९९३ पासून ‘दारूबंदी’ लागू करण्यात आली असली तरी इतक्या वर्षात हा जिल्हा खऱ्या अर्थाने ‘दारूमुक्त’ मात्र नव्हता. पण आता खरोखरच हा जिल्हा दारूमुक्त व्हावा म्हणून गावोगावच्या महिला पुढे सरसावल्या आहेत. मुक्तिपथ अभियानाने त्यांना दिशा दिली, आत्मविश्वास दिला आणि आता प्रत्यक्ष कृतीही सुरू झाली आहे. २६ वर्षानंतर खऱ्या अर्थाने आता या जिल्ह्याची दारूमुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे.आदिवासीबहुल आणि नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशिल असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात सर्वाधिक गाळली आणि घेतली जाते ती मोहाची गावठी दारू. ही हातभट्टीची दारू गाळली जात नाही असे गाव या जिल्ह्यात शोधूनही सापडणार नाही. त्याचे कारणही तसेच आहे. आदिवासी लोकांना धार्मिक कार्यासाठी दारू लागते, बडा देवाला दारू वाहण्याची श्रद्धा आहे. केवळ याच कारणातून या जिल्ह्यात दारूबंदी असतानाही प्रत्येक आदिवासी कुटुंबाला ५ लिटरपर्यंत हातभट्टीची दारू गाळण्याची (बाळगण्याची) अलिखित परवानगी दिलेली आहे. पण याचा गैरफायदा घेत अनेक लोकांनी गावठी दारू विक्रीचा व्यवसाय सुरू केला. रोजगाराची इतर साधने नसल्यामुळे मिळकतीचा हा मार्ग अनेकांना सोपा वाटला आणि त्यातून दारू विक्री वाढत गेली. बहुतांश भाग जंगलाचा असल्यामुळे मुबलक प्रमाणात सहज उपलब्ध होणारे मोहफूल, दारू गाळण्याच्या व्यवसायाला चालना देणारे ठरले. त्यातच मोहफुलातील गुणकारी घटकांमुळे गैरआदिवासी नागरिकांनाही त्याचे आकर्षण वाटू लागले. एवढेच नाही तर अनेक शहरी लोक दारूबंदीमुळे अतिरिक्त पैसे देऊन घ्याव्या लागणाऱ्या विदेशी दारूऐवजी कमी पैशात मिळणाऱ्या या मोहफुलाच्या दारूला पसंती देऊ लागले. यातूनच शहरालगतची काही गावं अक्षरश: गावठी दारूचे अड्डे बनले.‘शोधग्राम’मधील माँ दंतेश्वरी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या ग्रामीण रुग्णांमध्ये दारू आणि तंबाखूच्या सेवनामुळे झालेल्या दुष्परिणामांनी ग्रस्त रुग्णांची संख्या वाढत होती. या रुग्णांवर वैद्यकीय उपचार करण्यासोबतच भविष्यातील धोका टाळण्यासाठी त्यांना व्यसनांपासून दूर नेणे गरजेचे आहे, ही बाब ‘सर्च’चे संस्थापक आणि ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय व डॉ.राणी बंग यांच्या लक्षात आली. त्यांनी या विषयाचे गांभिर्य शासनाच्या निदर्शनास आणून दिले. शासनानेही तेवढ्याच गांभिर्याने हा विषय हाताळत गडचिरोली जिल्ह्याला दारू आणि तंबाखूच्या व्यसनांपासून मुक्त करण्याची धुरा डॉ.बंग यांच्या खांद्यावर दिली आणि ‘मुक्तिपथ अभियाना’ला सुरूवात झाली.गेल्या तीन वर्षात या अभियानातून सुरू झालेला व्यसनमुक्तिचा लढा पूर्णपणे यशस्वी झालेला नसला तरी त्याला बरेच मोठे यश आले आहे. गावागावात झालेल्या जनजागृतीमधून आज ६०० गावांनी गावात दारूविक्री न करण्याचा घेतलेला ठराव हा या अभियानाचाच परिणाम आहे. आता तर शाळकरी मुलेही अप्रत्यक्षपणे या अभियानाचा भाग झाले आहेत. व्यसन करणार नाही आणि करू देणार नाही, अशी शपथ त्यांना मुक्तिपथच्या कार्यकर्त्यांनी दिली. त्यामुळे भविष्यात घराच्या चार भिंतीआड लपून ठेवलेली दारूही हद्दपार होण्याची सकारात्मक चिन्हं दिसू लागली आहेत.

दारूमुक्त निवडणूककोणतीही निवडणूक पैसे आणि दारूशिवाय होतच नाही, हे आजवरचे गडचिरोलीमधील चित्र. पण यावेळी ‘दारूमुक्त निवडणूक’ हे ब्रिद घेऊन मुक्तिपथ अभियानाच्या कार्यकर्त्यांनी नव्याने जागृती सुरू केली. दारू वाटणाऱ्यांना मतदान करायचेच नाही, असा उलट पवित्रा घेत सुरू झालेल्या या जागृतीला महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘जो पाजील माझ्या नवऱ्याला दारू, त्या उमेदवाराला नक्कीच पाडू’ असे घोषवाक्य लिहीलेले लक्षवेधी फलक आज गडचिरोली शहरासह ग्रामीण भागात अनेक ठिकाणी लागले आहेत. त्यातून काय बोध घ्यायचा ते दारू पाजणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते घेतीलच, पण लोकशाही प्रक्रियेतील मतदानाचे पवित्र कार्य पूर्ण शुद्धीत राहून आणि सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून लोक पार पाडतील, असा विश्वास डॉ.अभय बंग व्यक्त करतात.

टॅग्स :liquor banदारूबंदी