शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
4
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
5
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
6
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
7
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
8
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
9
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
10
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
11
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
12
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
14
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
15
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
16
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
18
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
19
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
20
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत

येडसिलीला विकासाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 5:00 AM

हे गाव विकासापासून वंचित आहे. वीज, पक्के रस्ते व पिण्याच्या पाण्याच्या सोयीपासून वंचित आहे. झिंगानूर परिसरात असलेले येडसिली गाव घनदाट जंगलात आहे. या गावाच्या बाजूंनी डोंगर आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. २०० च्या आसपास गावातील लोकसंख्या आहे. शेती व्यवसाय केवळ पावसाळ्यात केला जातो. त्यानंतर वर्षभर नागरिक रोजगाराच्या शोधात तेलंगणा राज्यात जातात.

ठळक मुद्देपक्क्या रस्त्यांची गरज : आरोग्य, पिण्याच्या पाण्याच्या सुविधेचा अभाव

कौसर खान ।लोकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : तालुक्यातील अतिदुर्गम झिंगानूर ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या येडसिली गावात अद्यापही मूलभूत सोयीसुविधा पोहोचल्या नाही. हे गाव विकासापासून वंचित आहे. वीज, पक्के रस्ते व पिण्याच्या पाण्याच्या सोयीपासून वंचित आहे.झिंगानूर परिसरात असलेले येडसिली गाव घनदाट जंगलात आहे. या गावाच्या बाजूंनी डोंगर आहे. येथील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. २०० च्या आसपास गावातील लोकसंख्या आहे. शेती व्यवसाय केवळ पावसाळ्यात केला जातो. त्यानंतर वर्षभर नागरिक रोजगाराच्या शोधात तेलंगणा राज्यात जातात. गावात नागरिकांसाठी तीन बोअरवेल आहेत. मोजक्याच घरांमध्ये विहिरी आहेत. येथे वीज पुरवठा करण्यात आला आहे. परंतु वीज पुरवठा वारंवार खंडित होतो. त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. गावातील नागरिकांना आरोग्यविषयक उपचार करण्याकरिता झिंगानूर प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे लागते. पावसाळ्यात आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचणे कठीण होते. या काळात तब्बेत बिघडल्यानंतर नागरिकांना बैलबंडीवर अथवा कावड करून आरोग्य केंद्रात न्यावे लागते. दळणवळणांच्या साधनांचा अभाव असल्याने नागरिकांना नेहमीच पायपीट करावी लागते.मोजक्याच लोकांकडे दुचाकी वाहने आहेत. त्यामुळे नागरिकांना आवागमन करण्यासाठी दुसºयावरच अवलंबून राहावे लागते. या गावातील नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असतानाही सिंचनाच्या सोयीअभावी पावसाच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. विशेष म्हणजे सिंचनाच्या सोयीसाठी गावात एक तलाव खोदण्यात आला होता. परंतु येथील पाणी साठवणूक क्षमता अत्यंत कमी असल्याने तलाव कुचकामी ठरत आहे. येथील नागरिकांना गरजा पूर्ण करण्याकरिता झिंगानूर गावावर अवलंबून राहावे लागत आहे. परंतु झिंगानूर ते येडसिलीपर्यंतचे अंतर ८ किमी असल्याने व सदर मार्ग अत्यंत दूरवस्थेत असल्याने नागरिकांना येथून आवागमन करताना कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे ३० ते ४० वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या या रस्त्याचे पक्के बांधकाम अद्यापही झाले नाही. कच्च्या रस्त्यानेच नागरिकांना ये-जा करावी लागत आहे.बसफेरी सुरू करायेडसिली भागात ३० ते ३५ वर्षांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाची बससेवा होती. परंतु या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाल्याने बसफेरी बंद करण्यात आली. तेव्हापासून या मार्गावरील बसफेरी बंदच आहे. नागरिकांना झिंगानूर तसेच जिमलगट्टा येथे विविध कामानिमित्त सायकल तसेच बैलगाडीने ये-जा करावी लागते. पावसाळ्यात या मार्गाने वाहने जाऊ शकत नाही.