शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

पाणीपुरवठा योजना बंद, १६ गावांचे भर उन्हाळ्यात हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2024 15:27 IST

पुरात पाइप वाहून गेले: थकबाकीमुळे वीजपुरवठाही तोडला

लोकमत न्यूज नेटवर्क चामोर्शी : प्रत्येक कुटुंबाला स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे यासाठी तालुक्यातील कुरुळ, विसापूर क्षेत्रातील सोळा गावांसाठी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. मात्र, गेल्या वर्षी पुरात पाइप वाहून गेले तर थकबाकीमुळे महावितरणने वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे या सर्व गावांच्या नशिबी ऐन उन्हाळ्यात हाल आहेत.

तालुक्यातील कुरुळ, रामपूर, रामपूर टोली, देवडी, वांलसरा, भिवापूर, राजानगट्टा, कुंभारवाही, आमगाव महाल, हिवरगाव, खोर्दा, विसापूर, जानाळा, रेखेगाव, अनंतपूर या सोळा गावांतील प्रत्येक नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी जिल्हा परिषद अंतर्गत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारा योजना सुरू करण्यात आली. मात्र वर्षभराच्या आतच योजना बंद पडली.

मागील पावसाळ्यात विसापूर नदीमधील पाइप पुरात वाहून गेले होते. शिवाय योजनेचे ४१ हजार रुपये वीजबिल थकीत होते. वीजबिल न भरल्यामुळे महावितरणने कनेक्शन तोडले. त्यामुळे ही योजना बंद आहे. परिणामी ऐन उन्हाळ्यात या भागातील नागरिकांना स्वच्छ व द्वारपोहोच पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. दरम्यान, ही योजना सुरू करावी, या मागणीसाठी भाजपचे महामंत्री मधुकर भांडेकर यांनी जिल्हा परिषद सीईओ आयुषी सिंह यांची भेट घेतली. त्यांनी पाणी टंचाईची समस्या मांडली.

हर घर जल या योजनेमुळे प्रत्येकाला घर घर स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल. त्यामुळे विहीर व बोअरवेलचे पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागणार नाही, ही मोठी आशा निर्माण झाली होती. मात्र, ती योजनाच बंद असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांत स्वच्छ पाण्यापासून वंचित रहावे लागत आहे. यामुळे हाल होत आहेत.- वेणू दयाल भांडेकर, वालसरा 

बऱ्याच वर्षांपासून पिण्याचे पाणी विहीर, बोअरवेलद्वारा मिळत होते. मात्र, ही योजना या परिसरासाठी सुरू झाली म्हणून आम्हास आता स्वच्छ पिण्याचे पाणी मिळेल अशी आशा निर्माण झाली. पण ती अल्पावधीत बंद पडल्याने स्वच्छ पिण्याच्या पाण्याचे स्वप्न भंगले आहे. त्यासाठी त्वरित योजना सुरू करावी.- रमेश सातपुते, माजी उपसरपंच कुरुळ

सदर योजना ही ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे अद्याप हस्तांतरित करण्यात आली नाही. ती योजना अद्यापही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडेच आहे, मात्र, त्या योजनेत काही दुरस्त्या असून विद्युत बिलाची रक्कम ग्रामपंचायतीला पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीमधून भरण्याच्या सूचना केल्या आहेत. योजना सुरू करण्याबाबत मार्ग काढण्यात येईल.- नितीन पाटील, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा जि.प. 

वस्ती वाढली, योजनांचा विस्तार कधी होणार ?चामोर्शी तालुक्यातील बहुतांश गावांतील लोकसंख्या गेल्या दहा वर्षांत झपाट्याने वाढली. या गावांमध्ये अजूनही जुनीच नळयोजना आहे. लोकसंख्येचा विस्तार झाल्यानंतर वाढीव नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वीत करणे, ही जबाबदारी स्थानिक प्रशासनाची होती; परंतु या जबाबदारीला बगल देत उपाययोजना केल्या नाहीत. आतासुद्धा काही गावांमध्ये जुन्याच पाणीपुरवठा योजनेच्या भरवशावर नवीन कनेक्शन दिले जात आहे. त्यामुळे किती लोकांना आवश्यक प्रमाणात पाणीपुरवठा होईल, हे पाहणे तेवढेच महत्त्वाचे आहे. 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात