देशातील सर्व जीवनद्यांमधील पाणी शृंगेरी येथे पाठविण्यात येत आहे.
शृंगेरी येथे गुढीपाडव्याच्या एक दिवस अगोदर या पाण्याचे कलश तयार करून अयोध्येला पाठवले जाणार आहेत. या सर्व नद्यांचे जल बांधकाम व अभिषेक करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. अभिषेक करून हे जल अयोध्या येथील शरयू नदीत समाविष्ठ करण्यात येणार आहे.
मंगळवारी सिरोंचा येथील प्राणहिता नदीतील पाणी कॅनमध्ये भरून नेण्यात आले. हे पाणी जगद्गुरु श्री शंकराचार्य यांच्या शृंगेरीपेठ येथे पोहोचविले जात आहे. शृंगेरी येथून पूजा-अर्चना करून आयोध्येसाठी हे जल पाठविले जाणार आहे. प्राणहिता नदीचे पाणी तेलंगणातील चेन्नूर येथील श्यामसुंदर देवडा यांच्या माध्यमातून शृंगेरी येथे पाठविण्यात आले. यावेळी सिरोंचा येथील पुरोहित वेंकटरमण कोम्मेरा यांनी पूजा अर्चना करून पाणी कॅनमध्ये भरले.
प्राणहिता नदीघाटापासून ते नगरम चौकापर्यंत दुचाकीने 'जय श्री राम' असे नारे देत पाणी पोहचविण्यात आले. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल, हनुमान स्वामी तसेच शंकर बुद्धावार, रामन्ना तोटावार, वेंकटरमण पडीशालवार, संदीप राचर्लावार, रवी चकिनारपू, नागभूषण चकिनारपुवार,सतीश राचर्लावार, नरेश धर्मपुरी, नरसिंग सिलिवेरी, वसंत तोकला, समन्ना ओलाला, दिलीप सेनिगारापू, संपत तनुगुला, श्रीनाथ राऊत, मुरली साई आदी उपस्थित होते.