शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

लोकसहभागातूनच जलसमृद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 10:32 PM

पाणी हेच जीवन आहे. सद्यस्थितीचा विचार करता पाण्याची दुर्भिक्षता फारच गंभीर होत चालली आहे. भूजल पातळी वेगाने खाली जात आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन : जलजागृती सप्ताहाचा समारोप

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : पाणी हेच जीवन आहे. सद्यस्थितीचा विचार करता पाण्याची दुर्भिक्षता फारच गंभीर होत चालली आहे. भूजल पातळी वेगाने खाली जात आहे. तेव्हा पाण्याचे संवर्धन करण्यासाठी लोकसहभागातून जलसमृध्दीकडे जाण्याची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलजागृती सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम गुरूवारी झाला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल, समाजसेवक देवाजी तोफा, प्राचार्य सविता सादमवार, प्राचार्य संजय नार्लावार, मनोहर हेपट, संदीप लांजेवार, कार्यकारी अभियंता अ.अ. मेश्राम आदी उपस्थित होते.लोकांपर्यंत पोहचून जनआंदोलनाच्या माध्यमाने जल जागृतीपर संदेश द्या, असे जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांना जिल्हाधिकाºयांनी निर्देश दिले. पाण्याचा गैरवापर टाळून मोजक्याच पाण्याने आपली गरज भागवा असेही आवाहन त्यांनी केले.याप्रसंगी समाजसेवक देवाजी तोफा बोलतांना म्हणाले की,&‘आम्ही भारताचे लोक’ जलसंवर्धन करण्यासाठी कुठेतरी कमी पडत आहोत. पाण्याचे नियोजन चुकत असल्यामुळे येणारा काळ भयंकर स्वरुपाचा असेल याची जाणीव आजच होत आहे. त्यामुळे पाण्याच्या नियोजनात महिलांचा सहभाग गरजेचा आहे. सर्वांच्या मनस्थितीत बदल झाल्याशिवाय परिस्थीतीत बदल होणार नाही, असे आवाहनात्मक मत व्यक्त केले.प्राचार्य सविता सादमवार म्हणाल्या की, मनाने एखादी गोष्ट स्विकारत नाही तोपर्यंत कोणत्याही कार्याला यश येत नाही. आपल्या भौतिक सुखासाठी निसर्गाला मानव ओरबाडून नियम तोडत आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा या म्हणीचा अर्थ आम्ही समजून घेतला नाही तर २०५० पर्यंत पृथ्वीला वाळवंटाचा ग्रह म्हणून ओळखला जाईल असा इशारा त्यांनी दिला. संचालन डी. वाय. भांडेकर यांनी तर आभार सहायक अभियंता डी. डी. समर्थ यांनी मानले.विजेत्या स्पर्धकांचा गौरवजलजागृती सप्ताह १६ मार्च २०१४ ते २२ मार्च २०१८ या कालावधीत राबविण्यात आला. यादरम्यान निबंध स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये प्रथम विजेता आदित्य जयदेव गेडाम, व्दितीय प्रतिक्षा यशवत गोडणे आणि तेजस तानाजी भेंडारे व तृतीय ओम अशोक पुन्नमवार यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार झाला.