शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना बंद, १६ गावांचे भर उन्हाळ्यात हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 15:27 IST

पुरात पाइप वाहून गेले: थकबाकीमुळे वीजपुरवठाही तोडला

लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी तालुक्यातील कुरुळ, विसापूर क्षेत्रातील सोळा गावांसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, गेल्या वर्षी पुरात पाइप वाहून गेले तर थकबाकीमुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे या सर्व गावांच्या नशिबी ऐन उन्हाळ्यात हाल आहेत.

तालुक्यातील कुरुळ, रामपूर, रामपूर टोली, देवडी, वांलसरा, भिवापूर, राजानगट्टा, कुंभारवाही, आमगाव महाल, हिवरगाव, खोर्दा, विसापूर, जानाळा, रेखेगाव, अनंतपूर या सोळा गावांतील प्रत्येक नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारा योजना सुरू करण्यात आली. मात्र वर्षभराच्या आतच योजना बंद पडली.

मागील पावसाळ्यात विसापूर नदीमधील पाइप पुरात वाहून गेले होते. शिवाय योजनेचे ४१ हजार रुपये वीजबिल थकीत होते. वीजबिल न भरल्यामुळे महावितरणने कनेक्शन तोडले. त्यामुळे ही योजना बंद आहे. परिणामी ऐन उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना स्वच्छ व द्वारपोहोच पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. दरम्यान, ही योजना सुरू करावी, या मागणीसाठी भाजपचे महामंत्री मधुकर भांडेकर यांनी जिल्हा परिषद सीईओ आयुषी सिंह यांची भेट घेतली. त्यांनी पाणी टंचाईची समस्या मांडली.

हर घर जल या योजनेमुळे प्रत्येकाला घर घर स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल. त्यामुळे विहीर व बोअरवेलचे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही, ही मोठी आशा निर्माण झाली होती. मात्र, ती योजनाच बंद असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत स्वच्छ पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. यामुळे हाल होत आहेत.- वेणू दयाल भांडेकर, वालसरा 

बऱ्याच वर्षांपासून पिण्याचे पाणी विहीर, बोअरवेलद्वारा मिळत होते. मात्र, ही योजना या परिसरासाठी सुरू झाली म्हणून आम्हास आता स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल अशी आशा निर्माण झाली. पण ती अल्पावधीत बंद पडल्याने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यासाठी त्वरित योजना सुरू करावी.- रमेश सातपुते, माजी उपसरपंच कुरुळ

सदर योजना ही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे अद्याप हस्तांतरित करण्यात आली नाही. ती योजना अद्यापही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडेच आहे, मात्र, त्या योजनेत काही दुरस्त्या असून विद्युत बिलाची रक्कम ग्रामपंचायतीला पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून भरण्याच्या सूचना केल्या आहेत. योजना सुरू करण्याबाबत मार्ग काढण्यात येईल.- नितीन पाटील, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. 

वस्ती वाढली, योजनांचा विस्तार कधी होणार ?चामोर्शी तालुक्यातील बहुतांश गावांतील लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत झपाट्याने वाढली. या गावांमध्ये अजूनही जुनीच नळयोजना आहे. लोकसंख्येचा विस्तार झाल्यानंतर वाढीव नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करणे, ही जबाबदारी स्थानिक प्रशासनाची होती; परंतु या जबाबदारीला बगल देत उपाययोजना केल्या नाहीत. आतासुद्धा काही गावांमध्ये जुन्याच पाणीपुरवठा योजनेच्या भरवशावर नवीन कनेक्शन दिले जात आहे. त्यामुळे किती लोकांना आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा होईल, हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात