शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

‘ट्रिपल तलाक’बंदीच्या निर्णयाचे गडचिरोलीत स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:03 IST

वर्षानुवर्षांपासून चालत आलेल्या मुस्लीम समाजातील विवाहबंधन तोडण्याच्या ‘ट्रिपल तलाक’ पद्धतीला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांसाठी बंदी घातली.

ठळक मुद्देमहिलांना आत्मसन्मान द्या : मुस्लीम धर्मियांच्या अपेक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वर्षानुवर्षांपासून चालत आलेल्या मुस्लीम समाजातील विवाहबंधन तोडण्याच्या ‘ट्रिपल तलाक’ पद्धतीला मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांसाठी बंदी घातली. सोबतच यासाठी नवीन कायदा तयार करण्याचे आदेश केंद्र सरकारला दिले. या निर्णयाचे गडचिरोलीतील मुस्लीम समाजबांधवांनी स्वागत केले आहे. सोबतच नवीन कायद्याबद्दलच्या अपेक्षाही ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.‘तलाक... तलाक... तलाक...’ असे तीन वेळा म्हणून लग्नाच्या पत्नीला विभक्त करून एकाद्या महिलेला तिच्या पत्नी म्हणून असलेल्या अधिकारापासून वंचित ठेवण्याची परंपरा मुस्लिम समाजात अनेक वर्षांपासून प्रचलित आहे. ही सर्व प्रक्रिया मुस्लिम समाजातील धर्मगुरूंच्या (मौलवी) समक्ष होत असल्यामुळे या पद्धतीला कोणी उघड विरोध करत नाही. मात्र अशा पद्धतीने तलाकच्या फटक्याने पतीपासून विभक्त झालेल्या त्या महिलेला कसे अभागी जीवन जगावे लागते हे मांडून ही पद्धतच बदलली पाहिजे यासाठी मुस्लिम समाजातील काही महिला प्रयत्नशिल आहेत.मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालात मुस्लिम समाजातील ट्रिपल तलाकला बेकायदा ठरविले. त्यामुळे आतापर्यंत मुस्लिम महिलांची होत असलेली मुस्कटदाबी थांबेल अशी अपेक्षा मुस्लिम समाजातून व्यक्त होत आहे.गडचिरोली मुस्लिम वेलफेअर कमिटीचे अध्यक्ष मुस्तफा शेख यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत करताना ट्रिपल तलाकची पद्धत अल्लालाही मान्य नाही, असे स्पष्टपणे सांगितले. कोणी रागाच्या भरात, दारूच्या नशेत किंवा मजाक म्हणून ‘तलाक.. तलाक़...’ म्हणून पत्नीच्या भावनांचा विचार करीत नसेल तर हे योग्य नाही. मुस्लिम धर्माबद्दल ज्यांना पुरेपूर माहिती नाही तेच असे कृत्य करतात. अशा लोकांना काय योग्य, अयोग्य हे धर्मगुरूही सांगत नाही त्यामुळे त्याचा गैरवापर होत आहे. न्यायालयाने यावर दिलेला निर्णय योग्यच आहे, असे ते म्हणाले.भगवंतराव हिंदी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्य लिना हकीम म्हणाल्या, आतापर्यंत सर्व मुस्लिम महिलांची घुसमट होत होती. पण सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे त्यांना यातून बाहेर येण्याची संधी मिळाली आहे. त्यांना त्यांचा अधिकार मिळालाच पाहीजे. सरकारने आता मुस्लिम महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी योग्य कायदा करावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.भाजपाच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हा महामंत्री जावेद अली म्हणाले, आतापर्यंत नाईलाज म्हणून मुस्लिम महिलांना आणि संपूर्ण समाजाला हे स्वीकारावे लागत होते. पटत नसतानाही त्याला उघड विरोध करणे शक्य नव्हते. पण या निर्णयामुळे महिलांची अवहेलना दूर होईल. सरकारही यावर योग्य असा कायदा करून मुस्लिम महिलांना व त्यांच्या कुटुंबियांना योग्य सन्मान मिळण्याची व्यवस्था करेल, असा विश्वास असल्याचे ते म्हणाले.