शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
4
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
5
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
6
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
7
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
10
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
11
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
12
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
13
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
14
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
15
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
16
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
17
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
18
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
19
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
20
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय

अर्थसंकल्पाने गडचिरोली जिल्ह्याला काय दिले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 4:39 AM

- आदिवासींच्या उपजीविका वृद्धीसाठी आमचूर व मोहफूल प्रकल्प - मार्कंडेश्वर शिवमंदिराच्या जतन व संवर्धनासाठी निधी गडचिरोली : राज्य विधिमंडळात ...

- आदिवासींच्या उपजीविका वृद्धीसाठी आमचूर व मोहफूल प्रकल्प

- मार्कंडेश्वर शिवमंदिराच्या जतन व संवर्धनासाठी निधी

गडचिरोली : राज्य विधिमंडळात सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात गडचिरोली जिल्ह्यासाठी काही महत्त्वपूर्ण बाबींचा समावेश केला आहे. आतापर्यंत दुर्लक्षित असलेल्या गोष्टींकडे लक्ष वेधले गेले असले, तरी जिल्हावासीयांना अपेक्षित असलेल्या काही गोष्टी अजूनही मिळालेल्या नाहीत.

जंगलाच्या आश्रयाने वर्षानुवर्षे राहत असलेल्या माडिया-गोंड आदिम जमातींसाठी एकात्मिक वसाहत वसविण्याची घोषणा करण्यात आली. यामुळे विकासात्मक गोष्टींपासून अजूनही कोसोदूर असणाऱ्यांना सुविधांचा लाभ मिळण्याची आशा बळावली आहे. रोजगाराचा प्रश्न मिटवण्यासाठी मोहफूल आणि आमचूर (कच्च्या आंब्यापासून बनणारा पदार्थ) प्रकल्पांची घोषणा झाली. यामुळे परंपरागत पद्धतीने मोहफुले वेचून तोकड्या मिळकतीवर समाधान मानणाऱ्या आदिवासी समाजाच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊ शकतो. तसेच विदर्भाची काशी म्हणून अनेकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडा देवस्थानच्या संवर्धनासाठी निधी देण्याची घोषणाही केली. या मंदिराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे; पण त्या ठिकाणी पर्यटकांसाठी कोणत्याही सुविधा नाहीत. आतातरी त्या सुविधा होतील, अशी आशा

निर्माण झाली आहे.

मेडिकल कॉलेजला हुलकावणी

या अर्थसंकल्पात राज्यातील काही जिल्ह्यांत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय देण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली; पण त्यात गडचिरोली जिल्ह्याचे नाव नाही. वास्तविक या जिल्ह्यात मेडिकल कॉलेजची नितांत गरज आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या भौतिक सुविधाही आहेत. राज्य मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनीही त्यासाठी सकारात्मकता दर्शवली होती. तरीही कुठे माशी शिंकली, असा प्रश्न जिल्हावासीयांना पडला आहे.

प्रतिक्रिया-

सर्वसामान्यांना केंद्रस्थानी ठेवून तयार केलेला हा अर्थसंकल्प दिलासा देणारा आहे. शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज, शेतात सोलर मोटरपंप अशा महत्त्वपूर्ण घोषणा झाल्या आहेत. अनुसूचित जाती-जमातीच्या लोकांसाठी मोठी तरतूद केली आहे. शिवाय जाहीर केलेल्या मोहफूल प्रकल्पातून रोजगाराला चालना मिळून लोकांच्या हाताला काम मिळेल.

- धर्मरावबाबा आत्राम

आमदार, अहेरी

गडचिरोलीसारख्या मागास जिल्ह्याला जे हवे होते त्या अपेक्षेच्या तुलनेत या जिल्ह्याला अर्थसंकल्पात काहीही मिळालेले नाही. ज्या घोषणा केल्या त्यावर नेहमीप्रमाणे अंमलबजावणी होणार नाही. त्यामुळे पोकळ घोषणाबाजी असलेला हा अर्थसंकल्प जिल्ह्याची घोर निराशा करणारा ठरणार आहे यात शंका नाही.

- डॉ. देवराव होळी

आमदार, गडचिरोली

या अर्थसंकल्पात केवळ मागील सरकारने सुरू केलेल्या विकास कामांनाच निधी उपलब्ध करण्याची घोषणा केली. नव्याने कोणत्याही कामांसाठी निधी देण्याला बगल दिली आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजार प्रोत्साहन अनुदानाची प्रतीक्षा होती; पण ते केले नाही. वीज बिलात सवलत आणि पेट्रोल-डिझेलवरील कर कमी होऊन दिलासा मिळेल असे वाटत होते; पण अर्थसंकल्पाने निराशा केली.

- कृष्णा गजबे

आमदार, आरमोरी

राज्याचा हा अर्थसंकल्प निश्चितच समाधानकारक आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने जाहीर केलेल्या गोष्टी सर्वसामान्य आणि तळागाळातील लोकांच्या जीवनात बराच बदल घडवून आणू शकतात. वनकायद्याच्या अडचणीमुळे विकास कामांवर मर्यादा असल्या तरी वनाेपजावर आधारित प्रकल्प मोठी उपलब्धी ठरू शकते. या प्रकल्पांची योग्य अंमलबजावणी व्हावी ही सर्वांची अपेक्षा राहील.

- अजय कंकडालवार

अध्यक्ष, जि.प., गडचिरोली