शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

यंत्रमानव जे करू शकत नाही तेच आता शिकवावे लागेल - डॉ. अभय बंग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 18:22 IST

‘दंडकारण्य’च्या सुवर्ण महोत्सवी वर्षाची सांगता

गडचिरोली : आज प्रत्येक गोष्ट इंटरनेटच्या माध्यमातून शिकता येते. एवढेच नाही तर ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’मुळे स्वयंचलित कारपासून तर माणसांची अनेक कामेही यांत्रिक पद्धतीने होऊ लागली आहेत. त्यामुळे भविष्यात अनेकांच्या नोकऱ्या हिरावल्या जातील. त्यामुळे जे काम यंत्रमानव करू शकणार नाही त्याबद्दलचे शिक्षण देण्याची वेळ आली आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी येथील विद्याभारती हायस्कूलच्या प्रांगणात आयोजित समारंभात अध्यक्षस्थानावरून बोलताना मांडले.

दंडकारण्य शैक्षणिक व सांस्कृतिक विकास संशोधन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाचे आयोजन मंगळवारी केले होते. यावेळी अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, सुप्रसिद्ध कादंबरीकार राजन गवस, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे होते.

यावेळी डॉ. बंग यांनी राजन गवस व रंगनाथ पठारे यांनी शिक्षण पद्धतीवर परखडपणे मांडलेल्या विचारांवर प्रकाश टाकताना आजचे शिक्षण विद्यार्थ्यांना कौशल्यापासून दूर नेणारे असल्याचे सांगितले. त्यामुळेच आजच्या मुलांना शेतीची कामेसुद्धा करता येत नाही. देशातील २५ कोटी लोक शिक्षणाच्या इंडस्ट्रीत व्यस्त आणि ग्रस्त असून त्यातून सुशिक्षित बेकारांचा केवळ फौजफाटा तयार होत असल्याचे ते म्हणाले.

यावेळी रंगनाथ पठारे यांनी मातृभाषेपासून दूर नेऊन दिल्या जाणाऱ्या शिक्षण पद्धतीवर टीका केली. परंतु गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात गोविंदराव मुनघाटे यांनी सुरू केलेली शिक्षणाची परंपरा त्यांची पुढची पिढी चांगल्या पद्धतीने चालवत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

स्वागतपर भाषण डॉ. प्रमोद मुनघाटे यांनी तर प्रास्ताविक प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले.

जगाकडे पाठ फिरवा, जग तुमच्याकडे तोंड करेल

यावेळी डॉ. बंग यांनी विनोबा भावेंनी सांगितलेले एक वाक्य लक्षात ठेवण्यास सांगितले. ‘जगाकडे पाठ फिरवा, जग तुमच्याकडे तोंड फिरवेल’ या वाक्याची फोड करताना ते म्हणाले, विकासाच्या रांगेत जगाच्या तुलनेत गडचिरोली शेवटच्या नंबरवर आहे. जग पुढे जात असताना तुमचा नंबर शेवटीच लागेल. त्यामुळे त्या रांगेत तुम्ही उलटे फिरा. मी तेच केले, विकसित देशात जाण्याची संधी सोडून मी गडचिरोलीत आलो म्हणूनच लोक मला मानतात, असे मर्मही त्यांनी उघड केले.

लौकिक वाढविणाऱ्यांचा सत्कार

- यावेळी दंडकारण्य शिक्षण संस्थेचा लौकिक वाढविणाऱ्या आणि शिक्षणात मौलिक योगदान देणाऱ्या शिक्षकवृंदांचा सत्कार करण्यात आला. त्यात दादाराव चौधरी, डॉ. अभय साळुंके, प्राचार्य सी. एल. डोंगरवार, प्रतिभा रामटेके, चेतन गोरे, सतीश पवार, मधुकर बोबाटे, अशोक काचिनवार, मारुती कुरवडकर, पंढरी गुरनुले, राजू इंगोले, मनिष बेझलवार, भास्कर चौधरी, रमेश हलामी आणि प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर यांचा समावेश होता.

- यावेळी चांदाळा येथील आश्रमशाळा, विद्याभारती कन्या हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, तसेच प्रज्ञा संस्कार कॉन्व्हेंट या शाळांना उत्कृष्ट कामगिरीसाठी मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

टॅग्स :Educationशिक्षणAbhay Bangअभय बंगGadchiroliगडचिरोली