शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

१०९५ शेतकऱ्यांंच्या शेतात पाेहाेचले साैरकृषीपंपाचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 4:54 AM

गडचिराेली: वीज वापराचा खर्च वाचावा त्याचबराेबर वीज वाहिनी गेलेली नसलेल्या शेतकऱ्यालाही पंप मिळावा यासाठी साैरकृषीपंप देण्याची याेजना शासनाने तीन ...

गडचिराेली: वीज वापराचा खर्च वाचावा त्याचबराेबर वीज वाहिनी गेलेली नसलेल्या शेतकऱ्यालाही पंप मिळावा यासाठी साैरकृषीपंप देण्याची याेजना शासनाने तीन वर्षांपूर्वी सुरू केली हाेती. एक वर्ष या याेजनेचे नियाेजन करण्यातच गेले. त्यानंतर मागील वर्षीपासून साैरकृषीपंप लावण्याच्या प्रक्रियेला वेग आला असून जिल्हाभरात १ हजार ९५ शेतकऱ्यांच्या शेतात साैरकृषीपंप लावण्यात आले आहे.सिंचन विहीरी, शेततळे, बंधारे यांच्या माध्यमातून शासनाने सिंचनाची सुविधा उपलब्ध करून दिली. मात्र पाण्याचा उपसा हाेण्यासाठी साधन असने आवश्यक आहे. त्यासाठी शासनाकडून कृषी पंपासाठी विज जाेडणी दिली जात हाेती. काही शेतकऱ्यांचे शेत मुख्य वीज वाहिनीपासून बऱ्याच दूर अंतरावर राहत असल्याने वीज जाेडणी देणे शक्य हाेत नाही. तसेच बरीचशी वीज कृषी पंपांसाठी वापरली जाते. त्यामुळे रात्रीच्या वेळी वीज उपलब्ध करून दिली जात हाेती. या सर्व अडचणींपासून सुटका करण्यासाठी शासनाने साैरकृषीपंप ही याेजना तीन वर्षांपूर्वी सुरू केली आहे. मागील वर्षीपासून या याेजनेच्या अमंलबजावणीला वेग आला आहे. अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर संबंधित शेतकऱ्यांच्या शेतात साैरकृषीपंप लावले जात आहेत.

गडचिरेाली जिल्ह्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत पाणीपातळी वरच आहे. त्यामुळे साैरकृषीपंप चांगले काम करीत आहे. सुरूवातीला साैरकृषीपंप व्यवस्थित पाण्याचा उपसा करणार नाही. अशी शंका शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात हाेती. मात्र प्रत्यक्ष वापर करताना हा पंप विजेवर चालणाऱ्या पंपाप्रमाणेच काम करीत असल्याचे दिसून येते. त्यामुळे साैरकृृषीपंपासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही वाढली आहे.

बाॅक्स

गडचिराेली जिल्ह्यात फायदेशीर

गडचिराेली जिल्हा जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे नदी, नाल्यांची संख्या अधिक आहे. तसेच जलस्तरही चांगला आहे. मात्र शेतीचे क्षेत्र कमी आहे. तसेच एका शेेतापासून दुसऱ्या शेताचे क्षेत्र बऱ्याच दूर आहे. एका शेतासाठी दाेन ते तीन किमी अंतरावर थ्री-फेज विजेचा पुरवठा करणेही शक्य हाेत नाही. त्यामुळेच बहुतांश शेतकऱ्यांची शेती पडिक असल्याचे दिसून येते. मात्र साैर कृृषीपंप लावल्यास वीजेची गरज पडत नाही. तसेच शेतकऱ्याला विजेचे बीलही येत नाही. पंपाची पाच वर्ष देखभाल ठेवण्याची जबाबदारी संबंधित कंपनीवर साेपविण्यात आली आहे.

बाॅक्स

अर्ज स्वीकारणे सुरूच

साैर कृषी पंपासाठी अर्जस्वीकारण्याची प्रक्रिया सुरूच आहे. शेतकऱ्याला ऑनलाईन अर्ज करावा लागते. शेताजवळ सिंचनाची सुविधा असणे आवश्यक आहे. पाच हेक्टरपर्यंत शेत असल्यास तीन एचपीचा पंप दिला जाते. तर पाच हेक्टरपेक्षा अधिक शेती असल्यास पाच एचपीचा पंप दिला जाते. एससी व एसटीच्या लाभार्थ्यांना ५ टक्के तर इतर लाभार्थ्यांना १० टक्के रक्कम भरावी लागते. महावितरणच्या तालुकास्तरावरील कार्यालये तसेच इतरही कार्यालयांमध्ये याबाबतची माहिती उपलब्ध आहे.

तालुकानिहाय बसविलेले साैरकृषीपंप

गडचराेली-१२२

आरमाेरी-२०१

देसाईगंज-९०

काेरची -३७

कुरखेडा-९९

धानाेरा-१२४

अहेरी-१२७

मुलचेरा-५७

एटापल्ली-५३

भामरागड-१३

सिराेंचा-२२

चामाेर्शी-१५०

एकूण-१०९५