शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

१३० गावांत जलसंकट ! ६ कोटींचा पाणी आराखडा तयार

By दिलीप दहेलकर | Updated: March 4, 2025 15:33 IST

Gadchiroli : ४० नळ योजनांची होणार दुरूस्ती

दिलीप दहेलकर लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्याचा ५२ गावे आणि ७८ वाड्यांचा संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात आला असून त्याला मंजुरी मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने हा आराखडा तयार केला असून यातील कामे पुढील आठवड्यात सुरू होणार असल्याची माहिती आहे. टप्पा २ च्या माध्यमातून जिल्ह्यातील एकूण १३० गावांमध्ये पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यात येणार आहे. यासाठी ६ कोटी २२ लाखांच्या उपाययोजना करण्यात येणार आहे.

जिल्ह्यात प्रमाणापेक्षा जास्त पाऊस पडूनही उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाई उद्भवते. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाकडून दरवर्षी प्रयत्न केले जातात. त्यासाठी कोट्यवधी रुपये शासनाकडून खर्च करण्यात येतात. या उन्हाळ्यातील टंचाईवर कायमची मात करण्यासाठी ठोस उपाययोजना होणे आवश्यक आहे.

पं.स. कडून मागविली जाते माहितीजिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने टंचाई कृती आराखडा तयार केला. याला तांत्रिक मान्यता मिळाली. मात्र जिल्हाधिकाऱ्यांकडून याला लवकरच मान्यता मिळणार आहे. पाणी सुविधा कामांची माहिती पंचायत समितीकडून मागवावी लागते. पाणी सुविधेच्या कामांना ग्रामसभांची मंजुरी आवश्यक ठरते.

विहिरींचे अंदाजपत्रक तयारनव्याने बांधण्यात येणाऱ्या विंधन विहिरींचे अंदाजपत्रक पाणीपुरवठा विभागाच्या तंत्रज्ञांनी तयार केले असून हे अंदाजपत्रक अंतिम झाले असल्याची माहिती आहे.

एप्रिलपासून कामे सुरू होणार

  • जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेत उपाययोजना केल्या जातात. टप्पा क्र. २ हा जानेवारी ते मार्च या कालावधीसाठीचा आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांमध्ये पाणीटंचाई निर्माण होणाऱ्या गावांसाठी टप्पा क्र. ३ चा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.
  • या आराखड्याला मार्च महिन्याच्या अखेरीस मान्यता मिळणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामांना सुरुवात होणार आहे. टप्पा क्र. २ च्या आराखड्यातील कामांना एप्रिलच्या सुरुवाती प्रारंभ होईल. 

अशी होतील कामे...

  • पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार यामध्ये विंधन विहिरी ११२, विहीर खोलीकरण ७तसेच लघू व मोठ्या नळ पाणी पुरवठा योजनांच्या विशेष दुरुस्तीची ४० अशी एकूण १५९ कामे होणार आहेत.
  • यातून संबंधित गावांतील जलसंकट दूर करण्याचा प्रयत्न होईल.

१५९ ११२ ठिकाणी नवीन विंधन विहिरीचे नियोजनकामे या आराखड्यात समाविष्ट आहेत. यात दहा तालुक्यांच्या १३० गावांत उपाययोजना केल्या जातील. भामरागड व एटापल्ली तालुक्याचा या आराखड्यात समावेश नाही.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीwater scarcityपाणी टंचाईwater shortageपाणीकपात