शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

वनकायद्यात अडकलेल्या सात प्रकल्पांचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 06:00 IST

वनकायद्यामुळे अडलेल्या या प्रकल्पांपैकी काही प्रकल्प तब्बल ३० ते ४० वर्षापूर्वीचे आहेत. या सात प्रकल्पांमध्ये एकूण ३४८ दलघमी जलसाठा होऊन त्यातून ४८ हजार ७३८ हेक्टर सिंचन होऊ शकते. त्यासाठी ३८८७ हेक्टर वनजमिनीची गरज पडत आहे. वनबाधित प्रकल्पांपैकी तुलतुली प्रकल्पाचा वनप्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे.

ठळक मुद्देसिंचनाचा अभाव : जाचक अटींमुळे सरकारदरबारी अनेक वर्षापासून प्रलंबित; अनेक प्रकल्प आहेत अपूर्ण

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मोठ्या नद्यांची देण असूनही बारमाही सिंचनापासून वंचित असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वनकायदा एक शाप ठरत आहे. वनकायद्याच्या जाचक अटींची पूर्तता करणे शक्य न झाल्यामुळे प्रस्तावित ७ सिंचन प्रकल्पांचे काम अनेक वर्षांपासून थंडबस्त्यात आहे.वनकायद्यामुळे अडलेल्या या प्रकल्पांपैकी काही प्रकल्प तब्बल ३० ते ४० वर्षापूर्वीचे आहेत. या सात प्रकल्पांमध्ये एकूण ३४८ दलघमी जलसाठा होऊन त्यातून ४८ हजार ७३८ हेक्टर सिंचन होऊ शकते. त्यासाठी ३८८७ हेक्टर वनजमिनीची गरज पडत आहे.वनबाधित प्रकल्पांपैकी तुलतुली प्रकल्पाचा वनप्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर केला आहे. पण या प्रकल्पासाठी १ लाख ९९ हजार झाडे तोडावी लागत असल्यामुळे ३ ऑगस्ट १९९९ आणि ९ एप्रिल २००० च्या पुनर्विलोकन वन प्रस्तावास मंजुरी नाकारण्यात आली आहे. कारवाफा प्रकल्पाच्या प्राथमिक स्वरूपाच्या कामांना १९८० मध्ये सुरूवात केली होती, परंतू वनसंवर्धन अधिनियम १९८० अंतर्गत मे १९८३ पासून प्रकल्पाचे काम बंद करण्यात आले. १९८५ मध्ये वन प्रस्तावास राज्य शासनाने मंजुरी नाकारली. ७ गावांच्या ग्रामसभांपैकी ३ गावांच्या (रेखाटोला, कुथेगाव आणि कोंदावाही) ग्रामसभेने ठरावास नामंजुरीची शिफारस केली.चेन्ना प्रकल्पासाठी ९ मे २०१७ रोजी वनप्रस्ताव सादर करण्यात आला. वनजमिनीच्या मोबदल्यात पर्यायी वनीकरणासाठी उपलब्ध करून दिलेले ७४५.४८ हेक्टर क्षेत्र (गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा जिल्हा) अंदाजे २० वर्ष जुने असल्याने सद्यस्थितीत ते क्षेत्र वनीकरणास उपलब्ध आहे किंवा नाही याबाबत संबंधित उपवनसंरक्षकांकडून नव्याने प्रमाणपत्र घेणे आवश्यक झाले आहे.पिपरी रिट आणि पुलखल या प्रकल्पांची प्राथमिक स्वरूपाची कामे झाली होती. डुमीनाला प्रकल्पात वाढ झालेले २१.१६ हेक्टर क्षेत्र पर्यायी वनीकरणासाठी उपलब्ध न झाल्यामुळे वनप्रस्तावाच्या कार्यवाहीस अडचणी निर्माण झाल्या आहेत. तसेच प्रकल्पबाधित बारसेवाडा गावाच्या ग्रामसभेचा ठराव नकारात्मक असून तो सकारात्मक व्हावा यासाठी महसूल विभागाच्या समन्वयातून पाठपुरावा होणे आवश्यक आहे. डुरकानगुड्रा प्रकल्पासाठी ४ पैकी ३ ग्रामसभांचा ठराव सकारात्मक तर चुडीयाल या एका ग्रामसभेचा ठराव नकारात्मक आहे. त्यासाठीही पाठपुरावा गरजेचा आहे.पर्यायी जमिनीचा अभाववन कायद्यानुसार कोणत्याही सरकारी विभागाला वनजमीन घ्यायची असल्यास त्या जमिनीपेक्षा दुप्पट पर्यायी जमीन वनविभागाला द्यावी लागते. जिल्ह्याच्या एकूण क्षेत्रफळापैकी ७६ टक्के क्षेत्र वनाच्छादित आहे. त्यामुळे प्रकल्पांसाठी वनजमीन घेताना पर्यायी जमीन म्हणून वनविभागाला देण्यासाठी दुप्पट जागा प्रशासनाकडे उपलब्ध नाही. यामुळे हे प्रकल्प अद्याप मार्गी लागू शकले नाही. शेजमिनीला बारमाही सिंचन मिळून शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी पर्यायी जमिनीची अट शिथील केल्यास हे प्रकल्प मार्गी लागू शकतात. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी शासनदरबारी पाठपुरावा करणे आवश्यक झाले आहे.

टॅग्स :WaterपाणीDamधरण