शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

लाहेरी येथील कोट्यवधींची पाणी पुरवठा योजना निकामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 15:34 IST

पाइपलाइनचे काम सदोष : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने केले बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कलाहेरी : भामरागड तालुक्यांतर्गत येणाऱ्या लाहेरी येथील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी शासनाने येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्याला बराच कालावधी लोटूनही ती सुरू झाली नाही. म्हणून परत चार वर्षापूर्वी नव्याने काम हाती घेण्यात आले; मात्र ही पाणीपुरवठा योजना अजूनपर्यंत सुरू झाली नसल्याने या जलकुंभाचा वनवास कधी संपणार ? असा प्रश्न येथील उपस्थित केला जात आहे.

भामरागड तालुका मुख्यालयापासून १८ किमी अंतरावर असलेल्या लाहेरी गावाची जवळपास तीन हजार लोकसंख्या आहे. या गावातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याकरिता २००९-१० मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात आले. 

योजना कार्यान्वित होण्यापूर्वीच पाइपलाइन फुटली

  • काही ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे. योजना कार्यान्वित होण्यापूर्वीच पाइपलाइन फुटली असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
  • उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या परिसरातील नागरिकांची अडचण लक्षात २ घेऊन प्रशासनाने सदर योजना त्वरित सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.
  • कोट्यवधी रूपयांची पाणी पुरवठा योजना असतानाही स्थानिक नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. पाणी पुरवठा योजना कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विहीर व हातपंपाचा उन्हाळ्यात वापरयोजना सुरू नसल्यामुळे येथील नागरिक बोअरवेल, विहिरीच्या पाण्याचा वापर करीत आहेत. शासनाने लाखो रुपये खर्च करून लाहेरीवासीयांसाठी निर्माण केलेली नळ पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे.

टॅग्स :WaterपाणीGadchiroliगडचिरोली