शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

१३० गावांत जलसंकट ! ६ कोटींचा पाणी आराखडा तयार

By दिलीप दहेलकर | Updated: March 4, 2025 15:33 IST

Gadchiroli : ४० नळ योजनांची होणार दुरूस्ती

दिलीप दहेलकर लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याचा ५२ गावे आणि ७८ वाड्यांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याला मंजुरी मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने हा आराखडा तयार केला असून यातील कामे पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती आहे. टप्पा २ च्या माध्यमातून जिल्ह्यातील एकूण १३० गावांमध्ये पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात येणार आहे. यासाठी ६ कोटी २२ लाखांच्या उपाययोजना करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाई उद्भवते. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी प्रयत्न केले जातात. त्यासाठी कोट्यवधी रुपये शासनाकडून खर्च करण्यात येतात. या उन्हाळ्यातील टंचाईवर कायमची मात करण्यासाठी ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे.

पं.स. कडून मागविली जाते माहितीजिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने टंचाई कृती आराखडा तयार केला. याला तांत्रिक मान्यता मिळाली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून याला लवकरच मान्यता मिळणार आहे. पाणी सुविधा कामांची माहिती पंचायत समितीकडून मागवावी लागते. पाणी सुविधेच्या कामांना ग्रामसभांची मंजुरी आवश्यक ठरते.

विहिरींचे अंदाजपत्रक तयारनव्याने बांधण्यात येणाऱ्या विंधन विहिरींचे अंदाजपत्रक पाणीपुरवठा विभागाच्या तंत्रज्ञांनी तयार केले असून हे अंदाजपत्रक अंतिम झाले असल्याची माहिती आहे.

एप्रिलपासून कामे सुरू होणार

  • जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेत उपाययोजना केल्या जातात. टप्पा क्र. २ हा जानेवारी ते मार्च या कालावधीसाठीचा आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांसाठी टप्पा क्र. ३ चा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.
  • या आराखड्याला मार्च महिन्याच्या अखेरीस मान्यता मिळणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. टप्पा क्र. २ च्या आराखड्यातील कामांना एप्रिलच्या सुरुवाती प्रारंभ होईल. 

अशी होतील कामे...

  • पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार यामध्ये विंधन विहिरी ११२, विहीर खोलीकरण ७तसेच लघू व मोठ्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीची ४० अशी एकूण १५९ कामे होणार आहेत.
  • यातून संबंधित गावांतील जलसंकट दूर करण्याचा प्रयत्न होईल.

१५९ ११२ ठिकाणी नवीन विंधन विहिरीचे नियोजनकामे या आराखड्यात समाविष्ट आहेत. यात दहा तालुक्यांच्या १३० गावांत उपाययोजना केल्या जातील. भामरागड व एटापल्ली तालुक्याचा या आराखड्यात समावेश नाही.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात